शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जांभुळखेडा तलाव पाटाचे काम होणार

By admin | Updated: August 31, 2015 01:13 IST

मागील ४० वर्षांपासून वन कायद्याच्या कचाट्यात रखडलेले जांभुळखेडा येथील लघु सिंचन तलावाच्या पाटाचे बांधकाम गावकऱ्यांनी श्रमदानातून करण्याचे ठरविले आहे.

श्रमदानासाठी गावकऱ्यांचा पुढाकार : ४० वर्षांपासून रखडले होते बांधकाम कुरखेडा : मागील ४० वर्षांपासून वन कायद्याच्या कचाट्यात रखडलेले जांभुळखेडा येथील लघु सिंचन तलावाच्या पाटाचे बांधकाम गावकऱ्यांनी श्रमदानातून करण्याचे ठरविले आहे. रविवारी गावकऱ्यांनी कुदळ, फावडे घेऊन कामाच्या स्थळी दाखल झाले. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले काम पूर्ण होण्याची आशा पल्लवीत झाली आहे. रखडलेल्या तलाव पाट बांधकामाचा प्रश्न निकाली काढण्याकरिता चार ते पाच दिवसांपूर्वी गावात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी, जि. प. सदस्य अशोक इंदूरकर, मनोहर लांजेवार, दिगांबर मानकर यांना गावकऱ्यांनी पाचारण केले होते. अनेक वर्षांपासून रखडलेले तलावाचे पाट बांधकाम श्रमदानातून पूर्ण करण्याचा गावकऱ्यांनी संकल्प केला. त्यानंतर ३० आॅगस्ट रोजी गावकरी कुदळ, फावडे घेऊन नगर पंचायत प्रांगणात हजर झाले. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची कुणकुण लागताच वनपरिक्षेत्राधिकारी सोनवाने उपस्थित झाले. त्यांनी गावकऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली. सुरेंद्रसिंह चंदेल यांनीही उपवनसंरक्षकांशीही भ्रमणध्वनीवर सकारात्मक चर्चा केली. वन विभागातर्फे प्रत्यक्षात कामाला मंजुरी प्रदान करण्याचे आश्वासन दिले. सदर तलावाच्या सिंचनाचे लाभ जांभुळखेडा, येरंडी, गोठणगाव, मालदुगी येथील शेतकऱ्यांना होणार आहे. उपवनसंरक्षकांशी सकारात्मक चर्चेनंतर जांभुळखेडा येथे ३१ आॅगस्ट रोजी प्रत्यक्ष सर्वेकरिता सर्वेअर व सिंचाई विभागाचे अभियंता येऊन पाहणी करणार आहेत. त्यामुळे ४० वर्षांपासून रखडलेल्या प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता बळावली आहे. अधिकाऱ्यांशी चर्चेदरम्यान सुरेंद्रसिंह चंदेल यांच्यासह सरपंच शिवाजी राऊत, उपसरपंच खुशाल डोंगरवार, वामन हलाल, सायत्रा नैताम, सोनू भट्टड, क्रिष्णा पाटणकर, धोंडगे, मेश्राम, लोहंबरे, नंदेश्वर, दारगाये उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)वनकायद्यामुळे पाट बांधकामाला आली होती आडकाठीजांभुळखेडा व परिसरातील शेतीच्या सिंचनाकरिता मोठ्या सिंचन तलावाचे बांधकाम १९८० पूर्वी करण्यात आले होते. तलावाचे पाणी शेतांपर्यंत पोहोचविण्याकरिता नहराचे (पाट) बांधकाम सुरू असताना काही जागा संरक्षित वनक्षेत्रात मोडत असल्याची सबब पुढे करीत वन विभागाने सदर काम बंद पाडले होते. सदर काम आजतागायत बंदच होते. तलावाचे बांधकाम होऊनही पाटाअभावी कोणताच लाभ शेतकऱ्यांना होत नव्हता. पाटाचे बांधकाम व्हावे, याकरिता गावकऱ्यांनी अनेकदा शासनाकडे पाठपुरावा केला. त्याचबरोबर शिवसेनेच्या वतीने अनेकदा आंदोलनेही करण्यात आली. मात्र शासनाकडून आश्वासनांच्या पलीकडे काहीच प्राप्त झाले नाही.