शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

गाडी लोहार समाजाच्या कुटुंबांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:01 IST

शेती मशागतीच्या कामात यंत्राचा वापर होत असला तरी पारंपारिक साहित्याच्या माध्यमातून शेतकरी शेती मशागतीचे काम करीत आहेत. शेतीपयोगी ही अवजारे बनविणारा गाडी लोहार समाज मात्र विकासापासून कोसोदूर आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । पोटाची खळगी भरण्यासाठी आठ महिने धडपड; घनाचे घाव घालून बनवितात विविध वस्तू

सुधीर फरकाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : शेती मशागतीच्या कामात यंत्राचा वापर होत असला तरी पारंपारिक साहित्याच्या माध्यमातून शेतकरी शेती मशागतीचे काम करीत आहेत. शेतीपयोगी ही अवजारे बनविणारा गाडी लोहार समाज मात्र विकासापासून कोसोदूर आहे. तब्बल आठ महिने स्वत:चे गाव व घर सोडून उपजीविका करण्यासाठी या समाजाचे लोक गावोगावी भटकंती करीत असतात.लोखंडापासून कुºहाड, विळा, कोयता, वासला, नांगर, फासा आदीसह बैलबंडीचे साहित्य तयार करण्याचे कौशल्य गाडी लोहार समाजाच्या लोकांमध्ये आहे. मध्य प्रदेशातील गाडी लोहार (राजपूत) समाजाचे लोक गडचिरोली जिल्ह्याच्या आष्टी भागात अशाच कामासाठी दाखल झाले आहेत. लोखंडावर घनाचे घाव घालून महाराष्ट्रासह इतर राज्यात भटकंती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत.मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील शिलवानी तालुक्यातील जमेनिया या गावाचे ५०० ते ६०० कुटुंब आठ महिने उदरनिर्वाहासाठी विविध भागात भटकंती करीत आहेत. स्वत:च्या गावी केवळ चार महिने वास्तव्य केल्यानंतर इतर आठ महिने सदर समाजाच्या कुटुंबांचा संसार उघड्यावर मिळेल त्या ठिकाणी मोकळ्या जागेवर सुरू असतो. त्यांच्या जीवनातील संघर्ष कायम आहे.१०० ते ४०० रुपयांपर्यंत साहित्याचे दरगाडी लोहार बांधवांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू १०० ते ४०० रुपयांपर्यंत विकल्या जातात. कुऱ्हाडीला १०० ते २००, पावशी ८० ते १०० रुपये, विळा ६० ते १०० रुपये, कोयता १५० ते २५० रुपये, वासला १२५ ते २०० व नांगर फासा ३०० ते ४०० रुपये दराने विकले जाते. महागाईच्या युगात त्यांची मिळकत अत्यल्पच आहे.निरागस बालकेही राहतात सोबतगाडी लोहार समाजाचे अनेक कुटुंब आपले संपूर्ण बिºहाड घेऊन परराज्यात व जिल्ह्यात उदरनिर्वाहसाठी भटकंती करतात. दरम्यान त्यांच्यासोबत लहान मुले, मुलीही येतात. आपल्या आई-वडिलासोबत निरागस बालके बिºहाड असलेल्या ठिकाणी खेळत व बागळत असतात. परिणामी प्रसंगी त्यांची शाळाही बुडत असते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुढील पिढीलाही विकासासाठी फारशी संधी मिळत नाही.