शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

खडतर प्रवास संपणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 22:31 IST

तालुक्यातील वडधा परिसरातील नागरिकांना जिल्हा मुख्यालय गाठण्यासाठी वडधा-पोर्ला मार्गाने जावे लागते. परंतु या मार्गाची दुरवस्था झाल्याने या मार्गावरून प्रवास अत्यंत त्रासदायक ठरत आहे. दरवर्षी केवळ या मार्गाची डागडुजी केली जाते. परंतु नूतनीकरण केले जात नाही.

ठळक मुद्देवडधा-पोर्ला मार्गाची दुरवस्था : दरवर्षी उन्हाळ्यात होते केवळ डागडुजी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील वडधा परिसरातील नागरिकांना जिल्हा मुख्यालय गाठण्यासाठी वडधा-पोर्ला मार्गाने जावे लागते. परंतु या मार्गाची दुरवस्था झाल्याने या मार्गावरून प्रवास अत्यंत त्रासदायक ठरत आहे. दरवर्षी केवळ या मार्गाची डागडुजी केली जाते. परंतु नूतनीकरण केले जात नाही. त्यामुळे या मार्गावरील खडतर प्रवास संपणार कधी, असा सवाल नागरिक करीत आहेत.११ किमीचे अंतर असलेल्या या मार्गावरून पोर्लापासून वडधाकडे येत असताना सुरुवातीचा दोन किमीचा मार्ग आणि वडधाकडून पोर्लाकडे जात असताना दोन ते तीन किलोमीटरचा रस्ता सुस्थितीत आहे. मात्र मध्यंतरी जवळपास पाच ते सहा किलोमीटरचे अंतर अत्यंत खडतर आहे. या मार्गावरून प्रवास करत असताना वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील लोकप्रतिनिधी या मार्गाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे कोणताही पुढाकार घेत नसल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र रोष आहे.या मार्गाची दरवर्षी प्रशासनाकडून थातूरमातूर डागडूजी करून वेळ निभावून नेली जाते. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. दरवर्षी या मार्गावर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र उपाययोजना पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने शासनाच्या निधीचा विल्हेवाट लावण्याचा प्रकार अवलंबिला जातो.प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. या भागातील जनतेसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. खडतर मागार्मुळे अनेक चारचाकी वाहने भंगार होत आहेत. त्यामुळे या मार्गाचे नूतनीकरण करावे, असे मागणी नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे या मार्गावरून दुचाकी चारचाकीसह मोठ्या प्रमाणात जड वाहतूक केली जाते. यादृष्टीने सदर मार्ग मजबूत असणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींकडे सदर समस्या मांडूनही ते या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. जि.प. बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या मार्गाचे नूतनीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.लोकप्रतिनिधींचेही आवागमनवडधा परिसरात विविध कामानिमित्त अथवा दौºयानिमित्त बाहेरील लोकप्रतिनिधी याच मार्गाने येतात. शिवाय वडधा परिसरातील लोकप्रतिनिधी याच मार्गाने ये-जा करीत असतात. त्यांना या रस्त्याची दुरवस्था दिसून येत नाही काय, असा सवाल नागरिक करीत आहेत. लोकप्रतिनिधींनी रस्त्याच्या नूतनीकरणाचा पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा