शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
3
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
4
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
5
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
6
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
7
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
8
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
9
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
10
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
11
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
12
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
13
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
14
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
15
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
16
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
17
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
18
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
19
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
20
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!

पीक कर्ज वाटपात विदर्भ कोकण ग्रामीण बँक अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:36 IST

पावसाळ्यापूर्वी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु असते. काही शेतकरी शेतीच्या नांगरणीसाठी कामाला लागलेले आहे तर काही शेतीच्या मशागतीची कामे ...

पावसाळ्यापूर्वी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु असते. काही शेतकरी शेतीच्या नांगरणीसाठी कामाला लागलेले आहे तर काही शेतीच्या मशागतीची कामे करीत आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी शेती पेरणीसाठी सज्ज करुन ठेवली जाते. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने व शेतीचे महागडे बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने बँकेकडून पीक कर्ज उचलत असतात. आष्टी येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक, भारतीय स्टेट बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा तीन मुख्य बँका व काही पतसंस्था आहेत. आष्टी परिसरातील इल्लूर, ठाकरी, कुनघाडा, चपराळा, चौडमपल्ली, अनखोडा, उमरी, चंदनखेडी, मार्कंडा, जयरामपूर आदी गावातील शेतकरी या बँकेतून कर्ज घेत असतात. सर्वात जास्त १७२ शेतकऱ्यांना १ काेटी, ३० लाख, ८४ हजाराचे कर्ज विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने वितरित केले आहे. त्यानंतर १५ मे पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २९४ शेतकऱ्यांना १ काेटी, १६ लाख १६ हजार सातशे रूपयांचे कर्ज वाटप केले. तसेच भारतीय स्टेट बँकेने १५ मे पर्यंत सर्वात कमी दोन शेतकऱ्यांना एक लाख २५ हजार रुपये कर्ज वाटप केलेले आहे. शेतकऱ्यांची कर्ज घेण्यासाठी विदर्भ कोकण ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या दोनच बँकेकडे पसंती आहे.