शहरं
Join us  
Trending Stories
1
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
2
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
3
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
4
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
5
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
6
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
7
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
8
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
9
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
10
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
11
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
12
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
13
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
14
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
15
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
16
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
17
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
18
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
19
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
20
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...

लोकसहभागातूनच जलसमृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 22:32 IST

पाणी हेच जीवन आहे. सद्यस्थितीचा विचार करता पाण्याची दुर्भिक्षता फारच गंभीर होत चालली आहे. भूजल पातळी वेगाने खाली जात आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : जलजागृती सप्ताहाचा समारोप

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : पाणी हेच जीवन आहे. सद्यस्थितीचा विचार करता पाण्याची दुर्भिक्षता फारच गंभीर होत चालली आहे. भूजल पातळी वेगाने खाली जात आहे. तेव्हा पाण्याचे संवर्धन करण्यासाठी लोकसहभागातून जलसमृध्दीकडे जाण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलजागृती सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम गुरूवारी झाला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, समाजसेवक देवाजी तोफा, प्राचार्य सविता सादमवार, प्राचार्य संजय नार्लावार, मनोहर हेपट, संदीप लांजेवार, कार्यकारी अभियंता अ.अ. मेश्राम आदी उपस्थित होते.लोकांपर्यंत पोहचून जनआंदोलनाच्या माध्यमाने जल जागृतीपर संदेश द्या, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांना जिल्हाधिकाºयांनी निर्देश दिले. पाण्याचा गैरवापर टाळून मोजक्याच पाण्याने आपली गरज भागवा असेही आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी समाजसेवक देवाजी तोफा बोलतांना म्हणाले की,&‘आम्ही भारताचे लोक’ जलसंवर्धन करण्यासाठी कुठेतरी कमी पडत आहोत. पाण्याचे नियोजन चुकत असल्यामुळे येणारा काळ भयंकर स्वरुपाचा असेल याची जाणीव आजच होत आहे. त्यामुळे पाण्याच्या नियोजनात महिलांचा सहभाग गरजेचा आहे. सर्वांच्या मनस्थितीत बदल झाल्याशिवाय परिस्थीतीत बदल होणार नाही, असे आवाहनात्मक मत व्यक्त केले.प्राचार्य सविता सादमवार म्हणाल्या की, मनाने एखादी गोष्ट स्विकारत नाही तोपर्यंत कोणत्याही कार्याला यश येत नाही. आपल्या भौतिक सुखासाठी निसर्गाला मानव ओरबाडून नियम तोडत आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा या म्हणीचा अर्थ आम्ही समजून घेतला नाही तर २०५० पर्यंत पृथ्वीला वाळवंटाचा ग्रह म्हणून ओळखला जाईल असा इशारा त्यांनी दिला. संचालन डी. वाय. भांडेकर यांनी तर आभार सहायक अभियंता डी. डी. समर्थ यांनी मानले.विजेत्या स्पर्धकांचा गौरवजलजागृती सप्ताह १६ मार्च २०१४ ते २२ मार्च २०१८ या कालावधीत राबविण्यात आला. यादरम्यान निबंध स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रथम विजेता आदित्य जयदेव गेडाम, व्दितीय प्रतिक्षा यशवत गोडणे आणि तेजस तानाजी भेंडारे व तृतीय ओम अशोक पुन्नमवार यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार झाला.