शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

नादुरुस्त रस्त्यामुळे व्यापार थंडावला

By admin | Updated: June 16, 2014 23:30 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाने चामोर्शी ते येनापूर या रस्त्याची दुरूस्ती न केल्याने या मार्गावरून वाहनांची वर्दळ कमी झाली आहे. परिणामी आष्टीच्या व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. गेल्या दीड वर्षापासून

आष्टी : सार्वजनिक बांधकाम विभागाने चामोर्शी ते येनापूर या रस्त्याची दुरूस्ती न केल्याने या मार्गावरून वाहनांची वर्दळ कमी झाली आहे. परिणामी आष्टीच्या व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. गेल्या दीड वर्षापासून याचा परिणाम त्यांच्या आर्थिक मिळकतीवर झाला आहे.चामोर्शी तालुक्यातील आष्टी हे अहेरी-चंद्रपूर मार्गावरील मुख्य ठिकाण आहे. दोन जिल्ह्यांना जोडणारे स्थळ अशी आष्टीची ओळख आहे. गडचिरोली-आष्टी या मार्गावर आष्टी ते येनापूर हा १५ ते २० किमीचा रस्ता मागील वर्षी पावसाळ्यात पूर्णत: उखडला. त्यानंतर या मार्गावरची राज्य परिवहन महामंडळाची बस सेवाही बंद करण्यात आली होती. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी अनेक आंदोलने झालीत. त्यानंतर रस्त्याची थातूरमातूर दुरूस्ती करण्यात आली. मात्र गेल्या एक ते दीड वर्षापासून या मार्गावरून खासगी वाहने (काळी-पिवळी वगळता ) एकही जात नाही. गडचिरोलीवरून अहेरीकडे व आष्टीकडे जाणारे वाहन चामोर्शी, घोट, सुभाषग्राम मार्ग मार्र्कंडा कं. असे प्रवास करीत जातात. जवळजवळ ९ किमीचा अधिकचा फेरा पडला तरी याच मार्गाने नागरिक आपल्या खासगी वाहनांनी प्रवास करतात. यामुळे आष्टी गावाच्या व्यापार, उदिमावावर मोठा परिणाम झाला.आष्टीच्या स्थानिक बाबासाहेब आंबेडकर चौकात ४० ते ५० लहान-मोठे व्यावसायिक आहेत. कुणाचा हॉटेल आहे. कुणाची चहाटपरी आहे तर कुणाचे लहान-मोठे दुकान आहेत. गडचिरोलीकडून दररोज १०० वाहने चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपिंपरी व अहेरी, आलापल्लीकडे जात होती. येथे नागरिक नास्त्यासाठी थांबत. परंतु आता आष्टीवरून वाहनच जात नाही. त्यामुळे या भागातला व्यवसाय प्रचंड प्रमाणात कमी झाला आहे. आष्टीतीतल अनेक दुकानदारांनी मार्र्कंडा कं. गावातील वनविभाग कार्यालयाच्या वळणावर कच्ची दुकाने थाटली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग निधी मंजूर होऊन गेल्या दीड वर्षापासून चामोर्शी ते येनापूर या रस्त्याचे काम करीत नसल्याने आष्टीचे नागरिक प्रचंड नाराज आहे. या भागातील बेरोजगार लहान-मोठा व्यवसाय करून आपले कुटुंब चालवित होता. त्याच्याही व्यवसायावर रस्त्याच्या नादुरूस्तीमुळे फटका बसला आहे. हा रस्ता खराब होऊन दीड वर्ष झालेत मात्र दुरूस्तीचा अजुनही पत्ता नाही. पालकमंत्र्याचेही आश्वासन या कामाबाबत फोल ठरले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)