शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
3
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
4
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
5
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
6
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
7
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
8
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
9
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
10
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
11
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
12
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
13
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
14
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
15
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
16
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
17
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
18
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
19
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
20
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!

अवैध दारूविक्री रोखणार कोण?

By admin | Updated: November 11, 2014 22:40 IST

१९९२ मध्ये दारूबंदी करण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राजरोसपणे प्रत्येक गावात दारूची अवैध विक्री सुरू आहे. दारूविक्रीच्या भरवशावर या व्यवसायात काम करणारे लोक लक्षाधीश झाले आहेत.

गडचिरोली : १९९२ मध्ये दारूबंदी करण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राजरोसपणे प्रत्येक गावात दारूची अवैध विक्री सुरू आहे. दारूविक्रीच्या भरवशावर या व्यवसायात काम करणारे लोक लक्षाधीश झाले आहेत. दारूमुळे अनेकांचे संसार उद्धस्त झाले असून अवैध दारू विक्रीतून खरेदी केलेली बनावटी दारू पिल्याने आजारामुळे अनेकांचा मृत्यूही झाला आहे. मात्र राज्य सरकारला अजूनही दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये दारूची अवैध विक्री रोखण्याचे काम नेमके कुणाचे याबाबत निश्चित धोरण तयार करता आलेले नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन हप्ते कमाविण्यासाठी या दारूबंदीचा पुरेपुर फायदा घेत आहेत. तर उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही ग्रहण लागते त्याप्रमाणे वर्षात २-३ धाडी घालून आपला विभाग जिवंत असल्याचे दर्शन जनतेला घडवून देत आहे. १९९२ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय व राणी बंग यांच्या नेतृत्वात दारूबंदीबाबत मोठे आंदोलन झाल्याने राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला. गडचिरोली हा दारूबंदी असलेला राज्यातला दुसरा जिल्हा आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या वर्धा जिल्ह्यातही सरकारने दारूबंदी केली आहे. या दोनही जिल्ह्यात दारूबंदीचे अनुभव अत्यंत बिकट आहे. दारूबंदी असतांनाही राजरोसपणे दारूची विक्री केली जाते. गडचिरोली शहरातून दुचाकी व चारचाकीवर भर दिवसा दारूची वाहतूक केली जाते. दारूचे अवैध विक्रेते कोण याची पूर्ण माहिती गडचिरोली पोलीस प्रशासनाला आहे. गडचिरोली शहरात पोलीस ठाण्याचे अनेक कर्मचारी दररोज या अवैध दारूविक्रेत्यांचे दर्शन घेऊन धन्य होतात. परंतु कधीही या दारूविक्रेंत्यांवर मोठी कारवाई केली जात नाही. कोरचीपासून सिरोंचापर्यंत ८-१० गावे सोडली तर प्रत्येक गावात हमखास अवैध दारूविक्री सुरू आहे. कुरखेडा, कोरची, आरमोरी या भागात बनावटी दारूचे मोठे कारखानेही आहेत. यांच्यावर कारवाई पोलीस प्रशासन करीत नाही. त्यामुळे गडचिरोलीत दारूबंदी असूनही महाराष्ट्रात सर्वाधिक दारूविक्री येथेच होते, असे चित्र आहे. राज्य सरकारने दारूची अवैध विक्री रोखण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनावर सोपविली आहे. वर्धा व गडचिरोली या दोनही जिल्ह्यात पोलीस प्रशासन दारूची अवैध विक्री रोखण्यात अपयशी ठरले आहेत. नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दारूचा पुरवठा येथे केला जातो. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला ३० दुकानांचा वेढा पडलेला आहे. दारूबंदी करणाऱ्या गावातील शौकीन शेजारच्या गावात जाऊन दारू पिऊन येतात, असे चित्र आहे. राज्यसरकारने चंद्रपूरच्या दारूबंदीचा निर्णय करण्यापूर्वी या तिनही जिल्ह्यात दारूबंदीबाबत स्वतंत्ररित्या अंमलबजावणी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. (जिल्हा प्रतिनिधी)