शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

पुलांची उंची वाढणार केव्हा?

By admin | Updated: June 26, 2017 01:14 IST

अहेरी उपविभागातील गडअहेरी, पर्लकोटा, दिना नदीवरील पूल ठेंगणे असल्याने पावसाळ्यात अनेकदा पुलावरून पाणी वाहत असते.

दुर्लक्ष : गडअहेरी, पर्लकोटा, दिना नदीवरील वाहतूक पावसाळ्यात बंद लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : अहेरी उपविभागातील गडअहेरी, पर्लकोटा, दिना नदीवरील पूल ठेंगणे असल्याने पावसाळ्यात अनेकदा पुलावरून पाणी वाहत असते. परिणामी या भागातील जनजीवन विस्कळीत होऊन वाहतूक सलग आठवडाभर ठप्प असते. त्यामुळे तिन्ही नदीवरील पुलांची उंची वाढवावी, अशी मागणी उपविभागातील सामाजिक संघटनांनी केली आहे. गडअहेरी नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्याने वारंवार पावसाळ्यात या भागाला फटका असत असतो. पुरामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत होऊन संपर्क तुटत असतो. जीवनावश्यक वस्तूंचाही पुरवठा या कालावधीत शेकडो गावांना होत नाही. तालुक्यातील शेकडो गावे पुरामुळे बाधित होतात. दिना नदीवरील पुलामुळे अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा तालुक्यातील वाहतुकीचे मार्ग बंद होत असतात. अशा स्थितीत सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. भामरागड येथील पर्लकोटा नदीवरील कमी उंचीच्या पुलामुळे दुर्गम भागात अनेक समस्या निर्माण होतात. या भागातील नागरिकांना या कमी उंचीच्या पुलामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. सदर तिन्ही पूल या भागातील विकासास अडसर ठरत आहे. पुलांची उंची वाढविण्याच्या मागणीसाठी वारंवार अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आंदोलने करण्यात आली. या संदर्भात यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनाही अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र शासनाने लक्ष दिले नाही. कमी उंचीच्या पुलामुळे उपविभागातील पाच तालुक्यांचा संपर्क पावसाळ्यात तुटत असतो. अनेकदा आठवडाभर गावांचा संपर्क तुटत असतो. त्यामुळे गडअहेरी, पर्लकोट, दिना नदीवरील पुलांची उंची वाढवावी, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.