शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अंगणवाडी महिलांचे वेतन थकले

By admin | Updated: December 30, 2014 23:35 IST

अंगणवाडी महिलांना राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे मानधन मागील चार महिन्यांपासून मिळाले नसून त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

गडचिरोली : अंगणवाडी महिलांना राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे मानधन मागील चार महिन्यांपासून मिळाले नसून त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. मानधनाची रक्कम तत्काळ न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा अंगणवाडी महिलांनी पेरमिली येथील मेळाव्यादरम्यान दिला आहे.अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य व केंद्रशासन मिळून मानधन देतात. राज्यशासनाच्यावतीने २ हजार रूपये तर केंद्रशासनाच्यावतीने २ हजार रूपये असे एकूण ४ हजार रूपये मानधन दिल्या जाते. केंद्राचे मानधन प्राप्त झाले आहे. मात्र राज्याकडून मिळणारे मानधन चार महिन्यांचा कालावधी लोटूनही देण्यात आले नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अत्यल्प मानधन दिले जाते. तेही मानधन वेळेवर मिळत नाही. राज्यशासनाकडून कोट्यवधींचा खर्च केला जातो. मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन देण्यासाठी शासनाकडे पैसे उपलब्ध नाहीत काय, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. पेरमिली येथे रेखा येनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेशचंद्र दहिवडे, अंगणवाडी महिला कर्मचारी लतिका दहागावकर, सत्तुबाई येनपरेड्डीवार, ललिता देवतळे, संध्या दहागावकर, काटेश्वरी मुळावार, गिरीजा दुर्गे, बेबी गावळे, शांता कोंडागुर्ले, शांता चांदेकर, जाई गावळे आदी उपस्थित होत्या. राज्यशासनाने थकलेले मानधन तत्काळ उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी दिला आहे. पेरमिली येथे आयोजित मेळाव्याला परिसरातील अनेक अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. दहिवडे यांनी शासनकर्ते बदलले की, सर्व काही बदलते, हा सर्वसामान्य जनतेचा गैरसमज आहे. नेता नाही तर नीती बदलण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केले. (नगर प्रतिनिधी)