शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
3
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
6
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
7
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
8
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
9
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
10
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
11
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
13
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
14
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
15
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
16
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
17
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
18
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
19
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
20
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा

ज्ञानदान पद्धतीत बदल आवश्यक

By admin | Updated: May 1, 2016 02:38 IST

पणजी : आज आपल्या देशात चाळीस हजारांहून अधिक महाविद्यालये आहेत. तरीही आपण सर्व स्तरांमधील मुलांपर्यंत पोहोचण्यास

पणजी : आज आपल्या देशात चाळीस हजारांहून अधिक महाविद्यालये आहेत. तरीही आपण सर्व स्तरांमधील मुलांपर्यंत पोहोचण्यास कमी पडतोय. आजच्या पारंपरिक ज्ञानदानाच्या पद्धतीत कालानुरूप बदल होणे आवश्यक आहे. आजची शिक्षण पद्धती दुर्दैवाने विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करत नाहीत. सर्व प्रकारच्या भौगोलिक सीमा पार करून तंत्रज्ञानाच्या आधारे आजचे शिक्षण सर्वव्यापी होणे महत्त्वाचे आहे. आज विद्यापीठाने जागतिक ज्ञानकेंद्र बनले पाहिजे, असे मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजय देशमुख यांनी व्यक्त केले. एस. एस. धेंपो वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारोह आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर गोवा विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. वाय. व्ही. रेड्डी, उच्च शिक्षण संचालक प्रा. भास्कर नायक, धेंपो चॅरिटी ट्रस्टच्या विश्वस्त पल्लवी धेंपो, यतीश धेंपो, प्राचार्या डॉ. राधिका नायक आणि उपप्राचार्य हमीद खानापुरी उपस्थित होते. मिरामार येथील गास्पार डायस सभागृहात हा सोहळा आयोजित केला होता. देशमुख म्हणाले, आजच्या अभ्यासक्रमात बदल होणे गरजेचे आहे. त्याच दृष्टीने मुंबई विद्यापीठाने पाऊल उचलले असून येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व अभ्यासक्रमांत बदल केला जाणार आहे. आपण पारंपरिक पद्धतीतून बाहेर पडून नव्या शैक्षणिक पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. तरच आपण अशिक्षित मुलांपर्यंत पोहोचू, असे त्यांनी नमूद केले. राज्यातील विद्यापीठांनीही आॅनलाईन पद्धत वापरून मुली व महिलांपर्यंत पोहोचावे, असे ते म्हणाले. या वेळी इतर मान्यवरांनीही विचार व्यक्त केले. महाविद्यालयाचे माजी प्रशासक जी. आर. सरदेसाई आणि विद्यमान प्रशासक सुनील प्रभूदेसाई यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ‘धेंपोआईट’ या स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले. पल्लवी धेंपो यांनी सुवर्णमहोत्सवी वर्षाचा आढावा घेतला. पल्लवी वागळे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)