शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
3
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
5
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
6
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
7
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
8
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
9
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
10
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
11
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
12
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
13
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
14
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
15
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
16
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
17
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
18
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
19
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
20
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता

३४ हत्या करणाऱ्या सृजनक्कासाठी बंद का पाळायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांनी नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदला तीव्र विरोध केला आहे. जिल्ह्यातील नागरिक बंदला प्रतिसाद देणार नाही, हे नक्षलवाद्यांना ठाऊक असल्याने आपले अस्तित्व दाखविण्यासाठी भ्याड नक्षलवाद्यांनी धानोरा उपविभागाअंतर्गत सावरगाव-मुरूमगाव मार्गावरील खासगी कंत्राटदाराच्या मालकीचे तीन हायवा व एक ट्रक अशा एकूण चार वाहनांची मध्यरात्रीच्या सुमारास जाळपोळ केली आहे, असेही पोलीस विभागाने म्हटले आहे.

ठळक मुद्देनिष्पाप आदिवासींचा बळी : संतप्त नागरिकांनी केली बॅनरची होळी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कसनसूर दलम डीव्हीसी सृजनक्का हिच्यावर जिल्हाभरातील विविध पोलीस ठाण्यात एकूण १४४ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये ३४ निष्पाप आदिवासी नागरिकांच्या खून केल्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. निष्पाप आदिवासी नागरिकांच्या हत्त्येसह शासकीय मालमत्तेची जाळपोळ करणाऱ्या सृजनक्कासाठी नक्षलवाद्यांनी २० मे रोजी बंद पुकारला आहे. आदिवासींचा खून करणाऱ्या सृजनक्कासाठी हा बंद का म्हणून पाळायचा, असा सवाल जिल्ह्यातील संतप्त नागरिकांनी नक्षलवाद्यांना केला आहे.जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांनी नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदला तीव्र विरोध केला आहे. जिल्ह्यातील नागरिक बंदला प्रतिसाद देणार नाही, हे नक्षलवाद्यांना ठाऊक असल्याने आपले अस्तित्व दाखविण्यासाठी भ्याड नक्षलवाद्यांनी धानोरा उपविभागाअंतर्गत सावरगाव-मुरूमगाव मार्गावरील खासगी कंत्राटदाराच्या मालकीचे तीन हायवा व एक ट्रक अशा एकूण चार वाहनांची मध्यरात्रीच्या सुमारास जाळपोळ केली आहे, असेही पोलीस विभागाने म्हटले आहे.एकीकडे राज्यासह गडचिरोली जिल्हा कोरोना संकटाचा सामना करीत असून या लढ्यात पोलिसांसोबतच सर्व विभागाचे शासकीय कर्मचारी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.असे असताना सुद्धा दुसरीकडे नक्षलवाद्यांना याचे काहीही सोयरसुतक नाही. नक्षलवादी बंदच्या नावाखाली नेहमीच झाडेपाडून रस्ता बंद करतात. परिणामी नागरिकांना जीवनावश्यक सेवेसोबतच आरोग्य सेवा मिळणे कठीण होते. सर्वसामान्य नागरिकांना त्रास देऊन अडचणीत आणण्याचे काम नक्षलवाद्यांकडून होत आहे, असे पोलीस विभागाने म्हटले आहे.नक्षल्यांकडून आजपर्यंत ५३३ नागरिकांची हत्यागडचिरोली जिल्ह्यात नक्षली चळवळीचा उदय झाल्यापासून आजपर्यंत नक्षलवाद्यांनी जिल्ह्यातील एकूण ५३३ सामान्य आदिवासी नागरिकांची हत्या केली. यामध्ये निष्पाप २२ महिलांचाही समावेश आहे. बंदच्या नावाखाली जनतेच्या पैशातून उभा करण्यात आलेल्या मालमत्तेची नुकसान करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न नक्षलवादी करीत असतात. बंदच्या नावाखाली वाहनांची केलेली जाळपोळ घटना ही दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी केली आहे. सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलन हंगाम सुरू आहे. तेंदूपत्ता कंत्राटदाराकडून खंडणी उकळणे हा नक्षलवाद्यांचा सदर जाळपोळ घटनेच्या माध्यमातून उद्देश असल्याचे दिसून येते, असे पोलिसांनी म्हटले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी