शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

दोन शिक्षकांचे वेतन काढले

By admin | Updated: May 30, 2014 23:42 IST

अहेरी पंचायत समिती अंतर्गत एक अविवाहीत महिला शिक्षिका मुळ पदस्थापनेवर कार्यरत आहे. मात्र या महिला शिक्षिकेचे वेतन वेलगुरच्या जिल्हा परिषद शाळेतून काढून पंचायत समितीच्या

एकाच आस्थापनेवर : अहेरी पं. स. शिक्षण विभागातील प्रकारआलापल्ली : अहेरी पंचायत समिती अंतर्गत एक अविवाहीत महिला शिक्षिका मुळ पदस्थापनेवर कार्यरत आहे. मात्र या महिला शिक्षिकेचे वेतन   वेलगुरच्या जिल्हा परिषद शाळेतून काढून पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने आपल्या अकलेचे वाभाडे काढले आहे. विशेष म्हणजे एकाच आस्थापनेवर दोन पदवीधर शिक्षकांचे वेतन काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्राप्त माहितीनुसार अहेरी पंचायत समिती अंतर्गत एका अविवाहित महिला शिक्षिकेची मुळ पदस्थापना दुसरीकडे आहे. मात्र या शिक्षिकेचे वेतन वेलगुरच्या शाळेतून काढण्यात येते. महिन्याकाठी ४0 हजार रूपये वेतन उचलणारी ही पदवीधर शिक्षिका असून सध्या ती तिसर्‍याच ठिकाणी म्हणजे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात अध्यापनाचे कार्य करीत आहे. मागील सहा महिन्यापासून या शिक्षिकेला वेतन दिले जात असून मात्र मुळ पदस्थापनेच्या ठिकाणी वर्ग रिकामाच आहे. यामुळे विद्यार्थी वार्‍यावर असतांनासुद्धा अहेरी पंचायत समितीला गुणवत्तेशी काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येते. या प्रकाराकडे केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे सदर शिक्षिकेचे वर्तन खूप उद्धटपणाचे असल्याचे समजते. देचलीपेठा, दामरंचासारख्या दुर्गम भागात पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त असतांना अहेरी पंचायत समितीच्या अधिकार्‍यांचे या अविवाहित पदवीधर शिक्षिकेवर भलतीच मेहर नजर असल्याचे दिसून येते. ६ महिन्यापूर्वी सदर शिक्षिकेच्या गैरवर्तनाबाबत शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्‍यांनी पंचायत समितीकडे तक्रार केली. अधिकार्‍यांनी थातूरमातूर चौकशी करून सदर प्रकरण दाबले. या शिक्षिकेच्या गैरवर्तनामुळे विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याची नामुष्की ओढवली होती. मात्र उलट सदर शिक्षिकेला शैक्षणिक कार्य करण्यासाठी इतरत्र पदस्थापना देण्यात आली, अशी माहिती एका ग्रामपंचायतीच्या माजी सदस्यांनी दिली आहे. याबाबत अहेरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून विचारणा केली. यावर तीन महिन्याचे वेतन चुकीमुळे काढण्यात आले, मात्र आता त्यामध्ये दुरूस्ती करू, एवढेच बोलून त्यांनी भ्रमणध्वनी बंद केला. यावरून याप्रकरणात अहेरी पंचायत समितीच्या अधिकार्‍यांकडून कमालीची गुप्तता बाळगल्या जात असल्याचे दिसून येते. (वार्ताहर)