शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

७३६ बिटमध्ये होणार वन्यजीव प्रगणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:01 IST

दर चार वर्षांनी होणारी व्याघ्र व वन्यजीव प्रगणना २० ते २५ जानेवारी यादरम्यान केली जाणार आहे. नियतक्षेत्र (बिट) हे एक युनिट समजून ७३६ नियतक्षेत्रात वन्यजीव प्रगणना केली जाणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.

ठळक मुद्देपीडीएवर बहिष्काराने वाढली अडचण : २० ते २५ दरम्यान घेणार नोंदी

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दर चार वर्षांनी होणारी व्याघ्र व वन्यजीव प्रगणना २० ते २५ जानेवारी यादरम्यान केली जाणार आहे. नियतक्षेत्र (बिट) हे एक युनिट समजून ७३६ नियतक्षेत्रात वन्यजीव प्रगणना केली जाणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.जंगलात नेमके किती वाघ व अन्य तृणभक्षी जीव आहेत. याचा अंदाज यावा, या उद्देशाने २००६ पासून संपूर्ण देशात व्याघ्र व वन्यजीव प्रगणना करण्यास सुरुवात झाली. दर चार वर्षांनी ही प्रगणना केली जाते. यापूर्वी सन २००६, २०१० व २०१४ मध्ये प्रगणना करण्यात आली होती. यावर्षी २० ते २५ जानेवारी दरम्यान प्रगणना केली जाणार आहे. २० ते २२ या दरम्यान मांसाहारी व मोठ्या शाकाहारी प्राण्यांची प्रगणना होईल. सदर प्रगणना पाऊलवाटांच्या मदतीने केली जाईल. शेण, पगमार्क, विष्ठा, प्राण्यांनी केलेली शिकार, लघवी आदींच्या माध्यमातून सूर्योदयापासून जवळपास ८ वाजेपर्यंत प्रगणना केली जाईल. नीलगाय, हरीण, चितळ, सांबर यासारख्या खूर असलेल्या प्राण्यांची प्रगणना दोन किमी अंतराचे ट्रांझिक्ट लाईन टाकून केली जाणार आहे. या प्रगणनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात मागील चार वर्षात किती वन्यजीवांची संख्या वाढली किंवा कमी झाली, याचा अंदाज येण्यास मदत होणार आहे. प्रगणना योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी यापूर्वीच वनपाल व वनरक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रगणनेदरम्यान प्राप्त झालेली माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला पाठविली जाईल. त्यानंतर ती माहिती वन्यजीव संस्था डेहराडून येथे संकलित केली जाणार आहे, अशी माहिती विभागीय वनाधिकारी (दक्षता) एस.एल. बिलोविकर यांनी दिली.पक्ष्यांचीही होणार नोंदव्याघ्र व वन्यजीव प्रगणनेदरम्यान वन्यप्राण्यांसोबतच पक्ष्यांचीही पाहणी केली जाणार आहे. जंगलात एखादा नवीन पक्षी किंवा झाड आढळून आल्यास त्याचीही नोंद केली जाणार आहे. गिधाड या पक्ष्यांची प्रजातीला धोका आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील पक्ष्यांची पाहणी करताना गिधाडांची विशेष नोंद घेतली जाणार आहे.पीडीएवर बहिष्कार कायमनेमक्या कोणत्या ठिकाणी वन्यजीव आढळून आला, याची सूक्ष्म नोंद होण्यासाठी पीडीए हे संयंत्र आवश्यक आहे. मात्र वनकर्मचाऱ्यांनी पीडीए संयंत्र एक महिन्यापूर्वी वन विभागाकडे परत केले आहे. प्रगणनेदरम्यान या यंत्राचा वापर न करण्यावर ते अजूनही ठाम आहेत. त्यामुळे पीडीए संयंत्राशिवाय प्रगणना होणार आहे. सर्व माहिती गोळा होईल, मात्र वन्यजीवाचे नेमके ठिकाण माहित होण्यास अडचण निर्माण होणार आहे. वनकर्मचारी संघटना व शासन यांच्यामध्ये तोडगा निघाला नाही. त्यामुळे शुक्रवारपर्यंत वनकर्मचारी पीडीए संयंत्राचा वापर न करण्यावर ठाम होते.वनपाल व वनरक्षकांकडून शासन अनेक तांत्रिक कामे करून घेते. मात्र या कर्मचाऱ्यांना तांत्रिक कर्मचारी मानत नाही. शासनाचे इतर विभाग व वनकर्मचारी यांच्या वेतनश्रेणीत फार मोठी तफावत आहे. वनरक्षकाचे पद तलाठ्या बरोबरचे मानले जाते. मात्र त्याला शिपायापेक्षाही कमी वेतन मिळते. पीडीएचा वापर होत असला तरी कर्तव्यामध्ये नमूद नाही. वेतनश्रेणीत सुधारणा करावी, यासाठी मागील १० वर्षांपासून लढा सुरू आहे. मात्र शासनाने याकडे लक्ष दिले नाही. वनकर्मचारी प्रगणनेचा काम करतील, मात्र पीडीएचा वापर करणार नाही.- योगेश शेरेकर, जिल्हाध्यक्ष,वनरक्षक व वनपाल संघटना, गडचिरोली