शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

सौंदर्यात भर टाकणाऱ्या फवाऱ्याला अस्वच्छता, अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:21 IST

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ आणि एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या देसाईगंज शहरात नेहमीच लोकांची वर्दळ राहते. येथील मुख्य ...

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ आणि एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या देसाईगंज शहरात नेहमीच लोकांची वर्दळ राहते. येथील मुख्य चौकाचे सौंदर्यीकरण करत काही वर्षांपूर्वी चौकाच्या मध्यभागी फवारा (कारंजे) लावण्यात आला, पण सद्य:स्थितीत या चौकाचे सौंदर्यीकरण लोप पावले असून अस्वच्छता आणि अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. हा विळखा कधी सुटणार, असा प्रश्न देसाईगंजवासीय करत आहेत.

या नगरपरिषदेचे वार्षिक बजेट कोट्यवधी रुपयांचे आहे. या अंतर्गत लाखो रुपये खर्च करून शहराच्या मुख्य चौकात फवारा लावून सौंदर्यात भर घातली होती. यासाठी जुन्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवर मोटारपंप बसवून सुशोभीकरण करण्यासाठी रंगीबिरंगी लाईटही लावले होते. मात्र, तो फवारा काही दिवस चालून बंद पडला. त्याकडे आता लक्ष देण्यासाठी कोणीही तयार नाही.

शहरात सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणात शासकीय बांधकामे, विद्युतीकरण करण्यावर भर दिला जात असला तरी शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या या चौकाला गतवैभव प्राप्त करून देणेही गरजेचे आहे, तसेच अतिक्रमणामुळे होणारी वाहतुकीची कोंडी सोडविणेही महत्त्वाचे आहे.

(बॉक्स)

लाखोंचा खर्च पाण्यात

या चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी नगर परिषदेने त्याकाळी लाखो रुपये खर्च केले होते, पण आता किरकोळ दुकानदारांनी सभोवताली दुकाने थाटून चौकच गिळंकृत केला आहे. दुकानातून निघणारा टाकाऊ कचरा दररोज त्या चौकातच पडून राहातो. त्यामुळे या चौकाचे सौंदर्यीकरण लोप पावले असून लाखो रुपयांचा खर्चही वाया गेला आहे.

230721\img_20210213_122938.jpg

शहरातील मध्यवर्ती भागातील फवारा चौक बंद चहूबाजूला अतिक्रमण