शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नियाेजन नसताना नवीन नळ कनेक्शनला पाणी देणार कुठून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:39 IST

कुरूड : देसाईगंज तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कुरूड व काेंढाळा येथे जलजीवन मिशन अंतर्गत नवीन नळ कनेक्शन ...

कुरूड : देसाईगंज तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कुरूड व काेंढाळा येथे जलजीवन मिशन अंतर्गत नवीन नळ कनेक्शन दिले जाणार आहेत. दाेन्ही गावांत दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण हाेते. त्यातच आता पाणीपुरवठ्याबाबत कुठलेही नियाेजन न करता नवीन कनेक्शन दिले जाणार असल्याने गावात पाण्याची टंचाई निर्माण हाेऊन समस्या बिकट हाेण्याची शक्यता आहे. नियाेजन नसताना नवीन नळ कनेक्शनधारकांना पाणी देणार कुठून, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

कुरूड व काेंढाळा येथे वैनगंगा नदीवरून पाणीपुरवठा नळयाेजना कार्यान्वित करण्यात आली आहे. वैनगंगा नदीवर दाेन्ही गावांसाठी स्वतंत्र विहिरींचे खाेदकाम केले आहे. दाेन्ही गावांत प्रत्येकी दाेन जलकुंभांतून पाणीपुरवठा केला जात आहे. कुरूड येथे ७७० नळ कनेक्शन आहेत तर जलजीवन याेजनेच्या नळ कनेक्शनसाठी नवीन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. काेंढाळा येथील लाेकसंख्या ३ हजार ८२६ आहे. गावात सध्या ५६० नळ कनेक्शनधारक आहेत तर नवीन कनेेक्शनसाठी आतापर्यंत ३९५ जणांनी अर्ज केले आहे. येथील पाणीपुरवठा याेजनेची जुनी टाकी ५० हजार लिटर क्षमतेची आहे तर नवीन टाकी पुन्हा तयार केली जात आहे. ग्रामपातळीवरील पाण्याची समस्या लक्षात न घेता व याेग्य नियोजन न करता जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गरजू कुटुंबांना नवीन नळ जोडणी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, उन्हाळा आला की प्रत्येक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. पाण्यासाठी महिला इकडे-तिकडे भटकंती करतात. नळाला आवश्यक प्रमाणात पाणी येत नाही. यामुळे हातपंप,सार्वजनिक विहिरींवर पाण्यासाठी धावपळ करावी लागते. त्यातच नळजाेडणी नसणाऱ्यांना ग्रामपंचायत स्तरावर जलजीवन मिशन अंतर्गत नळ जोडणी दिली जात आहे. मात्र पाण्याचे नियोजनच नसल्याने केवळ नवीन नळ जोडणी देऊन त्याचा काय फायदा? असे नागरिकांमध्ये बाेलले जात आहे.

बाॅक्स

... पिण्याच्या पाण्यासाठी हाेऊ शकते वणवण

कुरू व काेंढाळा येथे यापूर्वीच नळ योजनेच्या माध्यमातून भरपूर नळ जोडण्या देण्यात आल्या. याच नळ जोडणी धारकांना आवश्यक प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नसल्याने ते त्रस्त आहेत. त्यातच पुन्हा पाणीपुरवठा योजनेचे नियोजन न करता नवीन जोडण्या देण्यात आल्या तर अगोदर ज्यांना पाणीपुरवठा व्हायचा त्यांनाही आवश्यक प्रमाणात पाणीपुरवठा होणार नाही व नवीन जोडणीधारकही पाण्यासाठी वणवण फिरून ओरडल्याशिवाय राहणार नाही. नळ योजनेचा फज्जा होऊ नये यासाठी पाणीपुरवठा योजनेद्वारे योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे, असा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे.