शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

आदिवासींवर अन्याय होऊ देणार नाही

By admin | Updated: December 21, 2014 22:59 IST

आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी सरकारची आहे. सदर जबाबदारी आपल्याकडे दिली असल्याने खऱ्या आदिवासींमध्ये बोगस आदिवासींचा समावेश होऊ देणार नाही,

गडचिरोली : आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी सरकारची आहे. सदर जबाबदारी आपल्याकडे दिली असल्याने खऱ्या आदिवासींमध्ये बोगस आदिवासींचा समावेश होऊ देणार नाही, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी आदिवासी विद्यार्थी संघाच्या शिष्टमंडळाला भेटीदरम्यान दिले. नागपूर येथील आदिवासी विकास मंत्र्यांच्या दालनात जिल्ह्यातील आविसंच्या शिष्टमंडळाने भेट देऊन जिल्ह्यातील आदिवासींच्या समस्यांचे गाऱ्हाणे त्यांच्यापुढे मांडले. दिलेल्या निवेदनात आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, आरोग्य, कुपोषण, पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्ते, वीज आदी प्रश्न सोडविण्याच्या मागण्यांचा समावेश होता. तळागाळातील खऱ्या आदिवासींपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याची मागणी करण्यात आली. खऱ्या आदिवासींवर अन्याय होऊ देणार नाही, समाजाला संघटीत करण्याची जबाबदारी स्वीकारलेल्यांना सहकार्य करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला आदिवासी विकास मंत्र्यांनी दिले. शिष्टमंडळात आ. संजय पुराम, आदिवासी विद्यार्थी संघाचे सरसेनापती नंदू नरोटे, ज्येष्ठ नेते मोहन पुराम उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)