शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

घरकुलांचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 22:04 IST

रमाई घरकूल योजनेंतर्गत २०१८-१९ मध्ये गडचिरोली जिल्ह्याला सुमारे ६ हजार ८११ घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र पंचायत समिती, ग्रामसभा स्तरावर घरकुलांना मंजुरी देण्याची प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वर्ष उलटूनही प्रत्यक्षात केवळ २ हजार ३७५ घरकुलांना मंजुरी मिळून प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत मंजूर घरकुलांची संख्या निम्म्याहून कमी आहे.

ठळक मुद्देसात हजार घरांचे उद्दिष्ट : ग्रामपंचायतस्तरावरून प्रस्ताव पाठविण्यास विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रमाई घरकूल योजनेंतर्गत २०१८-१९ मध्ये गडचिरोली जिल्ह्याला सुमारे ६ हजार ८११ घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र पंचायत समिती, ग्रामसभा स्तरावर घरकुलांना मंजुरी देण्याची प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वर्ष उलटूनही प्रत्यक्षात केवळ २ हजार ३७५ घरकुलांना मंजुरी मिळून प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत मंजूर घरकुलांची संख्या निम्म्याहून कमी आहे.प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत दरवर्षी मंजूर होणाऱ्या घरकुलांच्या तुलनेत तीन ते चार पटीने रमाई आवास योजनेंतर्गत उद्दिष्ट देण्यात आले. एवढे उद्दिष्ट पूर्ण झाले असते तर जवळपास सर्वच अनुसूचित जातीच्या पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला असता. शासन जेवढे घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट देते, तेवढा पैसा संबंधित विभागाकडे उपलब्ध करून दिला जातो. घरकुलांना मंजुरी देण्याची महत्त्वाची जबाबदारी ग्रामसभा पार पाडते. मात्र बºयाच वेळा ग्रामसभेत योग्य तो निर्णय घेतला जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे पात्र लाभार्थ्याचा प्रस्ताव पंचायत समितीमार्फत सादर केला जात नाही. परिणामी एखादा लाभार्थी पात्र असूनही त्याला घरकूल योजनेचा लाभ मिळत नसल्याचे दिसून येते.एकीकडे नागरिक घरकूल मिळण्यासाठी धावपळ करीत असतानाच रमाई घरकूल योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट देऊनही घरकूल मंजुरीची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असल्याने लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. वर्षभराचा कालावधी उलटून सुध्दा केवळ २ हजार ३७५ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्याचे ग्रामपंचायतीला योग्य ते निर्देश द्यावे, अशी मागणी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांकडून होत आहे.जात प्रमाणपत्राची अडचणरमाई घरकूल योजनेचा लाभ अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना दिला जातो. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अनेक वयोवृध्द नागरिकांच्या नावाने घरटॅक्स पावती असल्याने त्यांच्या नावानेच घरकूल मंजूर होते. मात्र त्यांचे जात प्रमाणपत्र राहत नाही. जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असलेली इतर कागदपत्रेही राहत नाही. त्यामुळे जात प्रमाणत्र निघण्यास उशीर होते. परिणामी घरकुलासाठी अर्ज करण्यास उशीर होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.