शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

दोन लाख कुटुंब शौचालयाविना

By admin | Updated: January 10, 2015 22:55 IST

प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असावे, यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत असले तरी जिल्ह्यातील एकूण २ लाख ४५ हजार ७४५ कुटुंबांपैकी १ लाख ७६ हजार ६६२ कुटुंबांकडे शौचालय नाही.

गडचिरोली : प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असावे, यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत असले तरी जिल्ह्यातील एकूण २ लाख ४५ हजार ७४५ कुटुंबांपैकी १ लाख ७६ हजार ६६२ कुटुंबांकडे शौचालय नाही. त्यामुळे या कुटुंबांमधील जवळपास आठ लाख नागरिक उघड्यावरच शौचास बसतात. उघड्यावर शौचास बसल्याने ग्रामीण भागांमध्ये पावसाळा व हिवाळ्यामध्ये अनेक रोगांच्या साथी पसरतात. महिलांना पोटाचे विकार होतात. यापासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रत्येक घरी शौचालय असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या शौचालयाचा वापरही होणे गरजेचे आहे. शौचालय बांधकामासाठी जवळपास २० हजार रूपये खर्च येत असल्याने प्रत्येक कुटुंब शौचालय बांधू शकत नाही. अशा कुटुंबांना शौचालय बांधकामासाठी आर्थिक सहकार्य मिळावे, यासाठी शासनाने ‘निर्मल भारत अभियान’ सुरू केले होते. भाजपा सरकारने या अभियानाचे नाव बदलवून ‘स्वच्छ भारत मिशन’ हे ठेवले आहे. या अभियानांतर्गत ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही, अशा कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून १२ हजार रूपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाते. शौचालय बांधकामासाठी आवश्यक असलेला निधीसुद्धा शासनाकडून तत्काळ उपलब्ध करून दिला जातो. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २ लाख ४५ हजार ७४५ कुटुंब आहेत. त्यापैकी ६९ हजार ८३ कुटुंबांकडे शौचालय आहे. मात्र १ लाख ७६ हजार ६६२ कुटुंबांकडे अजूनही शौचालय नाही. यातील १ लाख ६७ हजार ८०७ ग्रामीण कुटुंबांकडे तर ८ हजार ८५५ शहरी कुटुंबांकडे शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही.शौचालयशिवाय ग्रामीण भागातील दुर्गंधी हटविणे अशक्य असल्याने शासनाने शौचालय बांधकामासाठी जेवढा निधी आवश्यक आहे, तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे धोरण अवलंबिले आहे. शौचालय बांधून त्याचा वापर करण्याविषयी माध्यमांद्वारे व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणा याची अंमलबजावणी अत्यंत धिम्म्यागतीने करीत आहे.शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर कित्येक महिने त्याला निधीच उपलब्ध करून दिला जात नाही. शौचालयाचे महत्व नागरिकांना पटवून दिले जात नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या दुर्गम व ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांना शौचालय बांधकामासाठी अनुदान मिळते, हेसुद्धा माहीत नाही. त्यामुळे इच्छा असूनही शौचालय बांधू शकत नाही. गावातील तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी नागरिकांमध्ये शौचालय बांधकामाबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)