शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

एटापल्लीच्या शवागार इमारतीचे हस्तांतरण रखडले

By admin | Updated: February 11, 2016 00:09 IST

स्थानिक ग्रामीण रूग्णालय परिसरात मागील दोन वर्षापासून रूग्णालय परिसरातील खुल्या आवारात महिला व पुरूष मृतदेहाचे उघड्यावर शवविच्छेदन केले जात आहे.

उघड्यावरच करावे लागते विच्छेदन : ३० लाखांचा निधी झाला खर्चएटापल्ली : स्थानिक ग्रामीण रूग्णालय परिसरात मागील दोन वर्षापासून रूग्णालय परिसरातील खुल्या आवारात महिला व पुरूष मृतदेहाचे उघड्यावर शवविच्छेदन केले जात आहे. तब्बल ३० लाख रूपये खर्च करून शवविच्छेदन तथा शवागाराची सुसज्ज इमारत उभारण्यात आली. मात्र दोन वर्ष उलटूनही सदर इमारत ग्रामीण रूग्णालयास हस्तांतरित करण्यात आली नाही. त्यामुळे सध्या शवविच्छेदन उघड्यावर केले जात असून नवी इमारत शोभेची वस्तू बनली आहे. एटापल्लीतील शवविच्छेदनाची जुनी इमारत जीर्ण झाल्याने वर्षभर मृतदेहाचे शवविच्छेदन उघड्यावर सुरू होते. त्यानंतर गतवर्षी रूग्णालय परिसरात सर्व सोयीसुविधायुक्त प्रशस्त शवागार व शवविच्छेदन गृहाची इमारत बांधण्यात आली. या इमारतीत शवविच्छेदनासाठी एक खोली, वैद्यकीय अधिकाऱ्यांकरिता एक कक्ष, शौचालय, प्रसाधनगृह व शवविच्छेदन मशीन ठेवण्यासाठी एक मोठी खोली आहे. मात्र या इमारतीत विद्युत जोडणी करण्यात आली नाही. या शुल्लक कारणामुळे सदर इमारत रूग्णालय प्रशासनास हस्तांतरीत करण्यात आली नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून शवागाराच्या इमारतीखाली उघड्यावर मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून असाच कारभार सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)