शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

दुष्काळातही पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: September 15, 2015 03:35 IST

यावर्षी सरासरीपेक्षा ५० टक्क्याहून पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक भागातील विहिरी अजूनही

गडचिरोली : यावर्षी सरासरीपेक्षा ५० टक्क्याहून पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक भागातील विहिरी अजूनही तळ गाठूनच आहेत. अनेक गावांचे मालगुजारी तलावही भरलेले नाही. त्यामुळे नद्यांचे पात्र पाण्याऐवजी रेतीने भरलेले दिसतात. अशा परिस्थितीत पाणी जपून वापरावे लागणार आहे. नाहीतर यावर्षीच्या उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई भासणार आहे. अशी परिस्थिती असतानाही गडचिरोली, आरमोरी, अहेरी, चामोर्शी, वैरागड शहरासह अनेक भागात लोकमत चमूने सोमवारी पाहणी केली. या पाहणीत पाईपलाईनमध्ये असलेले लिकेज तसेच पाईपलाईनजवळ असलेले व्हॉल्व यामधून शेकडो लिटर पाणी दररोज वाया जात असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. मात्र या संदर्भात कुणालाही फारसे गांभिर्य नाही, असे दिसून येत आहे. जिल्हा मुख्यालयासह तालुका मुख्यालयात वाहन धुण्यासाठी नागरिक तसेच व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय करीत असल्याचे दिसून आले.गाडी धुण्यासाठी हजारो लिटर पाणी वाया४गडचिरोली शहरात वाहन धूवून देणारे चार ते पाच व्यावसायिक आहेत. तालुका मुख्यालयाच्या ठिकाणीही अशा दुकानांची एकूण संख्या २४ ते २५ च्या घरात आहे. दररोज विहीर, बोअरवेल, नळ यांचे पाणी वापरून वाहन धुण्याचे काम यांच्या माध्यमातून केले जाते. दिवसाला किमान गडचिरोली शहरात ५० ते ६० वाहने धुतले जातात. तालुका मुख्यालयात याची संख्या १० च्या घरात आहे. एक वाहन धुण्यासाठी साधारणत: १० मिनिटाचा कालावधी लागतो. वाहन धुण्यासाठी जवळजवळ दररोज दोन ते तीन हजार लिटर पाणी सहजपणे वाया जाते. याशिवाय अनेक नागरिक सकाळी नगर पालिका, नगर पंचायती व ग्रामपंचायतीचे नळ आल्यावर तसेच आपल्या खासगी पाणी साधनावरून वाहन घरीच धुतात. रस्त्यावर व नाल्यांमध्ये वाहन धुतल्याचे पाणी सोडून देतात. यामुळेही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे.पोलीस ठाण्याजवळ गळतीगडचिरोली शहरातील शहर पोलीस ठाण्याजवळ व्हॉल्व बसविण्यात आला आहे. सदर व्हॉल्वमधून वर्षभर पाण्याची गळती होत राहते. या परिसरातील काही दुकानदार जाणूनबुजून व्हॉल्वमध्ये बिघाड निर्माण करून येथील पाणी आपल्या वापरासाठी घेतात. त्यामुळे त्यांना विनामुल्य पाणी उपलब्ध होतो. मात्र पाण्याचा दररोज मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. नगर पालिका प्रशासनाचे शहरातील या प्रकाराकडे दुर्लक्ष झाले आहे.आरमोरीतही व्हॉल्वमधून गळती४आरमोरी शहराला वैनगंगा नदीतून पाणी पुरवठा केला जातो. ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गाच्या बाजुला ही पाईपलाईन टाकली आहे. या पाईपलाईनला व्हॉल्व देण्यात आला आहे. तो वर्षभर गळत राहतो. शेकडो लिटर पाणी परिसरात जमा होऊन राहते. पाण्याच्या या अपव्ययाकडे नगर पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.नगर पालिकेच्या मुख्य वाहिनीला गळती४गडचिरोली शहराला वैनगंगा नदीतून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जातो. दोन किमीच्या पाईपलाईनवर चार व्हॉल्व बसविण्यात आले आहेत. त्यापैकी शुध्दीकरण केंद्रापासून काही दूर अंतरावर असलेल्या वळणावरचा व्हॉल्व लिकेज असून या व्हॉल्वमधून दर दिवशी हजारो लिटर पाणी वाया जात आहे.अहेरीच्या धरमपूर वार्डात लिकेज४अहेरी राजनगरीला नगर पंचायतीचा दर्जा मिळाला आहे. अहेरी शहराला पाणी पुरवठा योजनेतून दररोज पाणी वितरित केले जाते. शहरातील धरमपूर वार्डात मुख्य रस्त्यावर पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जाते. सकाळी व संध्याकाळी पाणी पुरवठा झाल्यास या मार्गावर तळे साचल्यासारखे पाणी रस्त्यावरून वाहत राहते. नगर पंचायतीचे याकडे दुर्लक्ष आहे.