शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

कोरोनाच्या संकटात गावकऱ्यांचा मातामायवर भरवसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:39 IST

भेंडाळा परिसरात असलेल्या कान्होली येथील महिलांनी गावापासून ३ किमी अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीवर पायी जाऊन घागर व चरवीमधून ...

भेंडाळा परिसरात असलेल्या कान्होली येथील महिलांनी गावापासून ३ किमी अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीवर पायी जाऊन घागर व चरवीमधून डोक्यावर पाणी आणून गावातील मातामाय, हनुमान मंदिर या ठिकाणी वाहिले जात आहे. ग्रामदैवत असलेल्या मातामायवर महिला भरवसा करीत पूजाअर्चा करीत आहेत; पण ही संकल्पना पुरोगामी विचाराच्या लोकांना न पटण्यासारखी आहे. नागरिकांनी या पद्धतीच्या परंपरेत गुरफटून न राहता कोरोनाबाबत सांगितल्या जात असलेले नियम पाळले तर कोरोनाला दूर ठेवण्यात यश येईल, असे अनेकांना वाटते.

गावात कोणताही धार्मिक कार्यक्रम असला की मातापूजन करण्याची परंपरा आहे तसेच लग्न सोहळ्यापूर्वी मातामायला हळद नेली जात असते. एवढेच नव्हे तर गावातील कोणतेही संकट दूर करण्यासाठी ग्रामस्थ टाळ-मृदंग हाती घेऊन वाजतगाजत दिंडी काढत असतात. यातून आत्मिक समाधान लाभत असते, असा समज आहे. बदलत्या काळानुसार आज सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येत असला तरी पूर्वापार चालत आलेल्या प्रथा, परंपरा आजही ग्रामीण भागात घट्ट बसून आहेत.

सध्या कोरोना संकटाची दुसरी लाट सुरू असून शहरासह ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचा शिरकाव झालेला असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक या रोगाने भयभीत झालेले आहेत. गावात कोरोना संकट येऊच नये, यासाठी महिलांनी पुढाकार घेत माता पूजनचा निर्णय घेत वैनगंगा नदीवरून पाणी आणून मातामायची पूजा केली आहे. असा चार पाच दिवस पूजन चालणार असल्याची माहिती गावांतील महिलांनी दिली. यावेळी शांता चुनारकर, कमल झाडे, नंदा चुनारकर, शोभा चौधरी, नीता चुनारकर, छकुली चुनारकर, सोनी चुनारकर, छाया घोटेकर, पल्लवी चुनारकर, संतोषी झाडे, पारू फाले, ललिता फाले, निर्मला फाले, मालता चुनारकर, शेवंता झरकर, पुष्पा गोहणे, वंदना वडुले, मंदा सोनटक्के, कमला शेंडे, कासू शेंडे उपस्थित होते.

(बॉक्स)

ग्रामदैवतांच्या पूजनाची जुनी परंपरा

गावात कोणतेही संकट येऊ नये यासाठी गावातील ग्रामदैवतांची पूजा करण्याची परंपरा अनादि काळापासून गावखेड्यात आहे. ग्रामीण भागातील शेतशिवारात आजही मातामायची मंदिरे आहेत. काही गावांत पक्के बांधकाम केलेली तर काही गावांत निसर्गाच्या सानिध्यात मातामायचे मंदिरे आहेत. पूर्वी वैद्यकशास्त्र फारसे प्रगत नव्हते त्याकाळात कांजण्या, गोवर यासारखे आजार गावात यायचे. त्यातून रुग्णांची सुधारणा करण्यासाठी तालुकास्थळी जावे लागत असे. अशा परिस्थितीत गावातील ग्रामदैवतांची आराधना केली जायची, असे गावातील जाणकार सांगत असतात.

(बॉक्स)

रोवणी हंगामात पाळतात पोलो

गावात खरीप हंगामातील धान पीक रोवणी हंगाम सुरू झाला की मंगळवार पोलो ही प्रथा आहे. रोवणी कामाला साप्ताहिक सुटी असते. पोलो असतो त्यादिवशी गावातील ग्रामदैवताची पूजाअर्चा केली जाते. किमान पाच मंगळवार पोलो पाळला जातो व शेवटच्या मंगळवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात त्याचा शेवट केला जातो.