शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
3
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
4
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
5
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
6
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
7
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
8
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
9
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
10
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
11
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
12
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
13
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
14
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
15
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
16
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
17
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
18
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
19
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
20
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी

माणसाचे लसीकरण लांबले अन् जनावरांसाठी लसची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:37 IST

गडचिराेली : काेराेना प्रतिबंधात्मक लसचा प्रत्येक जिल्ह्याला कमी प्रमाणात पुरवठा केला जात असल्याने हे लसीकरण लांबत चालले आहे. तर ...

गडचिराेली : काेराेना प्रतिबंधात्मक लसचा प्रत्येक जिल्ह्याला कमी प्रमाणात पुरवठा केला जात असल्याने हे लसीकरण लांबत चालले आहे. तर दुसरीकडे जनावरांना मान्सूनपूर्व दिल्या जाणाऱ्या लस उपलब्ध झाल्या नसल्याने त्यांचे लसीकरण थांबले आहे.

पावसाळ्यात जनावरांना प्रामुख्याने घटसर्प, एकटांग्या हे राेग हाेतात. यामुळे जनावरे दगावण्याची शक्यता राहत असल्याने पशुसंवर्धन विभागामार्फत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण केले जाते. यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून लस उपलब्ध करून दिल्या जातात. पावसाळा सुरू झाल्यानंतर जनावरे शेतीच्या कामात व्यस्त हाेतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच जनावरांचे लसीकरण हाेणे आवश्यक आहे. मात्र अजूनपर्यंत पशुसंवर्धन विभागाकडून लस उपलब्ध झाल्या नसल्याने लसीकरणाची प्रक्रिया थांबली आहे. लवकरात लवकर लसची मागणी करून त्याचे वितरण प्रत्येक दवाखान्यापर्यंत करण्यात यावे. शक्य तेवढ्या लवकर लस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून हाेत आहे.

बाॅक्स....

काेणकाेणत्या दिल्या जातात लस

- गायवर्गीय प्राण्यांना एकटांग्याची लस दिली जाते.

- शेळी व मेंढ्यांना आंतरविषार (पीपीआर) ही लस दिली जाते.

- म्हशींना घटसर्प ही लस दिली जाते.

- तसेच प्रत्येक सहा महिन्याच्या अंतराने ताेंडखूर व पायखूर ही लस दिली जाते.

बाॅक्स....

जिल्ह्यातील जनावरांची संख्या

गायवर्गीय - ४,५९,४७१

म्हैस - ६६,२५९

शेळी - २,३९,५७८

मेंढ्या - १८,६०५

बाॅक्स...

५ लाख ४३ हजार लसची मागणी

जिल्ह्यातील पशुधन लक्षात घेता, जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाने राज्य पशुसंवर्धन विभागाकडे ५ लाख ४३ हजार लसची मागणी केली आहे. यामध्ये घटसर्प राेग प्रतिबंधात्मकच्या ४६,५०० लस, एकटांग्या ३९ हजार, एकटांग्या व घटसर्पची एकत्रित लस ६८ हजार ८००, पीपीआर ४५ हजार ५०० व ताेंडखूर व पायखुरीच्या ४ लाख १२ हजार १०० लसीचा समावेश आहे.

काेट....

पुढील आठ ते दहा दिवसात लस उपलब्ध हाेतील, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्याला लस उपलब्ध हाेताच त्याचे रुग्णालयस्तरावर वितरण केले जाईल. पावसाळ्यात जनावरांचे आराेग्य चांगले ठेवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी या लस टाेचून घ्याव्यात. अगदी नाममात्र शुल्कात लस उपलब्ध करून दिल्या जातात.

- जी.बी.मेश्राम, पशुसंवर्धन उपायुक्त, गडचिराेली

काेट...

इंजेक्शन दिल्यानंतर एक ते दाेन दिवस बैलाला आराम करू द्यावा लागतो. सध्या शेतीची काेणतीही कामे नाहीत. त्यामुळे आता लस मिळाल्यास बैलाला आराम मिळेल. पाऊस पडल्यानंतर मात्र बैलांना आराम मिळत नाही. कधी कधी लस टाेचलेली जागा सुजते व बैलाला घरी ठेवावे लागते. त्यामुळे काही शेतकरी पावसळ्यात जनावरांना लस टाेचून घेत नाही.

- पुंडलिक चाैधरी, शेतकरी