शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पक्ष्यांच्या शिकारीसाठी पाणवठ्याजवळ सापळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 23:45 IST

मे महिन्यातील वाढत्या तापमानात काही विशिष्ट ठिकाणचे पाण्याचे स्त्रोत कायम राहत असतात. नेमकी हीच संधी हेरून शिकार करणारे लोक त्या ठिकाणी सापळे रचून या महिन्यात विविध प्रजातींच्या पक्षांची मोठ्या प्रमाणात शिकार करतात. पक्षांच्या शिकारीसाठी वैरागड भागात अनेक ठिकाणी सापळे लावण्यात आले आहे.

ठळक मुद्देवन विभागाचे दुर्लक्ष : पक्ष्यांच्या अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : मे महिन्यातील वाढत्या तापमानात काही विशिष्ट ठिकाणचे पाण्याचे स्त्रोत कायम राहत असतात. नेमकी हीच संधी हेरून शिकार करणारे लोक त्या ठिकाणी सापळे रचून या महिन्यात विविध प्रजातींच्या पक्षांची मोठ्या प्रमाणात शिकार करतात. पक्षांच्या शिकारीसाठी वैरागड भागात अनेक ठिकाणी सापळे लावण्यात आले आहे. या प्रकारामुळे पक्षांच्या अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहेत.आरमोरी वन परिक्षेत्रातील मेंढेबोडी, वैरागड व परिसरातील अनेक गावात हारावत, तितीर, लावा व इतर प्रजातीच्या पक्ष्यांची शिकार केली जाते. सुकाळापासून मेंढेबोडी ते वैरागडच्या चक्करडोहापर्यंतचा जो वैलोचना नदीचा पात्र आहे. या नदी पात्रात ठिकठिकाणी शिकार करणारे लोक सापळे रचून पक्षाची शिकार करीत असल्याचे दिसून येत आहे. हारावत व इतर पक्ष्यांची शिकार करून मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. नदी पात्र, तलाव बोडी या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत असतात. अशा ठिकाणी जाळे पसरविण्यात येते आणि शिकारी स्वत: दबा धरून बसण्यासाठी पाणवठ्याच्या बाजुला झाडाच्या फांद्याची झोपडी तयार करतात. पसरविलेल्या जाळीची दोरी झोपडीपर्यंत पुरवून तहाण भागविण्यासाठी पाणवठ्यावर पक्षी बसल्यावर दबा धरून बसलेला शिकारी जाळीची दोरी ओढतो. यात पक्षी अलगदपणे फासात अडकतो. एकावेळी चार ते पाचच्या संख्येने पक्षी फासात अडकतात. अशा प्रकारच्या विशिष्ट पध्दतीचा अनेक शिकारी पक्ष्यांची शिकार करण्यासाठी वापर करीत आहेत. सध्या तापमान प्रचंड असल्याने अनेक पक्षी प्राणीस्त्रोताच्या ठिकाणी येऊन आपली तहाण भागवित असतात. नेमकी याचवेळी पक्ष्यांची शिकार केली जाते. याबाबत वन विभागाने सतर्क राहून वनातील पशु व पक्ष्यांची शिकार करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वैरागड भागातील नागरिकांनी केली आहे.पक्षी विक्रीचा गोरखधंदा वाढलाआरमोरी तालुक्याच्या वैरागड भागासह जिल्ह्याच्या विविध भागात विविध प्रजातीच्या पक्ष्यांची शिकार करून त्याची विक्री करून पैसे कमवायचे हा गोरखधंदा अनेक शिकारी लोक सर्रास करीत आहेत. शहरी व ग्रामीण भागात फिरून नागरिकांना पक्ष्याची विक्री अनेक लोक करीत असल्यााचे दिसून येत आहे. सायंकाळी व पहाटेच्या सुमारास सापळ्यामध्ये पक्ष्यांना अडवून त्याची शिकार करायची व त्यानंतर गावागावात फिरून चांगल्या किंमतीत पक्षी विकायचे हा गोरखधंदा गेल्या काही दिवसांपासून जोमात सुरू आहे. सदर प्रकाराची वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना परिपूर्ण माहिती आहे. मात्र वन विभागाकडून आतापर्यंत एकाही पक्ष्याची शिकार करणाºयांवर कारवाई करण्यात आली नाही. या गंभीर प्रकाराकडे वनाधिकारी व वनकर्मचारी प्रचंड दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप वैरागड भागातील नागरिकांनी केला आहे. या प्रकाराला वेळीच आळा घालण्याची गरज आहे.