शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जागोजागी आहेत कचऱ्याचे ढीग

By admin | Updated: November 9, 2014 23:21 IST

गांधी जयंतीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर स्वच्छता अभियान सुरू केले आहे. या अभियानाची सुरूवात गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज रेल्वेस्थानक परिसरात खासदार अशोक नेते

देसाईगंज : गांधी जयंतीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर स्वच्छता अभियान सुरू केले आहे. या अभियानाची सुरूवात गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज रेल्वेस्थानक परिसरात खासदार अशोक नेते व नगराध्यक्ष तसेच भाजप पदाधिकारी यांनी झाडू मारून केली मात्र सध्या देसाईगंज नगर पालिकेची स्वच्छता अभियानाविषयी उदासिनता असल्याने शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहे. ग्रामीण भागात केवळ फोटो सेशनसाठीच हे अभियान सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्वच्छतेकरीता केंद्रशासनापासून तर राज्य शासन देखील जनजागृती करीत असले तरी लोकसहभागामुळे अभियानाला तडा जात आहे़देसाईगंज शहरात १७ वॉर्ड आहेत. यातील अनेक वॉर्ड ग्रामीण भागातील आहेत. या शहरात कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट केली जात नाही. केवळ एक दिवस स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रेल्वे स्थानकाचा परिसर झाडून फोटो सेशन कार्यक्रम झाला. त्यानंतर सारे अलबेल झाले आहे. देसाईगंज शहराच्या आरमोरी मार्गावर तर नगरपालिकेने अघोषीत डस्टयार्ड बनविले आहे़ अभियानात स्वच्छता करीत असतांना गाव स्वच्छ केले जाते. मात्र गावातील कचरा चौकात आणून ठेवला जात असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. गावातील, शहरातील अस्वच्छता आम्ही दूर करणार असल्याची ग्वाही अभियानादरम्यान झाडू पकडतांना कार्यकर्ते देतात़ मात्र कार्यक्रम संपताच झाडू रस्त्यावर फेकला जाते.ग्रामीण भागातील हागणदारी, अस्वच्छता, गलिच्छता दुर करण्यासाठी महाराष्ट्रात तरी कठोर उपाय योजना करण्याची गरज भासत आहे़ घरी शौचालय असतांना देखील ग्रामीण भागात अजूनही उघडयावरच शौचास बसण्याच्या सवय लागलेली आहे़ शहरी तसेच ग्रामीण भागाला अशा अनेक समस्येने ग्रासले आहे़ सर्वसामान्या सोबतच नगरपालिका किंवा ग्रामपंचायत देखील अस्वच्छतेची समस्या वाढीला कारणीभुत आहेत़ स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती होणे आवश्यक आहे. फोटो सेशन करण्यापेक्षा प्रत्यक्ष स्वच्छतेची जाण ठेऊन काम करण्याची गरज पर्यावरणवादी व्यक्त करीत आहे.