शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

अवैध दारूविक्री रोखणार कोण?

By admin | Updated: November 11, 2014 22:40 IST

१९९२ मध्ये दारूबंदी करण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राजरोसपणे प्रत्येक गावात दारूची अवैध विक्री सुरू आहे. दारूविक्रीच्या भरवशावर या व्यवसायात काम करणारे लोक लक्षाधीश झाले आहेत.

गडचिरोली : १९९२ मध्ये दारूबंदी करण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राजरोसपणे प्रत्येक गावात दारूची अवैध विक्री सुरू आहे. दारूविक्रीच्या भरवशावर या व्यवसायात काम करणारे लोक लक्षाधीश झाले आहेत. दारूमुळे अनेकांचे संसार उद्धस्त झाले असून अवैध दारू विक्रीतून खरेदी केलेली बनावटी दारू पिल्याने आजारामुळे अनेकांचा मृत्यूही झाला आहे. मात्र राज्य सरकारला अजूनही दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये दारूची अवैध विक्री रोखण्याचे काम नेमके कुणाचे याबाबत निश्चित धोरण तयार करता आलेले नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन हप्ते कमाविण्यासाठी या दारूबंदीचा पुरेपुर फायदा घेत आहेत. तर उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही ग्रहण लागते त्याप्रमाणे वर्षात २-३ धाडी घालून आपला विभाग जिवंत असल्याचे दर्शन जनतेला घडवून देत आहे. १९९२ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय व राणी बंग यांच्या नेतृत्वात दारूबंदीबाबत मोठे आंदोलन झाल्याने राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला. गडचिरोली हा दारूबंदी असलेला राज्यातला दुसरा जिल्हा आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या वर्धा जिल्ह्यातही सरकारने दारूबंदी केली आहे. या दोनही जिल्ह्यात दारूबंदीचे अनुभव अत्यंत बिकट आहे. दारूबंदी असतांनाही राजरोसपणे दारूची विक्री केली जाते. गडचिरोली शहरातून दुचाकी व चारचाकीवर भर दिवसा दारूची वाहतूक केली जाते. दारूचे अवैध विक्रेते कोण याची पूर्ण माहिती गडचिरोली पोलीस प्रशासनाला आहे. गडचिरोली शहरात पोलीस ठाण्याचे अनेक कर्मचारी दररोज या अवैध दारूविक्रेत्यांचे दर्शन घेऊन धन्य होतात. परंतु कधीही या दारूविक्रेंत्यांवर मोठी कारवाई केली जात नाही. कोरचीपासून सिरोंचापर्यंत ८-१० गावे सोडली तर प्रत्येक गावात हमखास अवैध दारूविक्री सुरू आहे. कुरखेडा, कोरची, आरमोरी या भागात बनावटी दारूचे मोठे कारखानेही आहेत. यांच्यावर कारवाई पोलीस प्रशासन करीत नाही. त्यामुळे गडचिरोलीत दारूबंदी असूनही महाराष्ट्रात सर्वाधिक दारूविक्री येथेच होते, असे चित्र आहे. राज्य सरकारने दारूची अवैध विक्री रोखण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनावर सोपविली आहे. वर्धा व गडचिरोली या दोनही जिल्ह्यात पोलीस प्रशासन दारूची अवैध विक्री रोखण्यात अपयशी ठरले आहेत. नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दारूचा पुरवठा येथे केला जातो. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला ३० दुकानांचा वेढा पडलेला आहे. दारूबंदी करणाऱ्या गावातील शौकीन शेजारच्या गावात जाऊन दारू पिऊन येतात, असे चित्र आहे. राज्यसरकारने चंद्रपूरच्या दारूबंदीचा निर्णय करण्यापूर्वी या तिनही जिल्ह्यात दारूबंदीबाबत स्वतंत्ररित्या अंमलबजावणी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. (जिल्हा प्रतिनिधी)