शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

सुरक्षेबाबत वर्षभरात मोठे बदल : पर्रीकर

By admin | Updated: December 28, 2014 09:38 IST

आसाममधील लष्करी कारवाईचे समर्थन

पणजी : येत्या वर्षभरात देशाच्या सुरक्षेच्याबाबतीत अनेक मोठे बदल करण्यात येणार असून या बदलांचा चांगला अनुभव देशवासियांना मिळेल, असे आश्वासनही संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले. ते साखळी येथे आयोजित रवींद्र भवन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. पर्रीकर पुढे म्हणाले की, सध्या देशात व देशाच्या सीमेवर सुरक्षेच्या दृष्टीने अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत़ मात्र, त्यांचा मुकाबला करण्यासाठी देशाची सुरक्षा यंत्रणा सक्षम आहे़ संरक्षणमंत्रिपद हे जबाबदारीचे, तसेच आव्हानात्मक आहे़ त्यामुळे आपल्यावर देण्यात आलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू, अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, पणजीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेमंत शिबिरात उपस्थित राहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पर्रीकर यांनी आसाममधील बोडो अतिरेक्यांविरुद्धच्या लष्करी कारवाईचे समर्थन केले. ते म्हणाले की, आसाममधील घनदाट जंगले आणि कडेकपारी या विशिष्ट भौगोलिक रचना असलेल्या प्रदेशात बोडो अतिरेकी गनिमीकाव्याचे तंत्र वापरून हल्ला करतात. निमलष्करी दलाला गनिमीकाव्याच्या तंत्राचे प्रशिक्षण दिलेले नसते. त्यामुळे अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. आसाममधील घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासातच लष्कराला पाचारण करण्यात आले होते. लष्कर जरी कारवाई करीत असले तरी ते गृहखात्याच्या आदेशाखाली कारवाई करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)