शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

जागोजागी आहेत कचऱ्याचे ढीग

By admin | Updated: November 9, 2014 23:21 IST

गांधी जयंतीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर स्वच्छता अभियान सुरू केले आहे. या अभियानाची सुरूवात गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज रेल्वेस्थानक परिसरात खासदार अशोक नेते

देसाईगंज : गांधी जयंतीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर स्वच्छता अभियान सुरू केले आहे. या अभियानाची सुरूवात गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज रेल्वेस्थानक परिसरात खासदार अशोक नेते व नगराध्यक्ष तसेच भाजप पदाधिकारी यांनी झाडू मारून केली मात्र सध्या देसाईगंज नगर पालिकेची स्वच्छता अभियानाविषयी उदासिनता असल्याने शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहे. ग्रामीण भागात केवळ फोटो सेशनसाठीच हे अभियान सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्वच्छतेकरीता केंद्रशासनापासून तर राज्य शासन देखील जनजागृती करीत असले तरी लोकसहभागामुळे अभियानाला तडा जात आहे़देसाईगंज शहरात १७ वॉर्ड आहेत. यातील अनेक वॉर्ड ग्रामीण भागातील आहेत. या शहरात कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट केली जात नाही. केवळ एक दिवस स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रेल्वे स्थानकाचा परिसर झाडून फोटो सेशन कार्यक्रम झाला. त्यानंतर सारे अलबेल झाले आहे. देसाईगंज शहराच्या आरमोरी मार्गावर तर नगरपालिकेने अघोषीत डस्टयार्ड बनविले आहे़ अभियानात स्वच्छता करीत असतांना गाव स्वच्छ केले जाते. मात्र गावातील कचरा चौकात आणून ठेवला जात असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. गावातील, शहरातील अस्वच्छता आम्ही दूर करणार असल्याची ग्वाही अभियानादरम्यान झाडू पकडतांना कार्यकर्ते देतात़ मात्र कार्यक्रम संपताच झाडू रस्त्यावर फेकला जाते.ग्रामीण भागातील हागणदारी, अस्वच्छता, गलिच्छता दुर करण्यासाठी महाराष्ट्रात तरी कठोर उपाय योजना करण्याची गरज भासत आहे़ घरी शौचालय असतांना देखील ग्रामीण भागात अजूनही उघडयावरच शौचास बसण्याच्या सवय लागलेली आहे़ शहरी तसेच ग्रामीण भागाला अशा अनेक समस्येने ग्रासले आहे़ सर्वसामान्या सोबतच नगरपालिका किंवा ग्रामपंचायत देखील अस्वच्छतेची समस्या वाढीला कारणीभुत आहेत़ स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती होणे आवश्यक आहे. फोटो सेशन करण्यापेक्षा प्रत्यक्ष स्वच्छतेची जाण ठेऊन काम करण्याची गरज पर्यावरणवादी व्यक्त करीत आहे.