शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सर्वांना सानुग्रह अनुदान मिळाले आम्हाला कधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:35 IST

गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील ७० टक्क्यांहून अधिक शेतकरी नियमित कर्जफेड करीत असून शासनाने कर्जमाफी करताना नियमित कर्जफेड करणाऱ्यांना सानुग्रह अनुदान ...

गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील ७० टक्क्यांहून अधिक शेतकरी नियमित कर्जफेड करीत असून शासनाने कर्जमाफी करताना नियमित कर्जफेड करणाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घाेषणा केली हाेती. याला आता दाेन वर्ष होऊनही शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात आले नाही. कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना शासनाने जाहीर केलेली मदत अजूनपर्यंत न मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. शासनाने तातडीने सानुग्रह अनुदान उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

विविध घटकांना अनुदान देण्यासाठी शासनाकडे पैसे आहेत. मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत काय, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही त्यांचे कर्ज माफ केले. मात्र जे शेतकरी कर्जाचा नियमित भरणा करतात. त्यांना मात्र वंचित ठेवले आहे. नियमित कर्ज भरून गुन्हा केला काय, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.