शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

जांभुळखेडा तलाव पाटाचे काम होणार

By admin | Updated: August 31, 2015 01:13 IST

मागील ४० वर्षांपासून वन कायद्याच्या कचाट्यात रखडलेले जांभुळखेडा येथील लघु सिंचन तलावाच्या पाटाचे बांधकाम गावकऱ्यांनी श्रमदानातून करण्याचे ठरविले आहे.

श्रमदानासाठी गावकऱ्यांचा पुढाकार : ४० वर्षांपासून रखडले होते बांधकाम कुरखेडा : मागील ४० वर्षांपासून वन कायद्याच्या कचाट्यात रखडलेले जांभुळखेडा येथील लघु सिंचन तलावाच्या पाटाचे बांधकाम गावकऱ्यांनी श्रमदानातून करण्याचे ठरविले आहे. रविवारी गावकऱ्यांनी कुदळ, फावडे घेऊन कामाच्या स्थळी दाखल झाले. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले काम पूर्ण होण्याची आशा पल्लवीत झाली आहे. रखडलेल्या तलाव पाट बांधकामाचा प्रश्न निकाली काढण्याकरिता चार ते पाच दिवसांपूर्वी गावात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी, जि. प. सदस्य अशोक इंदूरकर, मनोहर लांजेवार, दिगांबर मानकर यांना गावकऱ्यांनी पाचारण केले होते. अनेक वर्षांपासून रखडलेले तलावाचे पाट बांधकाम श्रमदानातून पूर्ण करण्याचा गावकऱ्यांनी संकल्प केला. त्यानंतर ३० आॅगस्ट रोजी गावकरी कुदळ, फावडे घेऊन नगर पंचायत प्रांगणात हजर झाले. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची कुणकुण लागताच वनपरिक्षेत्राधिकारी सोनवाने उपस्थित झाले. त्यांनी गावकऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली. सुरेंद्रसिंह चंदेल यांनीही उपवनसंरक्षकांशीही भ्रमणध्वनीवर सकारात्मक चर्चा केली. वन विभागातर्फे प्रत्यक्षात कामाला मंजुरी प्रदान करण्याचे आश्वासन दिले. सदर तलावाच्या सिंचनाचे लाभ जांभुळखेडा, येरंडी, गोठणगाव, मालदुगी येथील शेतकऱ्यांना होणार आहे. उपवनसंरक्षकांशी सकारात्मक चर्चेनंतर जांभुळखेडा येथे ३१ आॅगस्ट रोजी प्रत्यक्ष सर्वेकरिता सर्वेअर व सिंचाई विभागाचे अभियंता येऊन पाहणी करणार आहेत. त्यामुळे ४० वर्षांपासून रखडलेल्या प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता बळावली आहे. अधिकाऱ्यांशी चर्चेदरम्यान सुरेंद्रसिंह चंदेल यांच्यासह सरपंच शिवाजी राऊत, उपसरपंच खुशाल डोंगरवार, वामन हलाल, सायत्रा नैताम, सोनू भट्टड, क्रिष्णा पाटणकर, धोंडगे, मेश्राम, लोहंबरे, नंदेश्वर, दारगाये उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)वनकायद्यामुळे पाट बांधकामाला आली होती आडकाठीजांभुळखेडा व परिसरातील शेतीच्या सिंचनाकरिता मोठ्या सिंचन तलावाचे बांधकाम १९८० पूर्वी करण्यात आले होते. तलावाचे पाणी शेतांपर्यंत पोहोचविण्याकरिता नहराचे (पाट) बांधकाम सुरू असताना काही जागा संरक्षित वनक्षेत्रात मोडत असल्याची सबब पुढे करीत वन विभागाने सदर काम बंद पाडले होते. सदर काम आजतागायत बंदच होते. तलावाचे बांधकाम होऊनही पाटाअभावी कोणताच लाभ शेतकऱ्यांना होत नव्हता. पाटाचे बांधकाम व्हावे, याकरिता गावकऱ्यांनी अनेकदा शासनाकडे पाठपुरावा केला. त्याचबरोबर शिवसेनेच्या वतीने अनेकदा आंदोलनेही करण्यात आली. मात्र शासनाकडून आश्वासनांच्या पलीकडे काहीच प्राप्त झाले नाही.