शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
4
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
5
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
6
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
7
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
8
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
9
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता
10
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
11
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
12
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
13
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
14
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
15
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
16
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
17
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
18
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
19
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
20
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली

३४ हत्या करणाऱ्या सृजनक्कासाठी बंद का पाळायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांनी नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदला तीव्र विरोध केला आहे. जिल्ह्यातील नागरिक बंदला प्रतिसाद देणार नाही, हे नक्षलवाद्यांना ठाऊक असल्याने आपले अस्तित्व दाखविण्यासाठी भ्याड नक्षलवाद्यांनी धानोरा उपविभागाअंतर्गत सावरगाव-मुरूमगाव मार्गावरील खासगी कंत्राटदाराच्या मालकीचे तीन हायवा व एक ट्रक अशा एकूण चार वाहनांची मध्यरात्रीच्या सुमारास जाळपोळ केली आहे, असेही पोलीस विभागाने म्हटले आहे.

ठळक मुद्देनिष्पाप आदिवासींचा बळी : संतप्त नागरिकांनी केली बॅनरची होळी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कसनसूर दलम डीव्हीसी सृजनक्का हिच्यावर जिल्हाभरातील विविध पोलीस ठाण्यात एकूण १४४ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये ३४ निष्पाप आदिवासी नागरिकांच्या खून केल्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. निष्पाप आदिवासी नागरिकांच्या हत्त्येसह शासकीय मालमत्तेची जाळपोळ करणाऱ्या सृजनक्कासाठी नक्षलवाद्यांनी २० मे रोजी बंद पुकारला आहे. आदिवासींचा खून करणाऱ्या सृजनक्कासाठी हा बंद का म्हणून पाळायचा, असा सवाल जिल्ह्यातील संतप्त नागरिकांनी नक्षलवाद्यांना केला आहे.जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांनी नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदला तीव्र विरोध केला आहे. जिल्ह्यातील नागरिक बंदला प्रतिसाद देणार नाही, हे नक्षलवाद्यांना ठाऊक असल्याने आपले अस्तित्व दाखविण्यासाठी भ्याड नक्षलवाद्यांनी धानोरा उपविभागाअंतर्गत सावरगाव-मुरूमगाव मार्गावरील खासगी कंत्राटदाराच्या मालकीचे तीन हायवा व एक ट्रक अशा एकूण चार वाहनांची मध्यरात्रीच्या सुमारास जाळपोळ केली आहे, असेही पोलीस विभागाने म्हटले आहे.एकीकडे राज्यासह गडचिरोली जिल्हा कोरोना संकटाचा सामना करीत असून या लढ्यात पोलिसांसोबतच सर्व विभागाचे शासकीय कर्मचारी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.असे असताना सुद्धा दुसरीकडे नक्षलवाद्यांना याचे काहीही सोयरसुतक नाही. नक्षलवादी बंदच्या नावाखाली नेहमीच झाडेपाडून रस्ता बंद करतात. परिणामी नागरिकांना जीवनावश्यक सेवेसोबतच आरोग्य सेवा मिळणे कठीण होते. सर्वसामान्य नागरिकांना त्रास देऊन अडचणीत आणण्याचे काम नक्षलवाद्यांकडून होत आहे, असे पोलीस विभागाने म्हटले आहे.नक्षल्यांकडून आजपर्यंत ५३३ नागरिकांची हत्यागडचिरोली जिल्ह्यात नक्षली चळवळीचा उदय झाल्यापासून आजपर्यंत नक्षलवाद्यांनी जिल्ह्यातील एकूण ५३३ सामान्य आदिवासी नागरिकांची हत्या केली. यामध्ये निष्पाप २२ महिलांचाही समावेश आहे. बंदच्या नावाखाली जनतेच्या पैशातून उभा करण्यात आलेल्या मालमत्तेची नुकसान करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न नक्षलवादी करीत असतात. बंदच्या नावाखाली वाहनांची केलेली जाळपोळ घटना ही दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी केली आहे. सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलन हंगाम सुरू आहे. तेंदूपत्ता कंत्राटदाराकडून खंडणी उकळणे हा नक्षलवाद्यांचा सदर जाळपोळ घटनेच्या माध्यमातून उद्देश असल्याचे दिसून येते, असे पोलिसांनी म्हटले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी