शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

धर्मरावबाबांचा गतवेळच्या पराभवाएवढाच यंदाही पराभव

By admin | Updated: October 19, 2014 23:37 IST

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रात धर्मरावबाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीत त्यांचा २५ हजार १९७ मतांनी पराभव

गडचिरोली : २००९ च्या विधानसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रात धर्मरावबाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीत त्यांचा २५ हजार १९७ मतांनी पराभव झाला होता. पुन्हा पाच वर्षानंतर आता ते मैदानात उतरले. परंतु मतदारांनी त्यांना संधी दिली नाही. या निवडणुकीतही धर्मरावबाबा आत्राम आपल्या पुतण्याकडून १९ हजार ८५८ मतांनी पराभूत झाले आहेत. धर्मरावबाबा आत्राम यांच्या या पराभवामागचे प्रमुख कारणे तपासण्याची गरज आहे. धर्मरावबाबा आत्राम हे १९८० च्या दशकापासून निवडणुका लढत आहेत. १५ ते २० वर्ष ते राज्याच्या राजकारणात सक्रीय राहिले. राज्याच्या मंत्रीमंडळात ते मंत्री म्हणूनही बरेच वर्ष होते. त्यानंतरच्या काळात काही वादग्रस्त घटनांमुळे त्यांना मंत्रीपद सोडावे लागले. अहेरी विधानसभा क्षेत्राशी त्यांचा संपर्क हवा तसा राहिला नाही. २०१२ मध्ये त्यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षासोबत सत्ता बसवून आपल्या कन्या भाग्यश्री आत्राम-हलगेकर यांना अध्यक्ष बनविले. अडीच वर्षाच्या कारकिर्दीत हलगेकरांनी अहेरी विधानसभा क्षेत्राकडे लक्ष देऊन या भागात एक मोठे पक्ष संघटन उभे करण्याची गरज होती. परंतु धर्मराबाबा आत्रामांच्या सभोवताला जो गोतावळा निर्माण झाला तो केवळ बाबांचा उदोउदो करणारा होता. वस्तूस्थितीची जाणीव करून देणाऱ्यांची तेथे उणीव होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन कौशल्य सांभाळणारे एटापल्ली तालुक्यातील मुख्य नेतृत्व केवल सावकार अतकमवार यांच्या निधनानंतर लोप पावले. त्यामुळे येथे नाविससारख्या पक्षाला जागा मिळाली. अम्ब्रीशराव महाराजांनी गेले दोन अडीच वर्ष प्रचंड मेहनत घेतली. धर्मरावबाबा या आपल्या काकांशी आपला सामना आहे. याची जाणीव ठेवत तरूण वर्ग जोडण्याचे काम केले. समाजाच्या प्रत्येक घटकासाठी वर्गणी देऊन तो समाज आपल्यासोबत जोडण्याचे काम केले. विश्वेश्वरराव महाराजांच्या काळापासून असलेले जुने काळ्या टोपीचे लोक व नवे जीन्सपँट घालून महागडा मोबाईल वापरणारे तरूण त्यांनी आपल्याकडे आकर्षीत केले. भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला आपण कमळावर लढायचे की नाही याबाबतही ते साशंक होते. मात्र कालांतराने त्यांनी याबाबी मान्य करीत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या साऱ्या निर्णयाचा फायदा त्यांच्या पदरात पडला. तुलनेत जिल्हा परिषदेत अडीच वर्ष सत्ता राहूनही धर्मरावबाबा आत्राम समर्थकांना या सत्तेचा वापर बाबांच्यासाठी करून घेता आला नाही. सत्तेच्या माध्यमातून केवळ अर्थकारण झाले. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला सत्तेचा कोणताही फायदा मिळालेला नाही, हे या निकालाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे धर्मरावबाबा आत्राम यांना गेल्यावेळी २५ हजार १९७ व यावेळी १९ हजार ८५८ मतांनी पराभव पत्कारावे लागले. या दोन पराभवातील अंतर मागील पाच वर्षात केवळ मात्र ५ हजार ३३९ मतांनीच कमी होऊ शकले. बाबांच्या पराभवाला घराणेशाहीही कारणीभूत ठरली. त्यांनी एकट्यांनीच जिल्ह्यात उमेदवारी घेतली असती तर या निवडणुकीचे चित्र कदाचित थोडेफार बदलू शकले असते. मुलीला व त्यांना एकत्रित उमेदवारी मिळाल्याने लोकांमध्ये चुकीचा संदेश गेला, असे आता म्हणता येण्यास बराच वाव आहे. (जिल्हा प्रतिनिधी)