शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

कळसाप्रश्नी पुन्हा कर्नाटकी कुरघोडी

By admin | Updated: December 7, 2015 01:40 IST

डिचोली : म्हादई पाणीवाटप जललवादाच्या सातत्यपूर्ण विरोधाला तसेच वन पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशाला हरताळ फासत

डिचोली : म्हादई पाणीवाटप जललवादाच्या सातत्यपूर्ण विरोधाला तसेच वन पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशाला हरताळ फासत कर्नाटकने पुन्हा एकदा कळसा प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे गोव्यावर पुन्हा एकदा पाणीसंकट उभे ठाकले आहे. जललवादासमोर गोव्याची बाजू भक्कम असल्याने कर्नाटकचे धाबे दणाणले होते. त्यानंतर गेले पाच महिने त्यांनी राजकीय नेते, धार्मिक नेते, अभिनेते, शेतकरी यांना रस्त्यावर उतरवत आंदोलनाचा मार्ग अवलंबिला आहे. सतत राज्य व केंद्र सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळास पाचारण करून कर्नाटकने पाण्याचा हट्ट धरला होता. मात्र, पंतप्रधानांनी त्यांना फारशी दाद न दिल्याने राजकीय नेते सैरभैर झाले असून चार महिने आंदोलन चालले आहे. २३ नोव्हेंबर रोजी असलेली जललवादासमोरील सुनावणी न्यायमूर्ती पांचाळ आजारी असल्याने २३ फेबु्रवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. याच गोष्टीचा फायदा उठवत कर्नाटकने मशिनरी व इतर सामग्री एकत्र आणून कामाला सुरुवात केल्याने कर्नाटकची चाल धोकादायक असल्याचे दिसून आले आहे. गोव्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. अन्यथा गोव्याला मोठी किंमत मोजावी लागणार असल्याची भीती राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केली आहे. मे २०१४ रोजी कळसा येथे मलप्रभेत जाणारे पाणी अडवण्यासाठी बांध घालण्याचा आदेश दिल्यानंतर कर्नाटकने आठ महिने काम बंद ठेवले होते. त्यानंतर पुन्हा काम सुरू केले. गेल्या दोन सुनावणीदरम्यान बंद असलेले काम आता नव्याने सुरू करण्याचा घाट घातल्याने म्हादईच्या अस्तित्वाची लढाई तीव्र करण्याची गरज निर्माण झाली आहे. कळसा येथे उभारलेला बांध तोडण्याची धमकी उत्तर कर्नाटकातील नेत्यांनी वारंवार दिली आहे. यादरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या बांधाला पूर्ण संरक्षण देण्याची हमी दिली होती. या ठिकाणी संरक्षण देण्यात आले होते. मात्र, आता प्रत्यक्षात नव्याने काम सुरू करण्यात आल्याने कर्नाटक नवी चाल खेळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वपक्षीय खासदारांची बैठक घेऊन केंद्रावर दबाव आणण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न कर्नाटकने चालवला असून गोव्यावर कुरघोडी करण्याचा त्यांचा प्रयत्न चालूच आहे. न्यायालयाच्या कक्षेबाहेर सामंजस्याने पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करणाऱ्या कर्नाटकाला गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. तसेच केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही या प्रश्नी लवादाच्या कक्षेबाहेर प्रश्न सोडवण्यास हरकत घेतलेली असून प्रत्येक कृतीने गोव्याने कर्नाटकाला कात्रीत पकडल्याने कर्नाटकाचे धाबे दणाणले असून काम सुरू करून गोव्यावर कुरघोडी करण्याचा नवा डाव आखला आहे. (प्रतिनिधी)