शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

लोह प्रकल्पाचे घोडे अडले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 01:29 IST

जिल्ह्याला औद्योगिक नकाशावर आणण्याची ताकद असणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित कोनसरी लोह प्रकल्पाच्या उभारणीचे स्वप्न जिल्ह्यातील तमाम बेरोजगारांना गेल्या वर्षभरापासून पडत आहे. परंतू त्यांचे हे स्वप्न ‘दिवास्वप्न’ तर ठरणार नाही ना, अशी शंका कधीकधी आल्याशिवाय राहात नाही.

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याला औद्योगिक नकाशावर आणण्याची ताकद असणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित कोनसरी लोह प्रकल्पाच्या उभारणीचे स्वप्न जिल्ह्यातील तमाम बेरोजगारांना गेल्या वर्षभरापासून पडत आहे. परंतू त्यांचे हे स्वप्न ‘दिवास्वप्न’ तर ठरणार नाही ना, अशी शंका कधीकधी आल्याशिवाय राहात नाही. ज्या धडाक्यात या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचे काम खुद्द मुख्यमंत्र्यांनी केले होते तेवढ्या धडाक्यात पुढील कामे झाली नाहीत, ही वास्तविकता नाकारता येत नाही. अर्थात त्यासाठी सरकारी यंत्रणेचा ढिसाळपणा कारणीभूत असला तरी ज्या सरकारच्या अधिपत्याखाली ही यंत्रणा काम करत आहे त्या सरकारवर ही जबाबदारी येते.जिल्ह्याच्या सुरजागड पहाडावरील लोह, मँगनिजसारख्या खनिजातून उभ्या राहणाºया मोठ्या कारखान्यामुळे जिल्ह्यातील अनेक समस्या मार्गी लागणार आहेत. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने रविवारी गडचिरोलीत आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही आपल्या भाषणात हा मुद्दा मांडताना प्रकल्प उभारणीच्या कामाला विलंब होत असल्यामुळे बेरोजगारीची समस्या वाढल्याचा आरोप केला. या मुद्द्यात निश्चितच तथ्य आहे. जिल्ह्यात नक्षलवाद फोफावण्यामागेही बेरोजगारीचे कारण बºयाच अंशी कारणीभूत आहे. त्यामुळे लोहप्रकल्प असो की कोणताही रोजगार देणारा उद्योग असो, तरुणांच्या हाताला काम हवे आहे. नक्षलच्या समस्येमुळे इतर कोणत्याही कंपन्या या जिल्ह्यात येणार नाहीत, पण जी आली तिलाही सहकार्य मिळाले नाही तर ही कंपनी जिल्ह्यात काढता पाय घेतल्याशिवाय राहणार नाही.लॉयड्स मेटल्स या कंपनीला लोहप्रकल्पाची लिज काँग्रेसच्याच काळात मिळाली असली तरी कोनसरीच्या लोहप्रकल्पासाठी जागा देण्यापासून तर भूमिपूजनापर्यंतची कामे विद्यमान भाजप सरकारच्याच काळात झाली आहेत. त्यामुळे प्रकल्पाची उभारणी झाल्यास त्याचे श्रेय घेण्याची संधी भाजपला मिळू शकते. पण सहा महिन्यांपूर्वी जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली असताना आता प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीचे घोडे कुठे अडले हे समजायला मार्ग नाही. हा प्रकल्प जरी खासगी कंपनीचा असला तरी प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करण्याची हमी स्वत: मुख्यमंत्र्यांनी जाहीर भाषणातून दिली होती हे विसरता येत नाही. प्रकल्प जेवढ्या लवकर पूर्ण होईल तेवढे त्याचे श्रेय स्थानिक नेत्यांना घेता येईल. पण जितका विलंब होईल तितका त्याचा फटकाही सहन करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.प्रकल्पाच्या उभारणीअभावी लॉयड्स कंपनीला सुरजागडमधून काढलेले लोहखनिज चंद्रपूर जिल्ह्यातील आपल्या प्रकल्पात न्यावे लागत आहे. यातून सरकारला महसूल आणि स्थानिक बेरोजगारांना कामही मिळत आहे. पण अनेक वेळा नक्षली इशाºयांचे अडथळे असतात. त्यामुळे जितके दिवस काम सुरू राहील तेवढेच दिवस रोजगार मिळतो. पोलिसांच्या योग्य बंदोबस्तामुळे हे काम सुरळीत होत आहे. परंतु हे काम पूर्णपणे भयमुक्त वातावरणात होणे गरजेचे आहे.राज्याच्या गृह विभागाने सुरजागड पहाडावर पोलीस चौकीसाठी जागा दिली असली तरी चौकीच्या बांधकामापासून तर आवश्यक मनुष्यबळ मंजूर करण्यापर्यंतच्या कामांना मार्गी लावण्याची जबाबदारीही गृह विभागाची आहे. या भागात पोलिसांचे प्रस्थ वाढणे म्हणजे एका दगडात दोन पक्षीमारले जाऊ शकतात. त्यामुळे हे काम मार्गी लागण्यासाठी गृह विभागाने योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.