शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
4
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
5
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
6
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
7
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
8
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
9
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
10
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
11
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
12
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
14
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
15
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
16
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
17
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
18
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम

28 हजार नागरिकांना लसीकरणाने बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 05:00 IST

देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. शासनाकडून गडचिराेली जिल्ह्याला पुरेसा लसीचा पुरवठा केला जात आहे; मात्र सुरुवातीचे काही दिवस लसीविषयी गैरसमज असल्याने नागरिक तसेच कर्मचारी सुद्धा लस देण्यास कचरत हाेते; मात्र लसीचे काेणतेही दुष्परिणाम नसल्याची खात्री झाल्यानंतर लस घेणाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला आराेग्य कर्मचारी व फ्रन्ट लाईन वर्कर यांनाच लस  दिली जात हाेती.

ठळक मुद्देप्राथमिक आराेग्य केंद्रावरही सुविधा : ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनाची लस घेण्यासाठी नागरिक व कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने काेराेना लसीकरणाची गती वाढली आहे. २६ मार्चपर्यंत जिल्हाभरातील २८ हजार ४५ नागरिकांना काेराेनाची लस देण्यात आली आहे. देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. शासनाकडून गडचिराेली जिल्ह्याला पुरेसा लसीचा पुरवठा केला जात आहे; मात्र सुरुवातीचे काही दिवस लसीविषयी गैरसमज असल्याने नागरिक तसेच कर्मचारी सुद्धा लस देण्यास कचरत हाेते; मात्र लसीचे काेणतेही दुष्परिणाम नसल्याची खात्री झाल्यानंतर लस घेणाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला आराेग्य कर्मचारी व फ्रन्ट लाईन वर्कर यांनाच लस  दिली जात हाेती. त्यानंतर १ मार्चपासून ४५ वर्षे व ६० वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस दिली जात आहे. नागरिक स्वत: रुग्णालयात जाऊन लस  घेत आहेत. त्यामुळे लसीकरणाची गती वाढत आहे.  

६४ केंद्रांवर लसीकरण४५ वर्षे व ६० वर्षांवरील नागरिकांनाही लस देण्याचे निर्देश शासनाने दिल्याने लस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या वाढली. त्यामुळे आराेग्य विभागामार्फत लसीकरण केंद्रांची संख्या वाढविली आहे. सध्या ६४ केंद्रांवर लस दिली जात आहे. काही केंद्र प्राथमिक आराेग्य केंद्रात आहेत. हे केंद्र साेमवार, बुधवार व गुरुवारी सुरू राहतात. इतर दिवशी मात्र बंद राहतात. ग्रामीण रुग्णालयस्तरावरील  लसीकरण केंद्र साेमवार ते  शनिवारपर्यंत सुरू राहतात. 

२३ हजार लससाठा उपलब्धगडचिराेली जिल्ह्याला सुरुवातीपासूनच पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे लसीकरणाचे काम सातत्याने सुरू आहे. २८ हजार ४५ नागरिकांना पहिला डाेस तर ८ हजार ४६३ नागरिकांना काेराेना लसीचा दुसरा डाेस देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात २३ हजार लस शिल्लक आहेत. किमान १५ ते  २० दिवस लस पुरणार आहेत. ताेपर्यंत पुन्हा शासनाकडून लस  पाठविल्या जातील, अशी माहिती आराेग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. नियाेजनबद्ध पद्धतीने आराेग्य विभागाार्फत लसीकरणाची माेहीम राबविली जात आहे.

दुर्गम भागातील नागरिकांमध्ये जागृतीची गरजप्रामुख्याने शहरी भागातील नागरिक व शहराच्या जवळपास असलेल्या गावांमधील नागरिक लस घेत आहेत. मात्र दुर्गम भागातील नागरिक लसीकरणापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक आराेग्य केंद्रस्तरावर लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असले तरी दुर्गम भागातील नागरिक लसीकरणासाठी येत नसल्याचे दिसून येत आहे. सामूहिक राेगप्रतिकारक शक्ती तयार करण्यासाठी या नागरिकांचे सुद्धा लसीकरण हाेणे आवश्यक आहे. त्याद्ष्टीने नागरिकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस