शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

वनोपजातून रोजगार निर्मितीस वाव

By admin | Updated: October 28, 2014 22:57 IST

गडचिरोली जिल्हा विविध जातींच्या वृक्षांनी व्यापलेला आहे. जिल्ह्यातील जंगलात विविध जातीच्या औषधी वनस्पतींची भरमार आहे. परंतु जिल्ह्यात वनोपजावर आधारित उद्योगधंदे नसल्याने येथील युवक

मालेवाडा : गडचिरोली जिल्हा विविध जातींच्या वृक्षांनी व्यापलेला आहे. जिल्ह्यातील जंगलात विविध जातीच्या औषधी वनस्पतींची भरमार आहे. परंतु जिल्ह्यात वनोपजावर आधारित उद्योगधंदे नसल्याने येथील युवक रोजगाराच्या शोधात मोठमोठ्या शहरात भटकत आहे. शिकूण सवरूनही आदिवासी युवक बांधकाम व्यवसाय, हॉटेल, पापड, लोणची, मसाले, कंपन्यांमध्ये सुरक्षा रक्षक आदी प्रकारच्या दुय्यम व्यवसायाकडे वळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात वनोपजावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्याची गरज आहे. संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वनविभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे.जिल्ह्यात वनसंपदा असूनही उद्योगांचा अभाव आहे. वनातून सहज उपलब्ध होणाऱ्या वनोपजावर उद्योग उभारण्याची गरज जिल्ह्यात वनोपज बांबू व तेंदू यांचा वाटा सर्वाधिक आहे. यावर्षी पेपर मिलची बांबू कटाई मजुरांच्या मजुरीसंबंधी वाटाघाटी करण्यातच अडकून आहे. मजुरांच्या मजुरी ठरविण्यातच सदर प्रक्रिया अडकली आहे. त्यामुळे या रोजगारासंबंधी मजूर साशंक आहेत. बांबू कटाईनंतर तेंदूपत्ता हा सर्वात मोठा रोजगार म्हणून येथील नागरिकांना उपलब्ध होतो. जिल्ह्यातील अनेक कुटुंब उन्हाळ्याच्या दिवसात तेंदूपत्ता संकलनाचे काम करतात. मात्र मजुरांना बोनस देण्याऐवजी वनरक्षक, वनपाल आपापले वेतन वाढविण्याच्या कामात गुंतल्याने वनमजुरांना यापुढे बोनस मिळणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात औषधी वनस्पतींचीही भरमार आहे. परंतु विविध औषधी वनस्पतींच्या वापराबाबत नागरिकच अनभिज्ञ आहेत. डिंक, लाख, राळ, चारोळी, बिबा, हिरडा, आवळा, बेहडा, अनंतमूळ, करंज बी, पळस बी यासारख्या औषधी वनस्पती जिल्ह्याच्या वनात मोठ्या प्रमाणात आहेत. जिल्ह्यातील वनोपज आदिवासी बांधव गोळा करतात. मात्र अल्पकिंमतीत सदर वनोपज औषधी कंपन्यांना कमी भावात कच्च्या मालाच्या स्वरूपात विकून टाकतात. वनविभागाने सदर वनोपज अधिकृतरित्या खरेदी करून स्थानिक लोकांना विक्रीचे अधिकार दिले तर त्यातून प्रचंड प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. डिंक प्रतवारी करून लाख, चारोळी यासारखी उत्पादने मध, मोहफूल आदी गौण वनोपज महिला बचत गट संयुक्त वनव्यवस्थापन समित्यामार्फत गोळाकरून विक्री केल्यास रोजगार निर्मिती होऊ शकेल. रिकाम्या हातांना शेतीच्या रिकाम्या हंगामात जोडधंदा उपलब्ध होऊ शकेल. रेशीम कीडपालन, पशुपालन, दुग्ध व्यवसाय यातूनही आर्थिक उत्पन्न वाढीस हातभार लावू शकतो. वनोपजावर उद्योग उभारल्यास जिल्ह्यात रोजगार निर्मितीस वाव आहे.