शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

दुष्काळाच्या सावटात पर्यटन करणाऱ्या जि. प. सदस्यांवर मतदारांचा रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2015 02:08 IST

जिल्ह्यात यंदा प्रचंड दुष्काळी परिस्थिती आहे. पाऊस अनियमित झाल्याने धानपीक हातून गेले आहे.

गडचिरोली : जिल्ह्यात यंदा प्रचंड दुष्काळी परिस्थिती आहे. पाऊस अनियमित झाल्याने धानपीक हातून गेले आहे. ज्या पिकाचे उत्पादन होणार आहे. त्याचा उताराही कमी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या जिल्ह्यातही वाढत असताना गडचिरोली जिल्हा परिषदेचे अनेक जिल्हा परिषद सदस्य मागील दोन महिन्यांपासून मतदार संघात फिरलेसुद्धा नाहीत. कोणत्याही जिल्हा परिषद सदस्याने शेतकऱ्यांचे दु:ख जाणले नाही. दोन महिने केवळ अविश्वासाच्या नाट्यात सदस्य केरळ, तामिळनाडू राज्याचा दौरा करून आले. करोडो रूपयांचा चुराडा या दौऱ्यावर झाला, अशी माहिती पुढे आल्याने अनेक सदस्यांना मतदार संघात मतदारांसमोर तोंड दाखवायला जागाही उरलेली नाही. त्यामुळे या सदस्यांप्रती मतदार संघात प्रचंड रोष असल्याचे चित्र दिसून येत आहे.गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुक्यातून सध्या ५० जिल्हा परिषद सदस्य विराजमान आहेत. हे सारे सदस्य ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणारे जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. १० हजार मतदारांमधून निवडून आलेला हा जनसेवक लोकांचे प्रश्न सोडविण्याचा मुख्य केंद्रबिंदू आहे. गडचिरोली जिल्ह्यात यंदा पाऊस अत्यल्प झाला. शेतकरी नापिकी व पिकावरील रोगाच्या प्रादुर्भावाने हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत मागील दोन महिन्यांपासून त्याचे दु:ख जाणण्यासाठी एकही जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या शेतापर्यंत पोहोचलेला नाही. जिल्हा परिषदेत मागील दोन ते तीन महिन्यांपासून एकही बैठक जनहिताच्या प्रश्नावर झालेली नाही. केवळ अविश्वासाचे नाट्यच दोन महिन्यांपासून सुरू आहे. २०१२ मध्ये निवडून दिलेल्या अनेक जिल्हा परिषद सदस्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे सुधारल्याचेही मतदारांना दिसून येत आहे. हा सर्व प्रकार मतदारांचीच मती गुंग करणारा आहे. दुष्काळाच्या सावटात आपले अश्रू पुसण्याऐवजी मजा मारणारे हे लोकप्रतिनिधी जनतेचे खरे सेवक आहेत काय, अशी भावना लोकांमध्ये दिसून येत आहे.