शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

खाण अध्यादेश दुरुस्तीसाठी गोवा घालणार केंद्राला साकडे

By admin | Updated: January 30, 2015 01:26 IST

खाण अध्यादेश दुरुस्तीसाठी गोवा घालणार केंद्राला साकडे

पणजी : मायनिंग अ‍ॅण्ड मिनरल्स डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रेग्युलेशन कायदा (एमएमडीआर) दुरुस्त करणारा अध्यादेश केंद्र सरकारने जारी केला असला तरी, गोव्याचा प्रश्न संपलेला नाही. गोव्यासाठी वार्षिक २० दशलक्ष टन खनिज उत्खनन मर्यादा लागू झालेली असताना त्याविषयी अध्यादेशात काहीच स्पष्ट नसल्याने या विषयाबाबत स्पष्टता यावी म्हणून गोवा सरकार पुन्हा केंद्रास साकडे घालण्याचा विचार करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये निवाडा देताना २० दशलक्ष टन उत्खनन मर्यादा ठरवून दिली आहे. त्याशिवाय खाणींच्या ठिकाणी असलेले डंपही काढणे गरजेचे आहे. २० दशलक्ष टन खनिज उत्खनन केल्यानंतर त्यातून वार्षिक ८० दक्षलक्ष टन डंप (टाकाऊ खनिज माती) तयार होईल. यासाठी १ हजार ६०० हेक्टर जमीन लागेल. काही लिज क्षेत्रांमध्ये १०० मीटर उंचीचे डंप आहेत, ते काढून ठेवण्यासाठीही जागा पाहिजे. यापूर्वी खाण व्यावसायिक स्वत:च्या लिज क्षेत्राबाहेर डंप ठेवत होते. तथापि, आता नव्या अध्यादेशातील तरतुदीप्रमाणे ही पद्धत पुढे चालविता येणार नाही. प्रत्येक लिजधारकास स्वत:च्याच लिज क्षेत्रात डंप ठेवावे लागतील. ८ हजार हेक्टर जागेत जर कुणी खनिज व्यवसाय करू लागला, तर पाच वर्षांत ती सगळी जागा डंपनेच भरून जाईल. म्हणजे पाच वर्षांतच त्या लिजमधील खनिज व्यवसाय संपून जाईल, असे काही खाण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. एच. एल. नथुरमल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरिष मेलवानी यांनीही तसेच मत व्यक्त केले. आतापर्यंत गोव्यातील लिजधारक हे लिज क्षेत्राबाहेर डंप टाकत होते. त्यासाठी काही परवाने घ्यावे लागत होते. आता अध्यादेशामुळे जो प्रश्न निर्माण झाला आहे, त्यावर उपाय निघावा म्हणून आम्ही केंद्र सरकारशी संपर्क साधू, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, केंद्रीय खाणमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी अध्यादेशाची देशभर अंमलबजावणी व्हावी म्हणून दिल्लीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचे सत्र आरंभले आहे. गेल्या आठवड्यात सर्व राज्यांच्या खाणमंत्र्यांची सिंग यांनी बैठक घेतली. बुधवारी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी तयार राहण्याची सूचना केली. केंद्र सरकारला देशभरातील नव्या लिजांचा लिलाव पुकारायचा आहे, असे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)