शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

शेती मशागतीत यंत्राचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 02:04 IST

भामरागडसारख्या दुर्गम भागातील आदिवासी शेतकरी आता आधुनिक शेती पध्दतीकडे वळला आहे.

बदल : आदिवासी शेतकरी वळला आधुनिक शेतीकडे भामरागड : भामरागडसारख्या दुर्गम भागातील आदिवासी शेतकरी आता आधुनिक शेती पध्दतीकडे वळला आहे. या भागातील अनेक आदिवासी शेतकरी सध्या रोवणीच्या कामात चिखलणीसाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत. भामरागड तालुक्यात यांत्रिकीकरण वाढले असल्याने बैलांसह त्यांच्या गळ्यातील घुंगराचा नादमधूर आवाज आता दुर्मिळ होत चालला आहे. ७ ते १३ जुलैदरम्यान भामरागड तालुक्यात संततधार पाऊस बरसला. परिणामी पूर परिस्थितीही निर्माण झाली. आठवडाभरानंतर पावसाने उसंत घेतली. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी नांगरणी व पेरणीच्या कामात वेग घेतला. रोवणीचे काम मागे पडून आहे, या उद्देशाने भामरागड तालुक्यातील अनेक आदिवासी शेतकरी शेती मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत. मागील दोन वर्षापूर्वी ग्रामीण भागात ट्रॅक्टर अत्यल्प प्रमाणात उपलब्ध होते. प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी लाकडी नांगर दिसून यायचा. मोजके श्रीमंत शेतकरी नांगरणीच्या कामात ट्रॅक्टरचा वापर करीत होते. मात्र यंदा भामरागड तालुक्यातील मोठ्या गावातील बहुतांश शेतकरी शेतीमशागतीच्या कामात ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत. त्यामुळे शेतावर बैल व लाकडी नांगर फारसे दिसत नाही. पावसाळ्यापूर्वी अनेक शेतकऱ्यांनी बांबू कुंपणाचे काम केले. तसेच जळाऊ लाकडाची वाहतूकही केली. मात्र सदर जंगलातील कामेही अनेकांनी ट्रॅक्टरद्वारे केले. ट्रॅक्टरसह वाहतुकीचे अनेक साधण वाढल्याने बैलगाडीही आता काळाच्या पडद्याआड झाली आहे. (तालुका प्रतिनिधी) शेती विकासासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज भामरागड तालुक्यातील लाहेरी, मल्लमपोडूर, आरेवाडा, भामनपल्ली, येचली, मन्नेराजाराम, जिंजीगाव या परिसरातील शेतकरी वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन वैज्ञानिक दृष्टीकोणातून यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून आधुनिक शेतीकडे वळले आहेत. अनेक शेतकरी ट्रॅक्टरसह इतर यंत्राचा शेती मशागतीच्या कामात वापर करीत आहेत. आदिवासी शेतकरी सुधारित पध्दतीच्या शेतीकडे वळले असल्याने शासनानेही या भागातील शेती विकासासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. तेव्हाच भामरागड तालुक्यात कृषी क्रांती होण्यास वेळ लागणार नाही. उन्हाळी पिकांकडेही शेतकऱ्यांची वाटचाल भामरागड तालुक्याच्या शेती पध्दतीत पूर्वीच्या काळाच्या तुलनेत आता बराच बदल झाला आहे. भामरागड तालुक्यात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतीचा विकास होत असल्याचे दिसून येत आहे. सिंचनाची सोय असलेल्या पल्ली या गावातील आदिवासी शेतकरी खरीप हंगामातील पिकांसोबतच उन्हाळी धान व इतर रबी पिके घेत आहेत. येथील शेतकरी भामरागडच्या बाजारपेठेत शेतातील कृषी उत्पादन आणून विकतात. यातून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृषी विभागासह जिल्हा प्रशासनानेही प्रयत्न करावेत.