शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

खनिज ट्रकांविरुद्ध कारवाई

By admin | Updated: April 26, 2016 01:47 IST

पणजी : राज्यात खनिज वाहतूक करणारे ट्रक ताशी चाळीस किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वाहतूक करत असल्याचे आढळून

पणजी : राज्यात खनिज वाहतूक करणारे ट्रक ताशी चाळीस किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वाहतूक करत असल्याचे आढळून आल्यास त्याविरुद्ध कारवाई करण्याची मोहीम सरकारच्या खाण खात्याने सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात तिळामळ-केपे येथे एका खनिजवाहू ट्रकाने दोघींचा बळी घेतल्यानंतर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी खनिज ट्रकांचा वेग ताशी चाळीस किलोमीटरपेक्षा जास्त असू नये, असा आदेश दिला होता. त्यानुसार खाण खाते ट्रकांच्या वाहतुकीवर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टमद्वारे (जीपीएस) लक्ष ठेवू लागले आहे. जेटींवरून खाणींवर खनिज माल आणताना सुमारे ५३८ ट्रकांनी वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याचे रविवारी खाण खात्याला आढळून आले व त्यानंतर लगेच कारवाई सुरू झाली. एका दिवसासाठी या ५३८ ट्रकांची खनिज वाहतूक निलंबित करण्यात आली. त्यामुळे सोमवारी हे ट्रक वाहतूक करू शकले नाहीत. खाण खात्याला वेगमर्यादेचे उल्लंघन आढळून आले की, लगेच ट्रकचालकांच्या मोबाईलवर एसएमएस पाठवला जातो व त्यांना पुढील चोवीस तासांसाठी वाहतूक करणे बंद ठेवण्याची सूचना जाते. खाण कंपन्यांनाही त्याबाबतचा अहवाल जातो. खनिज मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकांची खाण खात्याकडे नोंदणी आहे. शिवाय चालकांच्या मोबाईल क्रमांकाचीही नोंद आहे. या ट्रकांना जीपीएस व्यवस्था आहे. यापुढे खडी व रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकांचीही अशाच प्रकारे नोंदणी करून त्यांनाही चाळीस वेगमर्यादा लागू करण्याचे खाण खात्याने तत्त्वत: ठरविले आहे, असे सूत्रांनी सांगितले. एखादा खनिजवाहू ट्रक वारंवार वेगमर्र्यादेचे उल्लंघन करू लागला, तर त्याविरुद्ध महिनाभराचीही कारवाई केली जाणार आहे. (खास प्रतिनिधी)