शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

वनोपजातून रोजगार निर्मितीस वाव

By admin | Updated: October 28, 2014 22:57 IST

गडचिरोली जिल्हा विविध जातींच्या वृक्षांनी व्यापलेला आहे. जिल्ह्यातील जंगलात विविध जातीच्या औषधी वनस्पतींची भरमार आहे. परंतु जिल्ह्यात वनोपजावर आधारित उद्योगधंदे नसल्याने येथील युवक

मालेवाडा : गडचिरोली जिल्हा विविध जातींच्या वृक्षांनी व्यापलेला आहे. जिल्ह्यातील जंगलात विविध जातीच्या औषधी वनस्पतींची भरमार आहे. परंतु जिल्ह्यात वनोपजावर आधारित उद्योगधंदे नसल्याने येथील युवक रोजगाराच्या शोधात मोठमोठ्या शहरात भटकत आहे. शिकूण सवरूनही आदिवासी युवक बांधकाम व्यवसाय, हॉटेल, पापड, लोणची, मसाले, कंपन्यांमध्ये सुरक्षा रक्षक आदी प्रकारच्या दुय्यम व्यवसायाकडे वळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात वनोपजावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्याची गरज आहे. संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वनविभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे.जिल्ह्यात वनसंपदा असूनही उद्योगांचा अभाव आहे. वनातून सहज उपलब्ध होणाऱ्या वनोपजावर उद्योग उभारण्याची गरज जिल्ह्यात वनोपज बांबू व तेंदू यांचा वाटा सर्वाधिक आहे. यावर्षी पेपर मिलची बांबू कटाई मजुरांच्या मजुरीसंबंधी वाटाघाटी करण्यातच अडकून आहे. मजुरांच्या मजुरी ठरविण्यातच सदर प्रक्रिया अडकली आहे. त्यामुळे या रोजगारासंबंधी मजूर साशंक आहेत. बांबू कटाईनंतर तेंदूपत्ता हा सर्वात मोठा रोजगार म्हणून येथील नागरिकांना उपलब्ध होतो. जिल्ह्यातील अनेक कुटुंब उन्हाळ्याच्या दिवसात तेंदूपत्ता संकलनाचे काम करतात. मात्र मजुरांना बोनस देण्याऐवजी वनरक्षक, वनपाल आपापले वेतन वाढविण्याच्या कामात गुंतल्याने वनमजुरांना यापुढे बोनस मिळणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात औषधी वनस्पतींचीही भरमार आहे. परंतु विविध औषधी वनस्पतींच्या वापराबाबत नागरिकच अनभिज्ञ आहेत. डिंक, लाख, राळ, चारोळी, बिबा, हिरडा, आवळा, बेहडा, अनंतमूळ, करंज बी, पळस बी यासारख्या औषधी वनस्पती जिल्ह्याच्या वनात मोठ्या प्रमाणात आहेत. जिल्ह्यातील वनोपज आदिवासी बांधव गोळा करतात. मात्र अल्पकिंमतीत सदर वनोपज औषधी कंपन्यांना कमी भावात कच्च्या मालाच्या स्वरूपात विकून टाकतात. वनविभागाने सदर वनोपज अधिकृतरित्या खरेदी करून स्थानिक लोकांना विक्रीचे अधिकार दिले तर त्यातून प्रचंड प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. डिंक प्रतवारी करून लाख, चारोळी यासारखी उत्पादने मध, मोहफूल आदी गौण वनोपज महिला बचत गट संयुक्त वनव्यवस्थापन समित्यामार्फत गोळाकरून विक्री केल्यास रोजगार निर्मिती होऊ शकेल. रिकाम्या हातांना शेतीच्या रिकाम्या हंगामात जोडधंदा उपलब्ध होऊ शकेल. रेशीम कीडपालन, पशुपालन, दुग्ध व्यवसाय यातूनही आर्थिक उत्पन्न वाढीस हातभार लावू शकतो. वनोपजावर उद्योग उभारल्यास जिल्ह्यात रोजगार निर्मितीस वाव आहे.