शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

थेट जनतेपर्यंत पोहोचून कामे करा

By admin | Updated: October 18, 2015 01:34 IST

जनतेने आपल्यापर्यंत येण्याची वाट न बघता आपण क्षेत्रीयस्तरावर जनतेपर्यंत पोहोचून लोकांची कामे केली तर आपले काम लोकाभिमूख ठरते,

पालक सचिवांचे निर्देश : बैठकीत विविध विकास कामांचा घेतला आढावागडचिरोली : जनतेने आपल्यापर्यंत येण्याची वाट न बघता आपण क्षेत्रीयस्तरावर जनतेपर्यंत पोहोचून लोकांची कामे केली तर आपले काम लोकाभिमूख ठरते, त्यामुळे सर्वांनी आपल्या सेवांचा विस्तार येणाऱ्या काळात करावा, असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव तथा राज्याच्या वन व महसूल विभागाचे सचिव विकास खारगे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार, जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, मुख्य वनसंरक्षक के. कल्याणकुमार, अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड आदी उपस्थित होते. जनतेची सेवा करण्यासाठी आपण आहोत, हे भूमिका आपण लक्षात ठेवून आपल्या कार्यकक्षाचा विस्तार करावा, असे सांगून पालक सचिव खारगे म्हणाले की, सेवा हक्क अधिनियम लागू झाला आहे. या अनुषंगाने वेळेत सेवा देणे आता बंधनकारक झालेले आहे. या अधिनियमात अनुसूची जाहीर केलेल्या सेवा आणि त्यांचा कालावधी याबाबत अधिकाऱ्यांसोबतच कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षित करण्याबाबत सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीत खारगे यांनी जलयुक्त शिवार योजना, नरेगा तसेच जिल्ह्यात असणारी मलेरियाबाबतची गंभीर स्थिती आदींचा सविस्तर आढावा घेतला. जलयुक्त शिवार अंतर्गत कामे चांगल्या स्वरूपाची झालेली आहेत. या कामांचा फायदा शेतकऱ्यांना होण्यासाठी या कामासोबत इतर विभागांशी समन्वय साधून वैयक्तिक लाभाच्या योजनांची सांगड घालून पॅकेज पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. पालक सचिव खारगे यांनी सकाळी जलयुक्त शिवार अंतर्गत वन आणि कृषी खात्यांमार्फत झालेल्या पोर्ला येथील दोन व कळमटोला येथील एका शेततळ्याची पाहणी केली. या भेटीदरम्यान नागरिकांनी उपस्थित केलेले प्रश्न विचारात घेऊन प्रत्येक कार्यालयाच्या वतीने गावपातळीवर जाऊन माहिती देणे, बैठका, प्रचार प्रसिद्धी आदींमधून शासकीय कामे लोकांपर्यंत नेण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.जिल्ह्यात मलेरियाची स्थिती खूप गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर मलेरियाबाधीत क्षेत्रात गावपातळीवर सभा घेण्याच्या सूचना खारगे यांनी दिल्या. या भागात कोरडा दिवस कटाक्षाने पाळणे आणि गप्पी मासे तसेच मच्छरदाणीचा वापर याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केले. तसेच पॉवर पार्इंट सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील विकास कामांची माहिती त्यांनी सादर केली. संचालन जिल्हा नियोजन अधिकारी धनंजय सुटे यांनी केले. बैठकीला वन, आरोग्य, महसूल व इतर विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)