शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

निजामकालीन प्रस्तावित जलविद्युत प्रकल्प अधांतरीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

इंग्रजकालीन राजवटीत तेलंगणा राज्यात निजामाचे स्वतंत्र राज्य होते. इंग्रजांनी देशात जलविद्युत प्रकल्प बांधण्यास सुरूवात केली होती. त्यांचे अनुकरण करीत निजामशाहनेही प्राणहिता नदीत जलविद्युत प्रकल्प तयार करण्याचे नियोजन केले. सर्वेक्षणानंतर प्रकल्प निर्मितीच्या कामाला सुरूवात केली. प्राणहिता नदीच्या अगदी मध्यभागी अजुनही बारमाही पाणी राहते.

ठळक मुद्देप्राणहिता नदीतील खांब देत आहे साक्ष : कामाला झाली होती सुरूवात; परिसरातील नागरिकांना मिळू शकते रोजगार

विवेक बेझलवार ।लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तत्कालीन शासक निजामशाहने प्राणहिता नदीवर देवलमरी गावाजवळ जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या कामाला सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर आलेल्या अडचणींमुळे जलविद्युत प्रकल्पाचे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही. प्रकल्प निर्मितीची साक्ष देणारा सिमेंटचा पिल्लर आजही या ठिकाणी कायम आहे.इंग्रजकालीन राजवटीत तेलंगणा राज्यात निजामाचे स्वतंत्र राज्य होते. इंग्रजांनी देशात जलविद्युत प्रकल्प बांधण्यास सुरूवात केली होती. त्यांचे अनुकरण करीत निजामशाहनेही प्राणहिता नदीत जलविद्युत प्रकल्प तयार करण्याचे नियोजन केले. सर्वेक्षणानंतर प्रकल्प निर्मितीच्या कामाला सुरूवात केली. प्राणहिता नदीच्या अगदी मध्यभागी अजुनही बारमाही पाणी राहते. याच ठिकाणी पिल्लर तयार करण्यात आला. सदर पिल्लर आजही बांधकाम निर्मितीच्या शुभारंभाची साक्ष देत आहे. मात्र प्रकल्पाचे काम पुढे गेले नाही. निजामशाहीनंतर आंध्रप्रदेश राज्याची निर्मिती झाली. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री बर्मुला रामकृष्णराव असताना १९५२-५४ मध्ये जवळपास अनेक दिवस सर्वेक्षण करण्यात आले, असे स्थानिक व वयोवृध्द नागरिकांचे म्हणणे आहे. १९५५ मध्ये काही यंत्र सामग्री व उपकरणे या ठिकाणी आणली गेली. मात्र काम पुढे गेले नाही. २००७ मध्ये संयुक्त पुरोगामी सरकारच्या काळात एपी जेंको अधिकाऱ्याने तलाई येथील प्राणहिता नदीला भेट दिली. या ठिकाणी १०० मेगावॅटचा वीज प्रकल्प निर्माण केला जाईल, असे जेंको यांनी सांगितले होते. मात्र त्याकडे तत्कालीन सरकारांनी याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकल्पाचे काम मार्गी लागले नाही.महाराष्टÑ व तेलंगणा या दोन्ही राज्यांसाठी ठरू शकते लाभदायकप्राणहिता नदी महाराष्टÑ व तेलंगणा राज्याची दुभाजक आहे. पुढे ही नदी गोदावरी नदीला जाऊन मिळते. प्राणहिता नदी बारमाही वाहणारी नदी आहे. त्यामुळे या ठिकाणी जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती झाल्यास विजेची समस्या दूर होईल. तसेच स्थानिक नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होण्यास मदत होईल. प्राणहिता नदीत जलविद्युत प्रकल्प निर्माण करण्यायोग्य वातावरण आहे. आवश्यक तेवढे पाणी आहे. हे आजपर्यंत केलेल्या सर्वेक्षणातून सिध्द झाले आहे. त्यामुळे तेलंगणा व महाराष्टÑ सरकारने संयुक्तपणे या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प निर्माण केल्यास दोन्ही राज्यांची विजेची गरज पूर्ण होण्यास मदत होईल.अहेरी परिसरातील गावे जंगलाने व्यापले आहेत. अतिशय दूरवरून या गावांना वीज पुरवठा केला जातो. तसेच तेलंगणा राज्यातीलही प्राणहिता नदीकाठी असलेल्या गावांमध्ये विजेची समस्या गंभीर आहे. त्यामुळे या ठिकाणी वीज प्रकल्प निर्माण झाल्यास दोन्ही राज्यातील विजेची समस्या दूर होण्यासाठी फार मोठी मदत होईल.

टॅग्स :electricityवीज