शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

खडतर प्रवास संपणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 22:31 IST

तालुक्यातील वडधा परिसरातील नागरिकांना जिल्हा मुख्यालय गाठण्यासाठी वडधा-पोर्ला मार्गाने जावे लागते. परंतु या मार्गाची दुरवस्था झाल्याने या मार्गावरून प्रवास अत्यंत त्रासदायक ठरत आहे. दरवर्षी केवळ या मार्गाची डागडुजी केली जाते. परंतु नूतनीकरण केले जात नाही.

ठळक मुद्देवडधा-पोर्ला मार्गाची दुरवस्था : दरवर्षी उन्हाळ्यात होते केवळ डागडुजी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील वडधा परिसरातील नागरिकांना जिल्हा मुख्यालय गाठण्यासाठी वडधा-पोर्ला मार्गाने जावे लागते. परंतु या मार्गाची दुरवस्था झाल्याने या मार्गावरून प्रवास अत्यंत त्रासदायक ठरत आहे. दरवर्षी केवळ या मार्गाची डागडुजी केली जाते. परंतु नूतनीकरण केले जात नाही. त्यामुळे या मार्गावरील खडतर प्रवास संपणार कधी, असा सवाल नागरिक करीत आहेत.११ किमीचे अंतर असलेल्या या मार्गावरून पोर्लापासून वडधाकडे येत असताना सुरुवातीचा दोन किमीचा मार्ग आणि वडधाकडून पोर्लाकडे जात असताना दोन ते तीन किलोमीटरचा रस्ता सुस्थितीत आहे. मात्र मध्यंतरी जवळपास पाच ते सहा किलोमीटरचे अंतर अत्यंत खडतर आहे. या मार्गावरून प्रवास करत असताना वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील लोकप्रतिनिधी या मार्गाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे कोणताही पुढाकार घेत नसल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र रोष आहे.या मार्गाची दरवर्षी प्रशासनाकडून थातूरमातूर डागडूजी करून वेळ निभावून नेली जाते. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. दरवर्षी या मार्गावर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र उपाययोजना पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने शासनाच्या निधीचा विल्हेवाट लावण्याचा प्रकार अवलंबिला जातो.प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. या भागातील जनतेसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. खडतर मागार्मुळे अनेक चारचाकी वाहने भंगार होत आहेत. त्यामुळे या मार्गाचे नूतनीकरण करावे, असे मागणी नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे या मार्गावरून दुचाकी चारचाकीसह मोठ्या प्रमाणात जड वाहतूक केली जाते. यादृष्टीने सदर मार्ग मजबूत असणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींकडे सदर समस्या मांडूनही ते या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. जि.प. बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या मार्गाचे नूतनीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.लोकप्रतिनिधींचेही आवागमनवडधा परिसरात विविध कामानिमित्त अथवा दौºयानिमित्त बाहेरील लोकप्रतिनिधी याच मार्गाने येतात. शिवाय वडधा परिसरातील लोकप्रतिनिधी याच मार्गाने ये-जा करीत असतात. त्यांना या रस्त्याची दुरवस्था दिसून येत नाही काय, असा सवाल नागरिक करीत आहेत. लोकप्रतिनिधींनी रस्त्याच्या नूतनीकरणाचा पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा