शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
3
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
4
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
5
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
6
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
7
“सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
8
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
9
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
10
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!
11
हृदयद्रावक! एका पायलटच्या लग्नासाठी कुटुंबीय शोधत होते मुलगी तर दुसऱ्याला १ महिन्याचा मुलगा
12
१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट
13
चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा
14
Life Lesson: तुम्हाला अतिविचार करण्याची सवय आहे? मग 'हा' गुरुमंत्र येईल कामी!
15
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?
16
आयपीएलमध्ये तिकीट घोटाळा, सीआयडीची मोठी कारवाई, हैदराबाद क्रिकेट संघटेनेच्या अध्यक्षांना अटक   
17
'पालिका प्लॅन' ON ! सांगली, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
18
दे दणादण! काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; माजी आमदार जखमी
19
Glen Industries IPO च्या GMP मध्ये तुफान तेजी; आतापर्यंत ४३ पट झाला सबक्राइब, पाहा डिटेल्स
20
Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेला सायंकाळी 'हा' उपाय करा; अडलेली कामे मार्गी लागतील!

अहेरी उपविभागात बेरोजगारांची फौज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात शासकीय नोकरीच्या संधी कमी आहेत. वनविभाग, पोलीस व इतर विभागाच्या अत्यल्प जागा दरवर्षी निघतात. बेरोजगारांच्या संख्येच्या तुलनेत पाच टक्केही जागा भरल्या जात नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्यात बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली असून बरेच बेरोजगार युवक व्यवनांच्या अधीन होत आहेत.

ठळक मुद्देनोकरीच्या संधी कमीच : वनावर आधारित उद्योग सुरू करण्याकडे दुर्लक्ष

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : गडचिरोली जिल्हा हा नैसर्गिक साधनसंपत्तीने औतप्रोत भरलेला आहे. मात्र विकासदृष्टी नसल्याने सदर जिल्हा अद्यापही मागासलेला आहे. महाराष्ट्राच्या नकाशात आदिवासी जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. या जिल्ह्याची चांगली ओळख निर्माण करण्यासाठी विकासाला गती देण्याची गरज आहे. वन व वनौषधीवर प्रक्रिया उद्योग उभारून रोजगार उपलब्ध करावा, अशी मागणी होत आहे.गडचिरोली जिल्ह्यात शासकीय नोकरीच्या संधी कमी आहेत. वनविभाग, पोलीस व इतर विभागाच्या अत्यल्प जागा दरवर्षी निघतात. बेरोजगारांच्या संख्येच्या तुलनेत पाच टक्केही जागा भरल्या जात नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्यात बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली असून बरेच बेरोजगार युवक व्यवनांच्या अधीन होत आहेत. खासगी क्षेत्रातही नोकरीच्या संधी नाही. अहेरी उपविभागात कोणतेही उद्योगधंदे नसल्याने येथील बरेच युवक रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर मोठ्या शहरात जात असतात. या भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींना आत्मनिर्भर करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. प्रशासनाच्या वतीने अशा प्रकारचे प्रशिक्षण सुरू असले तरी ते तोकडे आहे. स्थानिकस्तरावर प्रभावी व मोठ्या स्वरूपाचे दीर्घ प्रशिक्षण बेरोजगारांना मिळत नाही. त्यामुळे बऱ्याच बेरोजगारांमध्ये कौशल्य नसल्याचे दिसून येते.मौल्यवान वनसंपत्तीवर उभारता येतात अनेक उद्योगअहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के जंगल आहे. अहेरी उपविभागात मौल्यवान सागवानाचे जंगल मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय मोहफूल, आवळा, करवंद, जांभूळ, कंदमूळ, रानमेवा, बोर, सर्वगंधा, शतवरी, सिताफळ, कोरपड, नीम, सदाफुली आदी वृद्ध तसेच वनस्पती व फळे-फुले आहेत. वनौषधीची अनेक झाडे व वनस्पती आहे. शासनाने योग्य नियोजन करून सदर वृक्ष व वनस्पतीवर प्रक्रिया उद्योग उभारल्यास स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. शिवाय जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारीforest departmentवनविभाग