शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

वाढलेल्या अपेक्षा पूर्ण होतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:06 IST

राज्याच्या पूर्व टोकावरील सर्वाधिक मागास जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार शुक्रवारी पहिल्यांदा गडचिरोलीत येत आहेत.

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या पूर्व टोकावरील सर्वाधिक मागास जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार शुक्रवारी पहिल्यांदा गडचिरोलीत येत आहेत. वास्तविक हा जिल्हा त्यांच्यासाठी नवीन नाही. त्यांचा गृहजिल्हा चंद्रपूरमधूनच गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्याशी त्यांचे भावनिक आणि पारिवारिक ऋणानुबंध आहेत. ही बाब गडचिरोली जिल्हावासियांशी जास्त महत्वाची आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडून जिल्हावासियांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणाºया नेत्यांमध्ये अलिकडच्या काळात स्व.आर.आर.पाटील यांचे नाव लोक अजूनही घेतात. या जिल्ह्याला खºया अर्थाने भौतिक सुविधांसह विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेली कामे अविस्मरणीय ठरली. त्याच्यानंतरही जिल्ह्यात अनेक कामे झाली, पण त्या ताकदीची कामे दुर्दैवाने होऊ शकली नाही. जिल्ह्याच्या गरजांची जाण ठेवून मुंबईतही त्यासाठी वजन वापरत हवे ते पदरी पाडून घेण्याची आर.आर.पाटलांची तगमग वादातीत होती. सर्वसामान्यांशी नाळ जुळवून त्यांच्यापासून कायमचे दूर गेल्यानंतर असा पालकमंत्री आता होणे नाही, अशीच प्रतिक्रिया आतापर्यंत लोकांच्या तोंडून उमटत होती. पण सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा आल्यानंतर जिल्हावासियांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.विपूल वनसंपदा असूनही त्यावर आधारित रोजगार निर्मितीचा अभाव, अर्धवट स्थितीत बंद पडलेला लोहखनिज उद्योग, अतिशय धिम्या गतीने सुरू असलेली महामार्ग व इतर रस्त्यांची कामे, कित्येक वर्षांपूर्वी मंजूरी मिळूनही कामाला सुरूवात न झालेले सिंचन प्रकल्प, त्यामुळे दुबार पिकांपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक कोंडी असे कितीतरी प्रश्न या जिल्ह्याच्या विकासात अडथळा बनून उभे आहेत. पण त्याकडे राज्य सरकारच्या प्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे.राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री, वनमंत्री अशा महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभळणाºया मुनगंटीवारांना या जिल्ह्याच्या प्रश्नांची बऱ्यापैकी जाणीव आहे. लालफितशाहीत अडकलेली कामे मार्गी लावण्याची त्यांची सचोटी आहे. निवडणूक आचारसंहिता लागण्याआधी त्यांना आपले काम दाखविण्यासाठी अतिशय कमी कालावधी मिळणार आहे, पण त्यातही ते आपली छाप पाडतील आणि या जिल्ह्याच्या भल्यासाठी चार गोष्टी केल्याशिवाय राहणार नाहीत, असा जिल्हावासियांचा विश्वास आहे. तो विश्वास कायम ठेवत वाढलेल्या अपेक्षा मुनगंटीवार नक्कीच पूर्ण करतील, अशी आशा करूया.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार