शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

लोकसहभागातूनच जलसमृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 22:32 IST

पाणी हेच जीवन आहे. सद्यस्थितीचा विचार करता पाण्याची दुर्भिक्षता फारच गंभीर होत चालली आहे. भूजल पातळी वेगाने खाली जात आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : जलजागृती सप्ताहाचा समारोप

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : पाणी हेच जीवन आहे. सद्यस्थितीचा विचार करता पाण्याची दुर्भिक्षता फारच गंभीर होत चालली आहे. भूजल पातळी वेगाने खाली जात आहे. तेव्हा पाण्याचे संवर्धन करण्यासाठी लोकसहभागातून जलसमृध्दीकडे जाण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलजागृती सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम गुरूवारी झाला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, समाजसेवक देवाजी तोफा, प्राचार्य सविता सादमवार, प्राचार्य संजय नार्लावार, मनोहर हेपट, संदीप लांजेवार, कार्यकारी अभियंता अ.अ. मेश्राम आदी उपस्थित होते.लोकांपर्यंत पोहचून जनआंदोलनाच्या माध्यमाने जल जागृतीपर संदेश द्या, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांना जिल्हाधिकाºयांनी निर्देश दिले. पाण्याचा गैरवापर टाळून मोजक्याच पाण्याने आपली गरज भागवा असेही आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी समाजसेवक देवाजी तोफा बोलतांना म्हणाले की,&‘आम्ही भारताचे लोक’ जलसंवर्धन करण्यासाठी कुठेतरी कमी पडत आहोत. पाण्याचे नियोजन चुकत असल्यामुळे येणारा काळ भयंकर स्वरुपाचा असेल याची जाणीव आजच होत आहे. त्यामुळे पाण्याच्या नियोजनात महिलांचा सहभाग गरजेचा आहे. सर्वांच्या मनस्थितीत बदल झाल्याशिवाय परिस्थीतीत बदल होणार नाही, असे आवाहनात्मक मत व्यक्त केले.प्राचार्य सविता सादमवार म्हणाल्या की, मनाने एखादी गोष्ट स्विकारत नाही तोपर्यंत कोणत्याही कार्याला यश येत नाही. आपल्या भौतिक सुखासाठी निसर्गाला मानव ओरबाडून नियम तोडत आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा या म्हणीचा अर्थ आम्ही समजून घेतला नाही तर २०५० पर्यंत पृथ्वीला वाळवंटाचा ग्रह म्हणून ओळखला जाईल असा इशारा त्यांनी दिला. संचालन डी. वाय. भांडेकर यांनी तर आभार सहायक अभियंता डी. डी. समर्थ यांनी मानले.विजेत्या स्पर्धकांचा गौरवजलजागृती सप्ताह १६ मार्च २०१४ ते २२ मार्च २०१८ या कालावधीत राबविण्यात आला. यादरम्यान निबंध स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रथम विजेता आदित्य जयदेव गेडाम, व्दितीय प्रतिक्षा यशवत गोडणे आणि तेजस तानाजी भेंडारे व तृतीय ओम अशोक पुन्नमवार यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार झाला.