शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

निजामकालीन प्रस्तावित जलविद्युत प्रकल्प अधांतरीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

इंग्रजकालीन राजवटीत तेलंगणा राज्यात निजामाचे स्वतंत्र राज्य होते. इंग्रजांनी देशात जलविद्युत प्रकल्प बांधण्यास सुरूवात केली होती. त्यांचे अनुकरण करीत निजामशाहनेही प्राणहिता नदीत जलविद्युत प्रकल्प तयार करण्याचे नियोजन केले. सर्वेक्षणानंतर प्रकल्प निर्मितीच्या कामाला सुरूवात केली. प्राणहिता नदीच्या अगदी मध्यभागी अजुनही बारमाही पाणी राहते.

ठळक मुद्देप्राणहिता नदीतील खांब देत आहे साक्ष : कामाला झाली होती सुरूवात; परिसरातील नागरिकांना मिळू शकते रोजगार

विवेक बेझलवार ।लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तत्कालीन शासक निजामशाहने प्राणहिता नदीवर देवलमरी गावाजवळ जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या कामाला सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर आलेल्या अडचणींमुळे जलविद्युत प्रकल्पाचे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही. प्रकल्प निर्मितीची साक्ष देणारा सिमेंटचा पिल्लर आजही या ठिकाणी कायम आहे.इंग्रजकालीन राजवटीत तेलंगणा राज्यात निजामाचे स्वतंत्र राज्य होते. इंग्रजांनी देशात जलविद्युत प्रकल्प बांधण्यास सुरूवात केली होती. त्यांचे अनुकरण करीत निजामशाहनेही प्राणहिता नदीत जलविद्युत प्रकल्प तयार करण्याचे नियोजन केले. सर्वेक्षणानंतर प्रकल्प निर्मितीच्या कामाला सुरूवात केली. प्राणहिता नदीच्या अगदी मध्यभागी अजुनही बारमाही पाणी राहते. याच ठिकाणी पिल्लर तयार करण्यात आला. सदर पिल्लर आजही बांधकाम निर्मितीच्या शुभारंभाची साक्ष देत आहे. मात्र प्रकल्पाचे काम पुढे गेले नाही. निजामशाहीनंतर आंध्रप्रदेश राज्याची निर्मिती झाली. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री बर्मुला रामकृष्णराव असताना १९५२-५४ मध्ये जवळपास अनेक दिवस सर्वेक्षण करण्यात आले, असे स्थानिक व वयोवृध्द नागरिकांचे म्हणणे आहे. १९५५ मध्ये काही यंत्र सामग्री व उपकरणे या ठिकाणी आणली गेली. मात्र काम पुढे गेले नाही. २००७ मध्ये संयुक्त पुरोगामी सरकारच्या काळात एपी जेंको अधिकाऱ्याने तलाई येथील प्राणहिता नदीला भेट दिली. या ठिकाणी १०० मेगावॅटचा वीज प्रकल्प निर्माण केला जाईल, असे जेंको यांनी सांगितले होते. मात्र त्याकडे तत्कालीन सरकारांनी याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकल्पाचे काम मार्गी लागले नाही.महाराष्टÑ व तेलंगणा या दोन्ही राज्यांसाठी ठरू शकते लाभदायकप्राणहिता नदी महाराष्टÑ व तेलंगणा राज्याची दुभाजक आहे. पुढे ही नदी गोदावरी नदीला जाऊन मिळते. प्राणहिता नदी बारमाही वाहणारी नदी आहे. त्यामुळे या ठिकाणी जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती झाल्यास विजेची समस्या दूर होईल. तसेच स्थानिक नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होण्यास मदत होईल. प्राणहिता नदीत जलविद्युत प्रकल्प निर्माण करण्यायोग्य वातावरण आहे. आवश्यक तेवढे पाणी आहे. हे आजपर्यंत केलेल्या सर्वेक्षणातून सिध्द झाले आहे. त्यामुळे तेलंगणा व महाराष्टÑ सरकारने संयुक्तपणे या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प निर्माण केल्यास दोन्ही राज्यांची विजेची गरज पूर्ण होण्यास मदत होईल.अहेरी परिसरातील गावे जंगलाने व्यापले आहेत. अतिशय दूरवरून या गावांना वीज पुरवठा केला जातो. तसेच तेलंगणा राज्यातीलही प्राणहिता नदीकाठी असलेल्या गावांमध्ये विजेची समस्या गंभीर आहे. त्यामुळे या ठिकाणी वीज प्रकल्प निर्माण झाल्यास दोन्ही राज्यातील विजेची समस्या दूर होण्यासाठी फार मोठी मदत होईल.

टॅग्स :electricityवीज