शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
3
YouTube'ने नियम बदलले! आता अशा कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
4
सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी
5
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
6
बीकेसीच्या रिक्षावाल्यानंतर आता कारवाली; कारमध्ये बसून कमावतेय तासाला ₹३५००...
7
Food Recipe: जेवणात तोंडी लावायला नसेल काही, तेव्हा करा ही चटपटीत दही तिखारी!
8
Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स
9
सारा तेंडुलकर अन् शुबमन गिल पुन्हा एकत्र; कार्यक्रमाचा VIDEO झाला व्हायरल; चर्चांना उधाण
10
२७ नोव्हेंबरपर्यंत शनि वक्री: ९ राशींना १३८ दिवस लाभ, पद-पैसा; भरघोस भरभराट, भाग्योदय काळ!
11
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
12
EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?
13
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
14
गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल
15
'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..."
16
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
17
२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?
18
PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
19
'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा
20
Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?

अहेरी उपविभागात बेरोजगारांची फौज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात शासकीय नोकरीच्या संधी कमी आहेत. वनविभाग, पोलीस व इतर विभागाच्या अत्यल्प जागा दरवर्षी निघतात. बेरोजगारांच्या संख्येच्या तुलनेत पाच टक्केही जागा भरल्या जात नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्यात बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली असून बरेच बेरोजगार युवक व्यवनांच्या अधीन होत आहेत.

ठळक मुद्देनोकरीच्या संधी कमीच : वनावर आधारित उद्योग सुरू करण्याकडे दुर्लक्ष

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : गडचिरोली जिल्हा हा नैसर्गिक साधनसंपत्तीने औतप्रोत भरलेला आहे. मात्र विकासदृष्टी नसल्याने सदर जिल्हा अद्यापही मागासलेला आहे. महाराष्ट्राच्या नकाशात आदिवासी जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. या जिल्ह्याची चांगली ओळख निर्माण करण्यासाठी विकासाला गती देण्याची गरज आहे. वन व वनौषधीवर प्रक्रिया उद्योग उभारून रोजगार उपलब्ध करावा, अशी मागणी होत आहे.गडचिरोली जिल्ह्यात शासकीय नोकरीच्या संधी कमी आहेत. वनविभाग, पोलीस व इतर विभागाच्या अत्यल्प जागा दरवर्षी निघतात. बेरोजगारांच्या संख्येच्या तुलनेत पाच टक्केही जागा भरल्या जात नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्यात बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली असून बरेच बेरोजगार युवक व्यवनांच्या अधीन होत आहेत. खासगी क्षेत्रातही नोकरीच्या संधी नाही. अहेरी उपविभागात कोणतेही उद्योगधंदे नसल्याने येथील बरेच युवक रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर मोठ्या शहरात जात असतात. या भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींना आत्मनिर्भर करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. प्रशासनाच्या वतीने अशा प्रकारचे प्रशिक्षण सुरू असले तरी ते तोकडे आहे. स्थानिकस्तरावर प्रभावी व मोठ्या स्वरूपाचे दीर्घ प्रशिक्षण बेरोजगारांना मिळत नाही. त्यामुळे बऱ्याच बेरोजगारांमध्ये कौशल्य नसल्याचे दिसून येते.मौल्यवान वनसंपत्तीवर उभारता येतात अनेक उद्योगअहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के जंगल आहे. अहेरी उपविभागात मौल्यवान सागवानाचे जंगल मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय मोहफूल, आवळा, करवंद, जांभूळ, कंदमूळ, रानमेवा, बोर, सर्वगंधा, शतवरी, सिताफळ, कोरपड, नीम, सदाफुली आदी वृद्ध तसेच वनस्पती व फळे-फुले आहेत. वनौषधीची अनेक झाडे व वनस्पती आहे. शासनाने योग्य नियोजन करून सदर वृक्ष व वनस्पतीवर प्रक्रिया उद्योग उभारल्यास स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. शिवाय जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारीforest departmentवनविभाग