शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

नजरअंदाज पीक आणेवारी ७२ पैसे

By admin | Updated: October 7, 2016 01:28 IST

कृषी व महसूल विभागाने सप्टेंबर महिन्यात केलेल्या पाहणीनुसार जिल्ह्यातील पीक परिस्थिती चांगली असून

खरीप हंगाम : १ हजार ५३९ गावांमध्ये पेरणीगडचिरोली : कृषी व महसूल विभागाने सप्टेंबर महिन्यात केलेल्या पाहणीनुसार जिल्ह्यातील पीक परिस्थिती चांगली असून जिल्हाभराची सरासरी आणेवारी ७२ पैसे आढळून आली आहे. बहुतांश तालुक्याची आणेवारी ६० पैशांच्या वरच आहे. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने धान, तूर, कापूस, सोयाबिन या पिकांची लागवड करण्यात येते. यावर्षीच्या पावसाळ्यात अगदी सुरूवातीपासून चांगला पाऊस झाला. त्यामुळे पेरणी, धानाच्या रोवणीची कामे अत्यंत वेळेवर झाली. त्यानंतरही अगदी वेळेवर पाऊस झाल्याने शेतीची कामे वेळेवर झाली. मागील आठवड्यात जिल्हाभरात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धानपिकाला मोठा दिलासा मिळाला आहे. बहुतांश तलाव व बोड्या तुडूंब भरून आहेत. त्यामुळे उत्पादन चांगले होईल, असा अंदाज नजर अंदाज पाहणीत व्यक्त करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६८८ महसुली गावे आहेत. यापैकी १ हजार ५३९ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड केली जाते. ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी आल्यास संबंधित गावाला शासनाकडून दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत केले जाते. यावर्षीच्या हंगामात १४८० गावांची आणेवारी ५० पैशांच्या वर आहे. अंतिम आणेवारी जानेवारी महिन्यात घोषीत करण्यात येते. यासाठी दोन महिन्यांचा कालावधी असला तरी पिकांची स्थिती लक्षात घेतली तर पैशाची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी होणार नाही, अशी शक्यता महसूल विभागातील अधिकारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)५९ गावांमध्ये खरिपाचे उत्पादन नाहीगडचिरोली जिल्ह्यात एकूण १६८८ गावे आहेत. त्यापैकी १ हजार ५३९ गावांमध्ये खरीपाचे उत्पादन घेतले जाते. मात्र ५९ गावांमध्ये यावर्षी खरीप पिकांची लागवडच करण्यात आली नाही. यामध्ये धानोरा तालुक्यातील सहा, चामोर्शी तालुक्यात सहा, आरमोरी तालुक्यात एक, कुरखेडा पाच, कोरची सहा, अहेरी सहा, एटापल्ली दोन, भामरागड २२ व सिरोंचा तालुक्यातील पाच गावांचा समावेश आहे. अंतिम आणेवारीवरून ठरणार मदतसध्या काढण्यात आलेली आणेवारी ही नजरअंदाज आणेवारी आहे. राज्यभरातील पिकांची स्थिती कळावी, यासाठी महसूल व कृषी विभागाची कर्मचारी प्रत्येक गावातील पिकांची पाहणी करून त्यानुसार आणेवारी काढतात. मात्र अजूनपर्यंत पूर्णपणे पीक निघाले नाही. पीक काढतेवेळी पाऊस सुरू राहिल्यास ओला दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता काढलेली आणेवारी ही अंतिम नाही. अंतिम आणेवारी जवळपास डिसेंबर, जानेवारी महिन्यात जाहीर केली जाते. तेव्हा बहुतांश खरीप पिके निघालेली असतात. त्यामुळे सदर आणेवारी अंतिम समजली जाते व त्यावरूनच सदर गावाला दुष्काळग्रस्त घोषीत करणे किंवा न करणे याबाबतचा निर्णय घेतला जातो. मागील वर्षी बहुतांश गावांची पैसेवारी कोरड्या दुष्काळामुळे ५० पैशांपेक्षा कमी होती. यावर्षी मात्र बहुतांश गावांची आकडेवारी ५० पैशांपेक्षावर आहे.