शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

राज्यात पाण्याची पर्यायी व्यवस्था

By admin | Updated: November 24, 2015 01:28 IST

डिचोली/पणजी : तिळारीच्या कालव्यामधून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे; पण सरकारने चांदेल व अस्नोडा पाणीपुरवठा

डिचोली/पणजी : तिळारीच्या कालव्यामधून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे; पण सरकारने चांदेल व अस्नोडा पाणीपुरवठा प्रकल्पाकडे पाण्याची पर्यायी व्यवस्था केली आहे. त्यामुळे पाण्याची समस्या कोठेही गंभीर झालेली नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी पणजी येथे पत्रकारांना सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले, की दरवर्षी नोव्हेंबरमध्ये एक महिन्यासाठी तिळारीच्या पाण्याचा पुरवठा बंद होत असतो. त्या वेळी कालव्यांचे दुरुस्ती काम चालत असते. या वेळी २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीसाठी पाणीपुरवठा थांबविला आहे. तिळारीचे पाणी हे चांदेल व अस्नोडा पाणीपुरवठा प्रकल्पासाठी गरजेचे असते. तिळारीचे पाणी थांबल्यानंतर चांदेल प्रकल्पासाठी बाजूच्याच नदीचे पाणी खेचून घेण्यात आले. मात्र, अस्नोडासाठी तशी व्यवस्था झाली नव्हती. ती आता होत आहे. मुख्यमंत्री म्हणाले, की अस्नोडा प्रकल्पाची गरज ११० एमएलडी आहे; पण तेथील नदीतून फक्त ८० एमएलडी पाणी मिळते. यावर उपाय म्हणून आमठाणे-साळ येथील धरणातील पाणी अस्नोडा येथे आणण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पाण्याविषयी राज्यात कोठे विदारक स्थिती आहे असा विषय नाही. (खास प्रतिनिधी)