शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

सात कोटींचे चुकारे थकले

By admin | Updated: March 20, 2015 01:26 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गडचिरोली प्रादेशिक विभागांतर्गत सुमारे ४२ कोटी ३४ लाख ६५ हजार रूपये किंमतीचे धान खरेदी करण्यात आले आहेत.

गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गडचिरोली प्रादेशिक विभागांतर्गत सुमारे ४२ कोटी ३४ लाख ६५ हजार रूपये किंमतीचे धान खरेदी करण्यात आले आहेत. यापैकी ३४ कोटी ८८ लाख २७ हजार रूपयांचे चुकारे झाले असून सात कोटी ४६ लाख ३८ हजार १८७ रूपयांची चुकारे अजूनही थकीत आहेत. ३१ मार्चपूर्वी कर्ज भरायचे असतानाही धानाची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.शासनाच्या वतीने आदिवासी विकास महामंडळ, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्यामार्फतीने धान्य खरेदी करते. यावर्षी ५० धान्य खरेदी केंद्र निर्माण करण्यात आले होते. शेतकऱ्यांना साधारण धानासाठी १३६० रूपये तर अतित्युत्तम धानासाठी १४०० रूपये दर ठरविण्यात आला होता. यापैकी १३६० दराने १८ मार्चपर्यंत सुमारे ३ लाख ११ हजार ३७१ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. याची किंमत ४२ कोटी ३४ लाख ६५ हजार २६७ एवढी होते. यापैकी आतापर्यंत ३४ कोटी ८८ लाख २७ हजार ८० रूपये शेतकऱ्यांना चुकते करण्यात आले आहे. मात्र सात कोटी ४६ लाख ३८ हजार १८७ रूपयांचे चुकारे मागील अनेक दिवसांपासून शासनाच्या वतीने देण्यात आले. धान खरेदी करून त्याची भरडाई होईलपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी आदिवासी विकास महामंडळाची असली तरी यामध्ये सर्व निर्णय घेण्याची जबाबदारी मात्र शासनाचीच आहे. ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा केल्यास शासनाच्या व्याज सवलतीचा लाभ शेतकऱ्यांना घेता येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली. धानाचा काटा झाल्यानंतर १५ दिवसांमध्ये रक्कम मिळेल, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. मात्र तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये धानाची रक्कम जमा झाली नाही. कर्ज भरण्याची मुदत केवळ आता १० दिवस शिल्लक राहिले आहे. अशातच अजूनही रक्कम जमा झाली नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली आहे. ३१ मार्च नंतर एक दिवसही उशीर झाल्यास कर्ज सवलत योजनेचा लाभ मिळत नाही. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. या कर्जाचीही रक्कम वाढतच चालली आहे. धान विकूण हैराण झालेले शेतकरी प्रादेशिक कार्यालय व आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवून धानाचे चुकारे देण्याची मागणी करीत आहेत. धानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया मुंबई येथून पूर्ण केली जाते. याबद्दलची कोणतीही पूर्वसूचना प्रादेशिक किंवा आदिवासी विकास महामंडळाला दिली जात नाही. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाचे कर्मचारी आपल्याला काहीच माहित नसल्याचे उत्तर देत आहेत. परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली आहे. शासनाने ३१ मार्चपूर्वी धानाचे चुकारे करावे, अशी मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)