शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

नियाेजन नसताना नवीन नळ कनेक्शनला पाणी देणार कुठून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:39 IST

कुरूड : देसाईगंज तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कुरूड व काेंढाळा येथे जलजीवन मिशन अंतर्गत नवीन नळ कनेक्शन ...

कुरूड : देसाईगंज तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कुरूड व काेंढाळा येथे जलजीवन मिशन अंतर्गत नवीन नळ कनेक्शन दिले जाणार आहेत. दाेन्ही गावांत दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण हाेते. त्यातच आता पाणीपुरवठ्याबाबत कुठलेही नियाेजन न करता नवीन कनेक्शन दिले जाणार असल्याने गावात पाण्याची टंचाई निर्माण हाेऊन समस्या बिकट हाेण्याची शक्यता आहे. नियाेजन नसताना नवीन नळ कनेक्शनधारकांना पाणी देणार कुठून, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

कुरूड व काेंढाळा येथे वैनगंगा नदीवरून पाणीपुरवठा नळयाेजना कार्यान्वित करण्यात आली आहे. वैनगंगा नदीवर दाेन्ही गावांसाठी स्वतंत्र विहिरींचे खाेदकाम केले आहे. दाेन्ही गावांत प्रत्येकी दाेन जलकुंभांतून पाणीपुरवठा केला जात आहे. कुरूड येथे ७७० नळ कनेक्शन आहेत तर जलजीवन याेजनेच्या नळ कनेक्शनसाठी नवीन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. काेंढाळा येथील लाेकसंख्या ३ हजार ८२६ आहे. गावात सध्या ५६० नळ कनेक्शनधारक आहेत तर नवीन कनेेक्शनसाठी आतापर्यंत ३९५ जणांनी अर्ज केले आहे. येथील पाणीपुरवठा याेजनेची जुनी टाकी ५० हजार लिटर क्षमतेची आहे तर नवीन टाकी पुन्हा तयार केली जात आहे. ग्रामपातळीवरील पाण्याची समस्या लक्षात न घेता व याेग्य नियोजन न करता जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गरजू कुटुंबांना नवीन नळ जोडणी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, उन्हाळा आला की प्रत्येक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. पाण्यासाठी महिला इकडे-तिकडे भटकंती करतात. नळाला आवश्यक प्रमाणात पाणी येत नाही. यामुळे हातपंप,सार्वजनिक विहिरींवर पाण्यासाठी धावपळ करावी लागते. त्यातच नळजाेडणी नसणाऱ्यांना ग्रामपंचायत स्तरावर जलजीवन मिशन अंतर्गत नळ जोडणी दिली जात आहे. मात्र पाण्याचे नियोजनच नसल्याने केवळ नवीन नळ जोडणी देऊन त्याचा काय फायदा? असे नागरिकांमध्ये बाेलले जात आहे.

बाॅक्स

... पिण्याच्या पाण्यासाठी हाेऊ शकते वणवण

कुरू व काेंढाळा येथे यापूर्वीच नळ योजनेच्या माध्यमातून भरपूर नळ जोडण्या देण्यात आल्या. याच नळ जोडणी धारकांना आवश्यक प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नसल्याने ते त्रस्त आहेत. त्यातच पुन्हा पाणीपुरवठा योजनेचे नियोजन न करता नवीन जोडण्या देण्यात आल्या तर अगोदर ज्यांना पाणीपुरवठा व्हायचा त्यांनाही आवश्यक प्रमाणात पाणीपुरवठा होणार नाही व नवीन जोडणीधारकही पाण्यासाठी वणवण फिरून ओरडल्याशिवाय राहणार नाही. नळ योजनेचा फज्जा होऊ नये यासाठी पाणीपुरवठा योजनेद्वारे योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे, असा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे.