शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

१,२६१ कोटींची कामे होणार

By admin | Updated: May 19, 2016 01:06 IST

१६ मे रोजी सोमवारी जि.प.च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण....

४०९.२२ मनुष्य दिवस मिळणार रोजगार : रोहयोचा वार्षिक नियोजन आराखडा मंजूरदिलीप दहेलकर गडचिरोली१६ मे रोजी सोमवारी जि.प.च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नरेगा विभागामार्फत तयार करण्यात आलेला सन २०१६-१७ चा वार्षिक नियोजन आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार सन २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यात १२६१ कोटी ८९ लाख ९० हजार रूपयांच्या निधीतून तब्बल ५५ हजार ८३५ कामे होणार असून या कामातून ४०९.२२ मनुष्य दिवस रोजगार प्राप्त होणार आहे.२ फेब्रुवारी २००६ पासून महाराष्ट्र राज्याच्या १२ जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१६-१७ या चालू वर्षात करावयाच्यसा कामाची निवड ग्रामपंचायतीमधून झालेली आहे. तसेच पूर नियंत्रण व पूर संरक्षण आदी प्रकारच्या कामांना पंचायत समिती स्तरावरील संवर्ग विकास अधिकाऱ्यांची मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यानंतर १२ ही पंचायत समिती स्तरावर मंजूर करण्यात आलेल्या रोहयो कामाच्या वार्षिक आराखड्यास जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे अत्यावश्यक आहे.त्यानुसार जि.प.च्या नरेगा विभागाच्या अधिकाऱ्यांनी चालू वर्षाच्या रोहयो कामाचा नियोजन आराखडा सोमवारी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत सादर केला. या नियोजन आराखड्याला जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी सर्वानूमते मंजुरी प्रदान केली. रोजगार हमी योजनेच्या कामाचा सन २०१६-१७ च्या मंजूर नियोजन आराखड्यात बाराही पंचायत समितीतील एकूण ४६७ ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे व ५० टक्के ग्रामपंचायत व ५० टक्के यंत्रणास्तरावर कामांचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण ५५ हजार ८३५ कामांपैकी ४२ हजार ११५ कामे ग्रामपंचायतस्तरावर तर १३ हजार ७२० कामे यंत्रणास्तरावर करण्यात येणार आहे.येत्या दोन दिवसात कामे सुरू होणारमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेंतर्गत गतवर्षी सन २०१५-१६ च्या मंजूर नियोजन आराखड्यातील मंजूर कामे पूर्ण केलेल्या ग्रामपंचायतींना चालू वर्षात मंजूर करण्यात आलेल्या नियोजन आराखड्यातील कामांना सुरूवात करता येणार आहे. ज्या ग्रा.पं.मध्ये गतवर्षीच्या आराखड्यातील मंजूर कामे अपूर्ण स्थितीत आहेत, अशा ग्रा.पं.नी आधी जुनी अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी केले आहे. त्यामुळे गतवर्षीचे काम पूर्ण केलेल्या ग्रामपंचायती लवकरच चालू वर्षातील मंजूर कामे हाती घेणार आहेत.