शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

ई-पीक पाहणी सुरूच असताना पुन्हा धान विक्री नाेंदणीची कटकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:40 IST

राज्यात महसूल विभागाने ई-पीक पाहणी ही ऑनलाईन नाेंदणी माेहीम सुरू केली. ही प्रक्रिया पूर्ण होण्याच्या आतच आधारभूत शासकीय खरेदी ...

राज्यात महसूल विभागाने ई-पीक पाहणी ही ऑनलाईन नाेंदणी माेहीम सुरू केली. ही प्रक्रिया पूर्ण होण्याच्या आतच आधारभूत शासकीय खरेदी केंद्रांवर २० सप्टेंबरपासून धान विक्रीसाठी नावनोंदणी करायची असल्याने सन २०२१-२२ मधील चालू वर्षाचा सातबारा देताना तलाठ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शासनाची कोणतीही शासकीय मदत, पीक विमा, पीक कर्ज, खरेदी केंद्रावर धान विकायचे असतील तर ई-पीक पाहणी या ऑनलाइन ॲप्लिकेशनवर आपला पीकपेरा शेतकऱ्यांना चढवायचा आहे. मुळातच या याबद्दल अनेक शेतकरी अनभिज्ञ आहेत. शेतकऱ्यांनी माहिती नाेंदविल्यानंतर ती माहिती तलाठ्यांच्या लाॅगिनवर उपलब्ध हाेईल. तलाठी ही माहिती तपासून काही त्रुटी असल्यास पूर्तता केल्यानंतर सातबारावर अद्ययावत करतील. तलाठ्याला लागवडीचे क्षेत्र, सामायिक खाते, कोरडवाहू की ओलीत, शेतात सिंचनाचे साधन कोणते? विहीर, बोरवेल की अन्य आणखी इतर हे सगळे तपासून नंतर शेतकऱ्यांना सातबारा द्यावा लागणार आहे. मार्केटिंग फेडरेशन धान खरेदी केंद्रावर धान विकण्यासाठी २० सप्टेंबरपासून नोंदणी करायची असल्याने सातबारा घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होणार आहे. ई-पीक पाहणी ॲपवर नाेंदणीची भानगड असतानाच आता धान विक्रीसाठी नाेंदणीची कटकट लागल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

बाॅक्स

अद्ययावत साताबारासाठी ई-पीक नाेंदणी आवश्यक

ई-पीक पाहणी ऑनलाइन ॲपद्वारे पहिल्यांदा शेतकऱ्यांनी नोंदणी करावी व त्यानंतर तलाठ्यांकडून कन्फर्मेशन करून घ्यावे, नंतर धान विक्रीसाठी नोंदणी करावी, तरच शेतकऱ्यांना सन २०२१-२२ चा पीकपेरा चढवलेला सातबारा मिळेल. तलाठी साजांमध्ये शेतकरी गर्दी करतील आणि या गर्दीत बरीच कामे पूर्ण होणार नाहीत. कार्यालयात एकच तारांबळ उडणार आहे. त्यामुळे आधारभूत शासकीय खरेदी केंद्रावर धान्य विक्री करण्यासाठी नोंदणी करण्याची तारीख पुढे ढकलण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

बाॅक्स

फाेटाे अपलाेड करताना अडचणी

जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी अल्पशिक्षित आहेत. प्रत्येकांकडे ॲन्डाॅईड माेबाइल नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी नाेंदणीच केली नाही. जे शेतकरी ॲपवर नाेंदणी करीत आहेत, त्यांना पिकांचा फाेटाे काढून अपलाेड करताना अडचणी येत आहेत. ॲपमधील कॅमेरा ओपन हाेत नाही. तसेच लाेकेशन पकडत नाही. तर कधी ॲपमधील प्राेसेस पूर्णता मागे येत असल्याच्या अडचणी आहेत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.