शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

पुलांची उंची वाढणार केव्हा?

By admin | Updated: June 26, 2017 01:14 IST

अहेरी उपविभागातील गडअहेरी, पर्लकोटा, दिना नदीवरील पूल ठेंगणे असल्याने पावसाळ्यात अनेकदा पुलावरून पाणी वाहत असते.

दुर्लक्ष : गडअहेरी, पर्लकोटा, दिना नदीवरील वाहतूक पावसाळ्यात बंद लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : अहेरी उपविभागातील गडअहेरी, पर्लकोटा, दिना नदीवरील पूल ठेंगणे असल्याने पावसाळ्यात अनेकदा पुलावरून पाणी वाहत असते. परिणामी या भागातील जनजीवन विस्कळीत होऊन वाहतूक सलग आठवडाभर ठप्प असते. त्यामुळे तिन्ही नदीवरील पुलांची उंची वाढवावी, अशी मागणी उपविभागातील सामाजिक संघटनांनी केली आहे. गडअहेरी नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्याने वारंवार पावसाळ्यात या भागाला फटका असत असतो. पुरामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत होऊन संपर्क तुटत असतो. जीवनावश्यक वस्तूंचाही पुरवठा या कालावधीत शेकडो गावांना होत नाही. तालुक्यातील शेकडो गावे पुरामुळे बाधित होतात. दिना नदीवरील पुलामुळे अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा तालुक्यातील वाहतुकीचे मार्ग बंद होत असतात. अशा स्थितीत सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. भामरागड येथील पर्लकोटा नदीवरील कमी उंचीच्या पुलामुळे दुर्गम भागात अनेक समस्या निर्माण होतात. या भागातील नागरिकांना या कमी उंचीच्या पुलामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. सदर तिन्ही पूल या भागातील विकासास अडसर ठरत आहे. पुलांची उंची वाढविण्याच्या मागणीसाठी वारंवार अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आंदोलने करण्यात आली. या संदर्भात यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनाही अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र शासनाने लक्ष दिले नाही. कमी उंचीच्या पुलामुळे उपविभागातील पाच तालुक्यांचा संपर्क पावसाळ्यात तुटत असतो. अनेकदा आठवडाभर गावांचा संपर्क तुटत असतो. त्यामुळे गडअहेरी, पर्लकोट, दिना नदीवरील पुलांची उंची वाढवावी, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.