शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लाकूड बिट वाहून नेणारे दोन ट्रॅक्टर ग्रामस्थांनी अडविले

By admin | Updated: March 26, 2017 00:42 IST

निमनवाडा येथील वन समितीने कापलेले जळाऊ लाकूड बिट वाहून नेणारे दोन ट्रॅक्टर ग्रामस्थांनी २३ मार्च रोजी अडविले.

निमनवाडातील प्रकार : वन विभागाकडे प्रलंबित मजुरीचा मुद्दा ऐरणीवररांगी : निमनवाडा येथील वन समितीने कापलेले जळाऊ लाकूड बिट वाहून नेणारे दोन ट्रॅक्टर ग्रामस्थांनी २३ मार्च रोजी अडविले. त्यानंतर २४ मार्च रोजी शुक्रवारी गावाच्या चौकात उभे असलेले सदर दोन ट्रॅक्टर पोलिसांची मदत घेऊन वन विभागाने रांगी येथील वन कार्यालयात आणले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. रांगी येथे वन विभागाचे उत्तर व दक्षिण असे दोन बिट असून दक्षिणेकडील निमनवाडा बिटात शिवटोला व भुसानटोला या गावाचा समावेश होतो. निमनवाडा बिटातील वाघभूमी कुप क्रमांक ५ च्या कक्ष क्रमांक ४४६ मधील जंगल वन समितीच्या नियंत्रणाखाली आहे. वनसंपत्ती अंतर्गत येथील जंगलाची कटाई करण्यात आली. कटाई केलेले जळाऊ लाकूड बिट नेण्यासाठी दोन ट्रॅक्टर भाडेतत्वावर घेण्यात आले. एमएच ३३ एफ ४४१४ व एमएच ३३ एफ २४८५ क्रमांकाचे दोन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये जळाऊ लाकूड बिट भरण्यात आले. लाकूड बिट रांगी येथील वनक्षेत्र सहायक कार्यालयात नेत असताना निमनवाडा गावात लोकांनी हे दोन्ही ट्रॅक्टर अडविले. याबाबत गावातील लोकांना विचारणा केली असता, लोकांची मजुरीची रक्कम प्रलंबित आहे. वन समितीची वर्षभरात सभाच घेण्यात आली नाही. संबंधित बिट वनरक्षक गावात येत नाही. जोपर्यंत मजुरीची रक्कम दिली जात नाही. तोपर्यंत ट्रॅक्टर येथून पुढे नेऊ देणार नाही, अशी भूमिका लोकांनी घेतली. त्यानंतर वन विभागाने धानोरा पोलिसांची मदत घेऊन दोन्ही ट्रॅक्टर रांगीला हलविले. रांगी येथे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून लाकूड बिट खाली करण्यात आले. यावेळी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)काय म्हणतात नागरिक?गावातील लोकांची मजुरीची रक्कम वर्षभरापासून प्रलंबित आहे. चापल कटाई, वनाची राखणी आदीची रक्कम शिल्लक आहे. तसेच गावातील १० लोकांना गॅस कनेक्शन मिळवून देतो, असे सांगून वनरक्षकांनी २ हजार ७०० प्रमाणे लोकांकडून पैसे घेतले. वर्ष उलटूनही गॅस कनेक्शन मिळाले नाही. गॅस कनेक्शनच्या या रक्कमेची पावती वनरक्षकांनी दिली नाही, अशी माहिती निमनवाडा येथे नानाजी कुमरे, कलिराम जांगी, गणेश जांगी सुखदेव कुमरे, रामजी आतला, अनिता कुमरे, सायत्रा नरोटे, अर्चना कुमरे, वसंती जांगी यांनी दिली. सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या सर्व नागरिकांनी केली आहे.