शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

गाडी लोहार समाजाच्या कुटुंबांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:01 IST

शेती मशागतीच्या कामात यंत्राचा वापर होत असला तरी पारंपारिक साहित्याच्या माध्यमातून शेतकरी शेती मशागतीचे काम करीत आहेत. शेतीपयोगी ही अवजारे बनविणारा गाडी लोहार समाज मात्र विकासापासून कोसोदूर आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । पोटाची खळगी भरण्यासाठी आठ महिने धडपड; घनाचे घाव घालून बनवितात विविध वस्तू

सुधीर फरकाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : शेती मशागतीच्या कामात यंत्राचा वापर होत असला तरी पारंपारिक साहित्याच्या माध्यमातून शेतकरी शेती मशागतीचे काम करीत आहेत. शेतीपयोगी ही अवजारे बनविणारा गाडी लोहार समाज मात्र विकासापासून कोसोदूर आहे. तब्बल आठ महिने स्वत:चे गाव व घर सोडून उपजीविका करण्यासाठी या समाजाचे लोक गावोगावी भटकंती करीत असतात.लोखंडापासून कुºहाड, विळा, कोयता, वासला, नांगर, फासा आदीसह बैलबंडीचे साहित्य तयार करण्याचे कौशल्य गाडी लोहार समाजाच्या लोकांमध्ये आहे. मध्य प्रदेशातील गाडी लोहार (राजपूत) समाजाचे लोक गडचिरोली जिल्ह्याच्या आष्टी भागात अशाच कामासाठी दाखल झाले आहेत. लोखंडावर घनाचे घाव घालून महाराष्ट्रासह इतर राज्यात भटकंती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत.मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील शिलवानी तालुक्यातील जमेनिया या गावाचे ५०० ते ६०० कुटुंब आठ महिने उदरनिर्वाहासाठी विविध भागात भटकंती करीत आहेत. स्वत:च्या गावी केवळ चार महिने वास्तव्य केल्यानंतर इतर आठ महिने सदर समाजाच्या कुटुंबांचा संसार उघड्यावर मिळेल त्या ठिकाणी मोकळ्या जागेवर सुरू असतो. त्यांच्या जीवनातील संघर्ष कायम आहे.१०० ते ४०० रुपयांपर्यंत साहित्याचे दरगाडी लोहार बांधवांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू १०० ते ४०० रुपयांपर्यंत विकल्या जातात. कुऱ्हाडीला १०० ते २००, पावशी ८० ते १०० रुपये, विळा ६० ते १०० रुपये, कोयता १५० ते २५० रुपये, वासला १२५ ते २०० व नांगर फासा ३०० ते ४०० रुपये दराने विकले जाते. महागाईच्या युगात त्यांची मिळकत अत्यल्पच आहे.निरागस बालकेही राहतात सोबतगाडी लोहार समाजाचे अनेक कुटुंब आपले संपूर्ण बिºहाड घेऊन परराज्यात व जिल्ह्यात उदरनिर्वाहसाठी भटकंती करतात. दरम्यान त्यांच्यासोबत लहान मुले, मुलीही येतात. आपल्या आई-वडिलासोबत निरागस बालके बिºहाड असलेल्या ठिकाणी खेळत व बागळत असतात. परिणामी प्रसंगी त्यांची शाळाही बुडत असते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुढील पिढीलाही विकासासाठी फारशी संधी मिळत नाही.