शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
3
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
4
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
5
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
6
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
7
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
8
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
9
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
10
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
11
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
12
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
13
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
14
पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?
15
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
16
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
17
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
18
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
19
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
20
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं

जीव धोक्यात घालून पोहोचावे लागते बिनागुंडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:54 IST

भामरागड तालुका स्थळापासून ३६ किमी अंतरावर असलेल्या बिनागुंडा येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. नाल्यांवर पूल नाही.

ठळक मुद्देनाल्यावर पूल नाही : आरोग्य कर्मचाºयांचीही कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड तालुका स्थळापासून ३६ किमी अंतरावर असलेल्या बिनागुंडा येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. नाल्यांवर पूल नाही. त्यामुळे नाल्यातील पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. विकासापासून कोसोदूर असलेल्या बिनागुंडासह परिसरात रस्ते व पूल निर्मितीकडेही शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.बिनागुंडा हे गाव अतिशय दुर्गम भागात वसले आहे. बिनागुंडाच्या सभोवताल पहाडी आहेत. बिनागुंडा हे गाव लाहेरीपासून १८ किमी अंतरावर आहे. लाहेरीपासून बिनागुंडाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने पायवाटेचाच आधार घ्यावा लागतो. वाटेत पाच नाले पडतात. यापैकी एकाही नाल्यावर पूल नाही. लाहेरीपासून सात किमी अंतरावर गुडेनूर नाला आहे. सदर नाला अतिशय मोठा आहे. जंगलातून पाणी येत असल्याने सदर नाला जवळपास आठ महिने भरून राहतो. पावसाळ्यात या नाल्याला अनेकदा पूर येते. तर पावसाळ्यानंतरही या नाल्यांमध्ये कंबरेपेक्षा अधिक पाणी राहते. या नाल्याच्या पाण्यातून पुढे जाताना जीव दावणीलाच लावावा लागतो. मात्र सदर नाला ओलांडल्याशिवाय पर्याय नाही. सदर नाल्यापासून ११ किमी अंतरावर डोंगर आहे. तीन ते चार तास पहाडी चढून बिनागुंडाला जावे लागते. एकदा बिनागुंडाला गेल्यानंतर पावसाळ्यामध्ये तेथून परत येणे शक्य होत नाही. बिनागुंडा ते लाहेरीपर्यंत पायवाट असल्याने १८ किमी अंतर पायदळच तुडवावे लागते. बिनागुंडा परिसरात कुनाकोडी, फोदेवाडा, पुंगासूर, धामनमरका, पेरमिली, भट्टी आदी गावे आहेत. या सर्व गावातील शेकडो नागरिकांना वर्षभर असाच जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. शासन या गावांना पक्का रस्ता कधी उपलब्ध करून देणार, असा प्रश्न गावातील नागरिक उपस्थित करीत आहेत.आरोग्य सेवा देताना कसरतबिनागुंडा, फोदेवाडा, कुनाकोडी येथे आरोग्य उपकेंद्र असून या उपकेंद्राच्या माध्यमातून बिनागुंडा परिसरातील गावांना आरोग्य सेवा पुरविली जाते. बिनागुंडा उपकेंद्रात डॉ. मेश्राम व एएनएम अल्का मेश्राम, कुनाकोडी येथे एएनएम एलबी लेखामी आणि फोदेवाडा येथे मंगला कुळमेथे व एमपीडब्ल्यू विश्वनाथ कोडापे हे कर्मचारी कार्यरत आहेत. जंगलानी व्यापलेली गावे असल्याने या ठिकाणी मलेरियाचा प्रकोप अधिक राहते. त्यामुळे हे सर्व कर्मचारी मुख्यालयी राहूनच सेवा देतात. एखादेवेळी गावाकडे जायचे असल्यास किंवा भामरागड येथून औषधी आणायची असल्यास याही आरोग्य कर्मचाºयांना जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागतो.