शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

ग्रामपंचायतीच्या विद्युत बिलाचा मार्ग झाला मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:22 IST

कोरोना महामारीमुळे राज्याची आर्थिक स्थिती ढबघाईस आली असल्याचे लक्षात घेता स्थानिक गावपातळीवरील ग्रामपंचायतींनी पथदिवे व पाणीपुरवठा योजनेचे विद्युतबिल १५व्या ...

कोरोना महामारीमुळे राज्याची आर्थिक स्थिती ढबघाईस आली असल्याचे लक्षात घेता स्थानिक गावपातळीवरील ग्रामपंचायतींनी पथदिवे व पाणीपुरवठा योजनेचे विद्युतबिल १५व्या वित्त आयोगातून भरण्यास ग्रामविकास मंत्रालयाने मुभा दिली होती. मात्र अनेक ग्रामपंचायतींनी १५व्या वित्त आयोगातून उपलब्ध निधी अनेक विकास कामांवर खर्च केल्याने व विकास आराखडा तयार करून अनेक विकासात्मक कामाचे नियोजन केले असल्याने थकीत असलेल्या वीजबिलापोटीची लाखो रुपयाची रक्कम भरायची कुठून? अशा द्विधा मनःस्थितीत सापडले होते. दरम्यान, अनेक ग्रामपंचायतींनी थकीत वीजबिल भरले नसल्याने पथदिव्यांचा व पाणीपुरवठा योजनेचा विद्युतपुरवठा खंडित करण्याच्या सपाटा लावला होता. ही बाब ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार कृष्णा गजबे यांच्या निदर्शनास आणून देताच आमदार गजबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून येथील समस्या अवगत करून दिली. स्थानिक पथदिव्याचे विद्युतबिल व ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे थकीत वीजबिल अदा करून खंडित केलेला विद्युतपुरवठा तत्काळ पूर्ववत करण्याचे आदेश दिलेत. यामुळे स्थानिक ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळाला, अशी माहिती आ. गजबे यांनी दिली आहे.