शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त रस्त्यामुळे व्यापार थंडावला

By admin | Updated: June 16, 2014 23:30 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाने चामोर्शी ते येनापूर या रस्त्याची दुरूस्ती न केल्याने या मार्गावरून वाहनांची वर्दळ कमी झाली आहे. परिणामी आष्टीच्या व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. गेल्या दीड वर्षापासून

आष्टी : सार्वजनिक बांधकाम विभागाने चामोर्शी ते येनापूर या रस्त्याची दुरूस्ती न केल्याने या मार्गावरून वाहनांची वर्दळ कमी झाली आहे. परिणामी आष्टीच्या व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. गेल्या दीड वर्षापासून याचा परिणाम त्यांच्या आर्थिक मिळकतीवर झाला आहे.चामोर्शी तालुक्यातील आष्टी हे अहेरी-चंद्रपूर मार्गावरील मुख्य ठिकाण आहे. दोन जिल्ह्यांना जोडणारे स्थळ अशी आष्टीची ओळख आहे. गडचिरोली-आष्टी या मार्गावर आष्टी ते येनापूर हा १५ ते २० किमीचा रस्ता मागील वर्षी पावसाळ्यात पूर्णत: उखडला. त्यानंतर या मार्गावरची राज्य परिवहन महामंडळाची बस सेवाही बंद करण्यात आली होती. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी अनेक आंदोलने झालीत. त्यानंतर रस्त्याची थातूरमातूर दुरूस्ती करण्यात आली. मात्र गेल्या एक ते दीड वर्षापासून या मार्गावरून खासगी वाहने (काळी-पिवळी वगळता ) एकही जात नाही. गडचिरोलीवरून अहेरीकडे व आष्टीकडे जाणारे वाहन चामोर्शी, घोट, सुभाषग्राम मार्ग मार्र्कंडा कं. असे प्रवास करीत जातात. जवळजवळ ९ किमीचा अधिकचा फेरा पडला तरी याच मार्गाने नागरिक आपल्या खासगी वाहनांनी प्रवास करतात. यामुळे आष्टी गावाच्या व्यापार, उदिमावावर मोठा परिणाम झाला.आष्टीच्या स्थानिक बाबासाहेब आंबेडकर चौकात ४० ते ५० लहान-मोठे व्यावसायिक आहेत. कुणाचा हॉटेल आहे. कुणाची चहाटपरी आहे तर कुणाचे लहान-मोठे दुकान आहेत. गडचिरोलीकडून दररोज १०० वाहने चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपिंपरी व अहेरी, आलापल्लीकडे जात होती. येथे नागरिक नास्त्यासाठी थांबत. परंतु आता आष्टीवरून वाहनच जात नाही. त्यामुळे या भागातला व्यवसाय प्रचंड प्रमाणात कमी झाला आहे. आष्टीतीतल अनेक दुकानदारांनी मार्र्कंडा कं. गावातील वनविभाग कार्यालयाच्या वळणावर कच्ची दुकाने थाटली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग निधी मंजूर होऊन गेल्या दीड वर्षापासून चामोर्शी ते येनापूर या रस्त्याचे काम करीत नसल्याने आष्टीचे नागरिक प्रचंड नाराज आहे. या भागातील बेरोजगार लहान-मोठा व्यवसाय करून आपले कुटुंब चालवित होता. त्याच्याही व्यवसायावर रस्त्याच्या नादुरूस्तीमुळे फटका बसला आहे. हा रस्ता खराब होऊन दीड वर्ष झालेत मात्र दुरूस्तीचा अजुनही पत्ता नाही. पालकमंत्र्याचेही आश्वासन या कामाबाबत फोल ठरले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)