शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

बेशिस्त पार्किंगमुळेही अपघात

By admin | Updated: March 5, 2015 01:32 IST

पणजी : मंगळवारी शहरातील बसस्थानकासमोरील सर्कलवर एका वाहनाने १६ दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातास

पणजी : मंगळवारी शहरातील बसस्थानकासमोरील सर्कलवर एका वाहनाने १६ दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातास बेशिस्त पार्किंगही जबाबदार असल्याचे आढळून आले. क्रांती सर्कलजवळ वाहतूक वळविण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स घातलेले आहेत. या बॅरिकेड्सजवळ रस्त्यावरच काही लोक दुचाक्या व अन्य वाहने पार्क करीत असतात. काहीजण बॅरिकेड्स हटवून वाट मोकळी करतात आणि वाहने दामटतात, तर काही वाहनधारक एकेरी मार्ग असूनही विरुध्द दिशेने येतात. वाहतूक पोलीस उपअधीक्षक धर्मेश आंगले यांना विचारले असता त्यांनीही बेशिस्त पार्किंगबद्दल पाढा वाचला. या ठिकाणी पोलीस नेमूनही काही उपयोग नाही; कारण जरा नजर हटली तरी कोणीतरी येतो आणि वाहन पार्क करून जातो. वाहनधारकांनी स्वत:च शिस्त लावून घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. पुलावर कार बंद पडल्याने मेगा ब्लॉक दरम्यान, नव्या मांडवी पुलावर बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास कार बंद पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. सुमारे तासभर वाहतुकीचा खोळंबा झाला. शहरात ठिकठिकाणी वाहने तुंबली तसेच पुलावरही वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. ही कार हटविण्यासाठी पोलिसांनी क्रेन पाठवली; परंतु तिही पुलावर बंद पडल्याने वाहतुकीचा आणखी फज्जा झाला. परिस्थिती हाताळण्यास वाहतूक पोलीस पूर्णपणे अपयशी ठरले. कामावरून सुटून घरी परतणाऱ्या नोकरदारांचा खोळंबा झाल्याने पोलिसांच्या नावाने त्यांनी बोटे मोडली. (प्रतिनिधी)