शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

नजरअंदाज पीक आणेवारी ७२ पैसे

By admin | Updated: October 7, 2016 01:28 IST

कृषी व महसूल विभागाने सप्टेंबर महिन्यात केलेल्या पाहणीनुसार जिल्ह्यातील पीक परिस्थिती चांगली असून

खरीप हंगाम : १ हजार ५३९ गावांमध्ये पेरणीगडचिरोली : कृषी व महसूल विभागाने सप्टेंबर महिन्यात केलेल्या पाहणीनुसार जिल्ह्यातील पीक परिस्थिती चांगली असून जिल्हाभराची सरासरी आणेवारी ७२ पैसे आढळून आली आहे. बहुतांश तालुक्याची आणेवारी ६० पैशांच्या वरच आहे. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने धान, तूर, कापूस, सोयाबिन या पिकांची लागवड करण्यात येते. यावर्षीच्या पावसाळ्यात अगदी सुरूवातीपासून चांगला पाऊस झाला. त्यामुळे पेरणी, धानाच्या रोवणीची कामे अत्यंत वेळेवर झाली. त्यानंतरही अगदी वेळेवर पाऊस झाल्याने शेतीची कामे वेळेवर झाली. मागील आठवड्यात जिल्हाभरात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धानपिकाला मोठा दिलासा मिळाला आहे. बहुतांश तलाव व बोड्या तुडूंब भरून आहेत. त्यामुळे उत्पादन चांगले होईल, असा अंदाज नजर अंदाज पाहणीत व्यक्त करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६८८ महसुली गावे आहेत. यापैकी १ हजार ५३९ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड केली जाते. ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी आल्यास संबंधित गावाला शासनाकडून दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत केले जाते. यावर्षीच्या हंगामात १४८० गावांची आणेवारी ५० पैशांच्या वर आहे. अंतिम आणेवारी जानेवारी महिन्यात घोषीत करण्यात येते. यासाठी दोन महिन्यांचा कालावधी असला तरी पिकांची स्थिती लक्षात घेतली तर पैशाची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी होणार नाही, अशी शक्यता महसूल विभागातील अधिकारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)५९ गावांमध्ये खरिपाचे उत्पादन नाहीगडचिरोली जिल्ह्यात एकूण १६८८ गावे आहेत. त्यापैकी १ हजार ५३९ गावांमध्ये खरीपाचे उत्पादन घेतले जाते. मात्र ५९ गावांमध्ये यावर्षी खरीप पिकांची लागवडच करण्यात आली नाही. यामध्ये धानोरा तालुक्यातील सहा, चामोर्शी तालुक्यात सहा, आरमोरी तालुक्यात एक, कुरखेडा पाच, कोरची सहा, अहेरी सहा, एटापल्ली दोन, भामरागड २२ व सिरोंचा तालुक्यातील पाच गावांचा समावेश आहे. अंतिम आणेवारीवरून ठरणार मदतसध्या काढण्यात आलेली आणेवारी ही नजरअंदाज आणेवारी आहे. राज्यभरातील पिकांची स्थिती कळावी, यासाठी महसूल व कृषी विभागाची कर्मचारी प्रत्येक गावातील पिकांची पाहणी करून त्यानुसार आणेवारी काढतात. मात्र अजूनपर्यंत पूर्णपणे पीक निघाले नाही. पीक काढतेवेळी पाऊस सुरू राहिल्यास ओला दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता काढलेली आणेवारी ही अंतिम नाही. अंतिम आणेवारी जवळपास डिसेंबर, जानेवारी महिन्यात जाहीर केली जाते. तेव्हा बहुतांश खरीप पिके निघालेली असतात. त्यामुळे सदर आणेवारी अंतिम समजली जाते व त्यावरूनच सदर गावाला दुष्काळग्रस्त घोषीत करणे किंवा न करणे याबाबतचा निर्णय घेतला जातो. मागील वर्षी बहुतांश गावांची पैसेवारी कोरड्या दुष्काळामुळे ५० पैशांपेक्षा कमी होती. यावर्षी मात्र बहुतांश गावांची आकडेवारी ५० पैशांपेक्षावर आहे.