शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

घोट व आष्टीतील अपघातात दोन दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 01:42 IST

घोट व आष्टी येथे झालेल्या दोन अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वार ठार झाले. दोन्ही घटना शुक्रवारी घडल्या. चामोर्शी तालुक्यातील घोटमधील आंबेडकर चौकाजवळ एका भरधाव मेटॅडोरने दुचाकीला धडक दिली.

ठळक मुद्देमेटॅडोरची धडक : चारचाकी वाहन शिरले चहा टपरीत

लोकमत न्यूज नेटवर्कघोट/आष्टी : घोट व आष्टी येथे झालेल्या दोन अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वार ठार झाले. दोन्ही घटना शुक्रवारी घडल्या.चामोर्शी तालुक्यातील घोटमधील आंबेडकर चौकाजवळ एका भरधाव मेटॅडोरने दुचाकीला धडक दिली. यात नेताजीनगर येथील रहिवासी असलेल्या दुचाकीवरील डॉ.सुरज बाला (५५) यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता घडली.प्राप्त माहितीनुसार, मेटॅडोर (एमएच ३३, जी ५३७) हा घोट-चामोर्शी मार्गाने जळाऊ लाकडे घेऊन चामोर्शीकडे जात होता. याचवेळी नेताजीनगर येथील डॉ.सुरज बाला हे दुचाकीने (एमएच ३३, पी ७५९७) घोटकडे येत होते. दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. जखमी डॉ.बाला यांना गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गडचिरोलीला हलविले जात होते. मात्र रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी मेटॅडोर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास प्रभारी पोलीस अधिकारी एम.जगदाळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.दुसरा अपघात आष्टी येथे झाला. यात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास आष्टी येथील चौकात घडली. अखिम रॉय (३८) रा.आष्टी असे मृतकाचे नाव आहे.एमएच ३४ एव्ही २४१९ क्रमांकाचे चारचाकी वाहन आलापल्लीवरून बल्लारशहाकडे जात होते. दरम्यान आष्टी येथील मुख्य चौकात अहेरी मार्गावरील बसस्थानकावर चारचाकी वाहनधारकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हे वाहन रस्त्याच्या बाजुला उभे असलेल्या दुचाकी वाहनाला धडकले. टपरीवरील चहा पिल्यानंतर अखिम हा दुचाकीवर बसून होता. वाहनाची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पुढे चारचाकी वाहन अनियंत्रित होऊन चहाच्या टपरीत शिरले. मात्र प्रसंगावधानात बाळगत नागरिकांनी चहाटपरीतून पळ काढला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र तीन नागरिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आष्टी येथील मुख्य चौकात चारचाही मार्गाने वाहने येत असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.