शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
2
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पाहरा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
3
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
4
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
5
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
6
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
7
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
8
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
9
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
10
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
11
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
12
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
13
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
14
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
15
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
16
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
17
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
18
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
19
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
20
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी

दुष्काळाच्या सावटात पर्यटन करणाऱ्या जि. प. सदस्यांवर मतदारांचा रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2015 02:08 IST

जिल्ह्यात यंदा प्रचंड दुष्काळी परिस्थिती आहे. पाऊस अनियमित झाल्याने धानपीक हातून गेले आहे.

गडचिरोली : जिल्ह्यात यंदा प्रचंड दुष्काळी परिस्थिती आहे. पाऊस अनियमित झाल्याने धानपीक हातून गेले आहे. ज्या पिकाचे उत्पादन होणार आहे. त्याचा उताराही कमी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या जिल्ह्यातही वाढत असताना गडचिरोली जिल्हा परिषदेचे अनेक जिल्हा परिषद सदस्य मागील दोन महिन्यांपासून मतदार संघात फिरलेसुद्धा नाहीत. कोणत्याही जिल्हा परिषद सदस्याने शेतकऱ्यांचे दु:ख जाणले नाही. दोन महिने केवळ अविश्वासाच्या नाट्यात सदस्य केरळ, तामिळनाडू राज्याचा दौरा करून आले. करोडो रूपयांचा चुराडा या दौऱ्यावर झाला, अशी माहिती पुढे आल्याने अनेक सदस्यांना मतदार संघात मतदारांसमोर तोंड दाखवायला जागाही उरलेली नाही. त्यामुळे या सदस्यांप्रती मतदार संघात प्रचंड रोष असल्याचे चित्र दिसून येत आहे.गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुक्यातून सध्या ५० जिल्हा परिषद सदस्य विराजमान आहेत. हे सारे सदस्य ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणारे जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. १० हजार मतदारांमधून निवडून आलेला हा जनसेवक लोकांचे प्रश्न सोडविण्याचा मुख्य केंद्रबिंदू आहे. गडचिरोली जिल्ह्यात यंदा पाऊस अत्यल्प झाला. शेतकरी नापिकी व पिकावरील रोगाच्या प्रादुर्भावाने हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत मागील दोन महिन्यांपासून त्याचे दु:ख जाणण्यासाठी एकही जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या शेतापर्यंत पोहोचलेला नाही. जिल्हा परिषदेत मागील दोन ते तीन महिन्यांपासून एकही बैठक जनहिताच्या प्रश्नावर झालेली नाही. केवळ अविश्वासाचे नाट्यच दोन महिन्यांपासून सुरू आहे. २०१२ मध्ये निवडून दिलेल्या अनेक जिल्हा परिषद सदस्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे सुधारल्याचेही मतदारांना दिसून येत आहे. हा सर्व प्रकार मतदारांचीच मती गुंग करणारा आहे. दुष्काळाच्या सावटात आपले अश्रू पुसण्याऐवजी मजा मारणारे हे लोकप्रतिनिधी जनतेचे खरे सेवक आहेत काय, अशी भावना लोकांमध्ये दिसून येत आहे.