शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

जागोजागी आहेत कचऱ्याचे ढीग

By admin | Updated: November 9, 2014 23:21 IST

गांधी जयंतीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर स्वच्छता अभियान सुरू केले आहे. या अभियानाची सुरूवात गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज रेल्वेस्थानक परिसरात खासदार अशोक नेते

देसाईगंज : गांधी जयंतीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर स्वच्छता अभियान सुरू केले आहे. या अभियानाची सुरूवात गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज रेल्वेस्थानक परिसरात खासदार अशोक नेते व नगराध्यक्ष तसेच भाजप पदाधिकारी यांनी झाडू मारून केली मात्र सध्या देसाईगंज नगर पालिकेची स्वच्छता अभियानाविषयी उदासिनता असल्याने शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहे. ग्रामीण भागात केवळ फोटो सेशनसाठीच हे अभियान सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्वच्छतेकरीता केंद्रशासनापासून तर राज्य शासन देखील जनजागृती करीत असले तरी लोकसहभागामुळे अभियानाला तडा जात आहे़देसाईगंज शहरात १७ वॉर्ड आहेत. यातील अनेक वॉर्ड ग्रामीण भागातील आहेत. या शहरात कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट केली जात नाही. केवळ एक दिवस स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रेल्वे स्थानकाचा परिसर झाडून फोटो सेशन कार्यक्रम झाला. त्यानंतर सारे अलबेल झाले आहे. देसाईगंज शहराच्या आरमोरी मार्गावर तर नगरपालिकेने अघोषीत डस्टयार्ड बनविले आहे़ अभियानात स्वच्छता करीत असतांना गाव स्वच्छ केले जाते. मात्र गावातील कचरा चौकात आणून ठेवला जात असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. गावातील, शहरातील अस्वच्छता आम्ही दूर करणार असल्याची ग्वाही अभियानादरम्यान झाडू पकडतांना कार्यकर्ते देतात़ मात्र कार्यक्रम संपताच झाडू रस्त्यावर फेकला जाते.ग्रामीण भागातील हागणदारी, अस्वच्छता, गलिच्छता दुर करण्यासाठी महाराष्ट्रात तरी कठोर उपाय योजना करण्याची गरज भासत आहे़ घरी शौचालय असतांना देखील ग्रामीण भागात अजूनही उघडयावरच शौचास बसण्याच्या सवय लागलेली आहे़ शहरी तसेच ग्रामीण भागाला अशा अनेक समस्येने ग्रासले आहे़ सर्वसामान्या सोबतच नगरपालिका किंवा ग्रामपंचायत देखील अस्वच्छतेची समस्या वाढीला कारणीभुत आहेत़ स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती होणे आवश्यक आहे. फोटो सेशन करण्यापेक्षा प्रत्यक्ष स्वच्छतेची जाण ठेऊन काम करण्याची गरज पर्यावरणवादी व्यक्त करीत आहे.