शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
4
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
5
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
6
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
7
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
8
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
9
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
10
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
11
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
12
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
13
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
14
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
15
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
16
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
17
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
18
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
19
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
20
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार

यंदा श्रावण २९ दिवसांचा; मंदिरात प्रवेश मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:28 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : दीड वर्षापासून काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका आहे. त्यामुळे धार्मिक व पर्यटनस्थळे बंद आहेत. धार्मिक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : दीड वर्षापासून काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका आहे. त्यामुळे धार्मिक व पर्यटनस्थळे बंद आहेत. धार्मिक स्थळे बंद असल्याने भाविक घरीच पूजापाठ व अन्य विधी उरकतात. यंदा पहिला श्रावण साेमवार ९ ऑगस्ट राेजी येणार आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात तरी भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार काय, असे वेध लागले आहेत. या वर्षी श्रावण महिना २९ दिवसांचा आहे.

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. महिनाभर अनेक भाविक व्रतवैकल्ये, पूजापाठ व उपास करतात. श्रावण महिन्यातील दर साेमवारी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी उसळते. अनेक जण महिनाभर मांसाहार करीत नाहीत. तसेच वर्ज्य असलेले कार्यक्रम अथवा समारंभ आयाेजित करीत नाहीत. दर साेमवारी उपास करून आराधना करतात. विशेषत: शिव मंदिरांमध्ये भाविकांची माेठ्या प्रमाणावर गर्दी उसळते. त्यामुळे श्रावण महिन्याला महत्त्व आहे. या वर्षी श्रावण महिना २९ दिवसांचा असून पाच साेमवार येत आहेत. काेराेनाचे सावट असल्याने यंदा तरी मंदिरात प्रवेश मिळणार काय, असा प्रश्न भाविकांना सतावत आहे.

बाॅक्स..

९ पासून श्रावण

९ ऑगस्टपासून श्रावण साेमवार सुरू हाेत आहेत. परंतु मंदिरे बंद आहेत. तरीसुद्धा काही मंदिरांच्या बाहेर पूजा साहित्य विक्री करणारी दुकाने आहेत. येथील साहित्य खरेदी करून भाविक बाहेरूनच दर्शन घेतात. ते आतमध्ये प्रवेश करीत नसल्याने मंदिराला देणगीही देऊ शकत नाहीत.

बाॅक्स ......

व्यावसायिक म्हणतात, साहित्य विक्री मंदच

काेट....

काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी विविध प्रतिष्ठाने शासनाने बंद ठेवली. धार्मिक स्थळेही बंद आहेत. गेल्या दीड वर्षात पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचा धंदा बुडाला. अनेक जणांनी पर्यायाने दुसरा धंदा सुरू केला. यातच आता उपजीविका चालवावी लागत आहे. उन्हाळ्यात लाॅकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने काही प्रमाणात साहित्य विक्रीची दुकाने सुरू आहेत. परंतु दर्शनासाठी माेजकेच भाविक येतात.

- नारायण शेबे, व्यावसायिक

काेट......

मंदिरांच्या बाहेर पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये बहुतांश महिला व्यावसायिक आहेत. ज्या महिला निराधार किंवा एकल आहेत अशा महिला या व्यवसायात आहेत. याच व्यवसायावर त्या उपजीविका करीत आहेत. परंतु काेराेनामुळे महिलांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. दीड वर्षात धंदा बुडाला. अनेक वर्षांची मिळकतही आता राहिली नाही. त्यामुळे शासनाने मदत करावी.

- कविता बाेंद्रे, व्यावसायिक