शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

नियाेजन नसताना नवीन नळ कनेक्शनला पाणी देणार कुठून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:39 IST

कुरूड : देसाईगंज तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कुरूड व काेंढाळा येथे जलजीवन मिशन अंतर्गत नवीन नळ कनेक्शन ...

कुरूड : देसाईगंज तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कुरूड व काेंढाळा येथे जलजीवन मिशन अंतर्गत नवीन नळ कनेक्शन दिले जाणार आहेत. दाेन्ही गावांत दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण हाेते. त्यातच आता पाणीपुरवठ्याबाबत कुठलेही नियाेजन न करता नवीन कनेक्शन दिले जाणार असल्याने गावात पाण्याची टंचाई निर्माण हाेऊन समस्या बिकट हाेण्याची शक्यता आहे. नियाेजन नसताना नवीन नळ कनेक्शनधारकांना पाणी देणार कुठून, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

कुरूड व काेंढाळा येथे वैनगंगा नदीवरून पाणीपुरवठा नळयाेजना कार्यान्वित करण्यात आली आहे. वैनगंगा नदीवर दाेन्ही गावांसाठी स्वतंत्र विहिरींचे खाेदकाम केले आहे. दाेन्ही गावांत प्रत्येकी दाेन जलकुंभांतून पाणीपुरवठा केला जात आहे. कुरूड येथे ७७० नळ कनेक्शन आहेत तर जलजीवन याेजनेच्या नळ कनेक्शनसाठी नवीन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. काेंढाळा येथील लाेकसंख्या ३ हजार ८२६ आहे. गावात सध्या ५६० नळ कनेक्शनधारक आहेत तर नवीन कनेेक्शनसाठी आतापर्यंत ३९५ जणांनी अर्ज केले आहे. येथील पाणीपुरवठा याेजनेची जुनी टाकी ५० हजार लिटर क्षमतेची आहे तर नवीन टाकी पुन्हा तयार केली जात आहे. ग्रामपातळीवरील पाण्याची समस्या लक्षात न घेता व याेग्य नियोजन न करता जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गरजू कुटुंबांना नवीन नळ जोडणी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, उन्हाळा आला की प्रत्येक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. पाण्यासाठी महिला इकडे-तिकडे भटकंती करतात. नळाला आवश्यक प्रमाणात पाणी येत नाही. यामुळे हातपंप,सार्वजनिक विहिरींवर पाण्यासाठी धावपळ करावी लागते. त्यातच नळजाेडणी नसणाऱ्यांना ग्रामपंचायत स्तरावर जलजीवन मिशन अंतर्गत नळ जोडणी दिली जात आहे. मात्र पाण्याचे नियोजनच नसल्याने केवळ नवीन नळ जोडणी देऊन त्याचा काय फायदा? असे नागरिकांमध्ये बाेलले जात आहे.

बाॅक्स

... पिण्याच्या पाण्यासाठी हाेऊ शकते वणवण

कुरू व काेंढाळा येथे यापूर्वीच नळ योजनेच्या माध्यमातून भरपूर नळ जोडण्या देण्यात आल्या. याच नळ जोडणी धारकांना आवश्यक प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नसल्याने ते त्रस्त आहेत. त्यातच पुन्हा पाणीपुरवठा योजनेचे नियोजन न करता नवीन जोडण्या देण्यात आल्या तर अगोदर ज्यांना पाणीपुरवठा व्हायचा त्यांनाही आवश्यक प्रमाणात पाणीपुरवठा होणार नाही व नवीन जोडणीधारकही पाण्यासाठी वणवण फिरून ओरडल्याशिवाय राहणार नाही. नळ योजनेचा फज्जा होऊ नये यासाठी पाणीपुरवठा योजनेद्वारे योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे, असा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे.