शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
3
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
4
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
5
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
6
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
7
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
8
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
9
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
10
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
11
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

दोन लाख कुटुंब शौचालयाविना

By admin | Updated: January 10, 2015 22:55 IST

प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असावे, यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत असले तरी जिल्ह्यातील एकूण २ लाख ४५ हजार ७४५ कुटुंबांपैकी १ लाख ७६ हजार ६६२ कुटुंबांकडे शौचालय नाही.

गडचिरोली : प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असावे, यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत असले तरी जिल्ह्यातील एकूण २ लाख ४५ हजार ७४५ कुटुंबांपैकी १ लाख ७६ हजार ६६२ कुटुंबांकडे शौचालय नाही. त्यामुळे या कुटुंबांमधील जवळपास आठ लाख नागरिक उघड्यावरच शौचास बसतात. उघड्यावर शौचास बसल्याने ग्रामीण भागांमध्ये पावसाळा व हिवाळ्यामध्ये अनेक रोगांच्या साथी पसरतात. महिलांना पोटाचे विकार होतात. यापासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रत्येक घरी शौचालय असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या शौचालयाचा वापरही होणे गरजेचे आहे. शौचालय बांधकामासाठी जवळपास २० हजार रूपये खर्च येत असल्याने प्रत्येक कुटुंब शौचालय बांधू शकत नाही. अशा कुटुंबांना शौचालय बांधकामासाठी आर्थिक सहकार्य मिळावे, यासाठी शासनाने ‘निर्मल भारत अभियान’ सुरू केले होते. भाजपा सरकारने या अभियानाचे नाव बदलवून ‘स्वच्छ भारत मिशन’ हे ठेवले आहे. या अभियानांतर्गत ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही, अशा कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून १२ हजार रूपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाते. शौचालय बांधकामासाठी आवश्यक असलेला निधीसुद्धा शासनाकडून तत्काळ उपलब्ध करून दिला जातो. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २ लाख ४५ हजार ७४५ कुटुंब आहेत. त्यापैकी ६९ हजार ८३ कुटुंबांकडे शौचालय आहे. मात्र १ लाख ७६ हजार ६६२ कुटुंबांकडे अजूनही शौचालय नाही. यातील १ लाख ६७ हजार ८०७ ग्रामीण कुटुंबांकडे तर ८ हजार ८५५ शहरी कुटुंबांकडे शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही.शौचालयशिवाय ग्रामीण भागातील दुर्गंधी हटविणे अशक्य असल्याने शासनाने शौचालय बांधकामासाठी जेवढा निधी आवश्यक आहे, तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे धोरण अवलंबिले आहे. शौचालय बांधून त्याचा वापर करण्याविषयी माध्यमांद्वारे व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणा याची अंमलबजावणी अत्यंत धिम्म्यागतीने करीत आहे.शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर कित्येक महिने त्याला निधीच उपलब्ध करून दिला जात नाही. शौचालयाचे महत्व नागरिकांना पटवून दिले जात नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या दुर्गम व ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांना शौचालय बांधकामासाठी अनुदान मिळते, हेसुद्धा माहीत नाही. त्यामुळे इच्छा असूनही शौचालय बांधू शकत नाही. गावातील तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी नागरिकांमध्ये शौचालय बांधकामाबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)